AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens World Cup : भारत आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा सामना होणार नाही? नेमकं कारण काय ते जाणून घ्या

IND W vs AUS W: वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना 30 ऑक्टोबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये होईल. पण हा सामना होईल की नाही याबाबत शंका आहे. चला जाणून घेऊयात या मागचं कारण..

| Updated on: Oct 28, 2025 | 4:31 PM
Share
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत भारत ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 30 ऑक्टोबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित केला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. पण या सामन्यावर पावसाची वक्रदृष्टी असणार आहे. (Photo-PTI)

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत भारत ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 30 ऑक्टोबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित केला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. पण या सामन्यावर पावसाची वक्रदृष्टी असणार आहे. (Photo-PTI)

1 / 5
कोकणाच्या दक्षिणेकडील भागात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत अधूनमधून पाऊस पडत आहे. पुढील 48 ते 72 तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत होणाऱ्या उपांत्य सामन्यादरम्यान दुपारी पावसाची शक्यता 69 टक्के आहे. या दिवशी एकूण 3.8 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo-PTI)

कोकणाच्या दक्षिणेकडील भागात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत अधूनमधून पाऊस पडत आहे. पुढील 48 ते 72 तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत होणाऱ्या उपांत्य सामन्यादरम्यान दुपारी पावसाची शक्यता 69 टक्के आहे. या दिवशी एकूण 3.8 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo-PTI)

2 / 5
आयसीसीने उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी एक दिवस राखून ठेवला आहे. त्यामुळे हा सामना ठरल्या दिवशी झाला नाही तर 31 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. पण या दिवशीही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. त्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ येऊ शकते. (Photo-PTI)

आयसीसीने उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी एक दिवस राखून ठेवला आहे. त्यामुळे हा सामना ठरल्या दिवशी झाला नाही तर 31 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. पण या दिवशीही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. त्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ येऊ शकते. (Photo-PTI)

3 / 5
भारत ऑस्ट्रेलिया सामना राखीव दिवशीही झाला नाही तर त्याचा थेट फायदा ऑस्ट्रेलियाला होणार आहे. ऑस्ट्रेलियाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर भारताला उपांत्य फेरीचा सामना न खेळताच गाशा गुंडाळावा लागेल. (Photo-PTI)

भारत ऑस्ट्रेलिया सामना राखीव दिवशीही झाला नाही तर त्याचा थेट फायदा ऑस्ट्रेलियाला होणार आहे. ऑस्ट्रेलियाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर भारताला उपांत्य फेरीचा सामना न खेळताच गाशा गुंडाळावा लागेल. (Photo-PTI)

4 / 5
आयसीसीच्या नियमानुसार पावसामुळे सामना रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण जाणार हे गुणातिलकेच्या आधारावर ठरवलं जाईल. ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे 13 गुणांसह आघाडीवर आहे. तर भारतीय संघ 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीची संधी मिळेल. (Photo-PTI)

आयसीसीच्या नियमानुसार पावसामुळे सामना रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण जाणार हे गुणातिलकेच्या आधारावर ठरवलं जाईल. ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे 13 गुणांसह आघाडीवर आहे. तर भारतीय संघ 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीची संधी मिळेल. (Photo-PTI)

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक