AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युजवेंद्र चहलचा टी20 क्रिकेटमधील मोठा विक्रम बुमराहने मोडला, पण…

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या टी20 सामन्यात भारतीय संघाने सुमार कामगिरी केली. फलंदाजांनी माती खाल्ल्याने गोलंदाजांना त्या धावा रोखणं खूपच कठीण झालं. असं असलं तर या सामन्यात जसप्रीत बुमराहने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Oct 31, 2025 | 10:20 PM
Share
ऑस्ट्रेलियाने भारताला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसर्‍या सामन्यात 4 विकेट्सने पराभूत केलं. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठछी फक्त 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात 2 विकेट घेत जसप्रीत बुमराहने मोठा विक्रम नावावर केला. (Photo- PTI)

ऑस्ट्रेलियाने भारताला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसर्‍या सामन्यात 4 विकेट्सने पराभूत केलं. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठछी फक्त 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात 2 विकेट घेत जसप्रीत बुमराहने मोठा विक्रम नावावर केला. (Photo- PTI)

1 / 5
जसप्रीत बुमराहने या सामन्यात 4 षटकात 26 धावा देत 2 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने स्पेलच्या शेवटच्या षटकात दोन गडी बाद करत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्यासह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर युजवेंद्र चहलचा विक्रम मोडीत काढला आहे. (Photo- PTI)

जसप्रीत बुमराहने या सामन्यात 4 षटकात 26 धावा देत 2 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने स्पेलच्या शेवटच्या षटकात दोन गडी बाद करत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्यासह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर युजवेंद्र चहलचा विक्रम मोडीत काढला आहे. (Photo- PTI)

2 / 5
भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच मान अर्शदीप सिंगच्या नावावर आहे. त्याने 65 सामन्यात 101 विकेट घेतल्या आहेत. आता बुमराह दुसऱ्या स्थानावर असून त्याने 77 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याच्या नावावरही 98 विकेट आहेत. तर युजवेंद्र चहलने 80 सामन्यात 96 विकेट घेतल्या आहेत. (Photo- PTI)

भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच मान अर्शदीप सिंगच्या नावावर आहे. त्याने 65 सामन्यात 101 विकेट घेतल्या आहेत. आता बुमराह दुसऱ्या स्थानावर असून त्याने 77 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याच्या नावावरही 98 विकेट आहेत. तर युजवेंद्र चहलने 80 सामन्यात 96 विकेट घेतल्या आहेत. (Photo- PTI)

3 / 5
जसप्रीत बुमराहला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पण या सामन्यातही त्याला खातं न खोलता तंबूत परतावं लागलं. यासह त्याने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अनिल कुंबळेला मागे टाकलं आहे. (Photo- PTI)

जसप्रीत बुमराहला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पण या सामन्यातही त्याला खातं न खोलता तंबूत परतावं लागलं. यासह त्याने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अनिल कुंबळेला मागे टाकलं आहे. (Photo- PTI)

4 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह 36 वेळा शून्यावर बाद झाला आहे.  या यादीत टॉपला माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आहे. झहीर खान 43 वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo- PTI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह 36 वेळा शून्यावर बाद झाला आहे. या यादीत टॉपला माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आहे. झहीर खान 43 वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo- PTI)

5 / 5
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.