AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens World Cup : भारत आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा सामना होणार नाही? नेमकं कारण काय ते जाणून घ्या

IND W vs AUS W: वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना 30 ऑक्टोबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये होईल. पण हा सामना होईल की नाही याबाबत शंका आहे. चला जाणून घेऊयात या मागचं कारण..

| Updated on: Oct 28, 2025 | 4:31 PM
Share
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत भारत ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 30 ऑक्टोबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित केला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. पण या सामन्यावर पावसाची वक्रदृष्टी असणार आहे. (Photo-PTI)

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत भारत ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 30 ऑक्टोबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित केला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. पण या सामन्यावर पावसाची वक्रदृष्टी असणार आहे. (Photo-PTI)

1 / 5
कोकणाच्या दक्षिणेकडील भागात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत अधूनमधून पाऊस पडत आहे. पुढील 48 ते 72 तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत होणाऱ्या उपांत्य सामन्यादरम्यान दुपारी पावसाची शक्यता 69 टक्के आहे. या दिवशी एकूण 3.8 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo-PTI)

कोकणाच्या दक्षिणेकडील भागात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत अधूनमधून पाऊस पडत आहे. पुढील 48 ते 72 तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत होणाऱ्या उपांत्य सामन्यादरम्यान दुपारी पावसाची शक्यता 69 टक्के आहे. या दिवशी एकूण 3.8 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo-PTI)

2 / 5
आयसीसीने उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी एक दिवस राखून ठेवला आहे. त्यामुळे हा सामना ठरल्या दिवशी झाला नाही तर 31 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. पण या दिवशीही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. त्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ येऊ शकते. (Photo-PTI)

आयसीसीने उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी एक दिवस राखून ठेवला आहे. त्यामुळे हा सामना ठरल्या दिवशी झाला नाही तर 31 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. पण या दिवशीही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. त्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ येऊ शकते. (Photo-PTI)

3 / 5
भारत ऑस्ट्रेलिया सामना राखीव दिवशीही झाला नाही तर त्याचा थेट फायदा ऑस्ट्रेलियाला होणार आहे. ऑस्ट्रेलियाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर भारताला उपांत्य फेरीचा सामना न खेळताच गाशा गुंडाळावा लागेल. (Photo-PTI)

भारत ऑस्ट्रेलिया सामना राखीव दिवशीही झाला नाही तर त्याचा थेट फायदा ऑस्ट्रेलियाला होणार आहे. ऑस्ट्रेलियाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर भारताला उपांत्य फेरीचा सामना न खेळताच गाशा गुंडाळावा लागेल. (Photo-PTI)

4 / 5
आयसीसीच्या नियमानुसार पावसामुळे सामना रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण जाणार हे गुणातिलकेच्या आधारावर ठरवलं जाईल. ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे 13 गुणांसह आघाडीवर आहे. तर भारतीय संघ 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीची संधी मिळेल. (Photo-PTI)

आयसीसीच्या नियमानुसार पावसामुळे सामना रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण जाणार हे गुणातिलकेच्या आधारावर ठरवलं जाईल. ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे 13 गुणांसह आघाडीवर आहे. तर भारतीय संघ 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीची संधी मिळेल. (Photo-PTI)

5 / 5
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.