AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup स्पर्धेचं 100वं वर्ष, असा आहे प्लान! अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो म्हणाले…

फिफा वर्ल्डकप स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात असून तीन सामन्यानंतर नवा विजेता कोण ते ठरणार आहे. असं असताना फिफाचे अध्यक्ष जियाने इन्फेंटिनो यांनी 2030 वर्ल्डकपबाबत एक मोठं विधान दिलं आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांची संख्या 48 वरून 64 करण्याचा मानस आहे.

| Updated on: Jul 13, 2026 | 4:23 PM
Share
फिफा वर्ल्डकप स्पर्धेचा आनंद प्रत्येक भारतीय रात्री जागून घेत आहे. पण यात भारतीय संघ नसल्याचं दु:ख देखील आहे. असं असताना फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनी यांच्या एका वक्तव्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. जियानी यांनी सांगितलं की, 2030 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत संघाची संख्या 64 केली जाण्याची शक्यता आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

फिफा वर्ल्डकप स्पर्धेचा आनंद प्रत्येक भारतीय रात्री जागून घेत आहे. पण यात भारतीय संघ नसल्याचं दु:ख देखील आहे. असं असताना फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनी यांच्या एका वक्तव्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. जियानी यांनी सांगितलं की, 2030 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत संघाची संख्या 64 केली जाण्याची शक्यता आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

1 / 6
ईएसपीएन वेबसाइटनुसार, 64 संघांच्या विश्वचषकाची शक्यता सर्वप्रथम मार्च 2025 मध्ये समोर आली होती. जेव्हा दक्षिण अमेरिकन महासंघ CONMEBOL ने 2030 च्या स्पर्धेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव दिला. कारण स्पर्धेचे शताब्दी वर्ष आहे.(PHOTO CREDIT- GETTY)

ईएसपीएन वेबसाइटनुसार, 64 संघांच्या विश्वचषकाची शक्यता सर्वप्रथम मार्च 2025 मध्ये समोर आली होती. जेव्हा दक्षिण अमेरिकन महासंघ CONMEBOL ने 2030 च्या स्पर्धेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव दिला. कारण स्पर्धेचे शताब्दी वर्ष आहे.(PHOTO CREDIT- GETTY)

2 / 6
"जेव्हा तुम्ही विश्वचषक आयोजित करता, तेव्हा तो संपूर्ण जगासाठी आयोजित करणे महत्त्वाचे असते. हे केवळ युरोप आणि दक्षिण अमेरिकेसाठी नाही, तर खऱ्या अर्थाने संपूर्ण जगासाठी आहे. प्रत्येक देशाला विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न पाहता आले पाहिजे," असे फिफा अध्यक्ष म्हणाले.(PHOTO CREDIT- Fifa World Cup Twitter)

"जेव्हा तुम्ही विश्वचषक आयोजित करता, तेव्हा तो संपूर्ण जगासाठी आयोजित करणे महत्त्वाचे असते. हे केवळ युरोप आणि दक्षिण अमेरिकेसाठी नाही, तर खऱ्या अर्थाने संपूर्ण जगासाठी आहे. प्रत्येक देशाला विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न पाहता आले पाहिजे," असे फिफा अध्यक्ष म्हणाले.(PHOTO CREDIT- Fifa World Cup Twitter)

3 / 6
फिफाने 64 संघांच्या विश्वचषक स्पर्धेल मान्यता दिल्यास एकूण 128 सामने खेळवले जातील. 1998  ते 2022 पर्यंत वापरल्या गेलेल्या 32 संघांच्या स्वरूपातील सामन्यांच्या संख्येच्या दुप्पट असेल. या वर्षीच्या स्पर्धेत 104 सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी 100 सामने खेळले गेले. (PHOTO CREDIT- Fifa World Cup Twitter)

फिफाने 64 संघांच्या विश्वचषक स्पर्धेल मान्यता दिल्यास एकूण 128 सामने खेळवले जातील. 1998 ते 2022 पर्यंत वापरल्या गेलेल्या 32 संघांच्या स्वरूपातील सामन्यांच्या संख्येच्या दुप्पट असेल. या वर्षीच्या स्पर्धेत 104 सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी 100 सामने खेळले गेले. (PHOTO CREDIT- Fifa World Cup Twitter)

4 / 6
2030 चा विश्वचषक प्रथमच बहुखंडीय स्पर्धा असेल, असं बोलले जात आहे. पहिले तीन सामने उरुग्वे, अर्जेंटिना आणि पॅराग्वे येथे  खेळवले जातील. प्रत्येक देशात एक खेळला जाणार आहे. त्यानंतर उर्वरित सामने मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये होतील. (Photo: FIFA  World Cup Twitter)

2030 चा विश्वचषक प्रथमच बहुखंडीय स्पर्धा असेल, असं बोलले जात आहे. पहिले तीन सामने उरुग्वे, अर्जेंटिना आणि पॅराग्वे येथे खेळवले जातील. प्रत्येक देशात एक खेळला जाणार आहे. त्यानंतर उर्वरित सामने मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये होतील. (Photo: FIFA World Cup Twitter)

5 / 6
भारतीय चाहत्यांसाठी ही बातमी आनंददायी आहे. कारण जेव्हा वर्ल्डकप स्पर्धेत 32 संघ खेळत होते तेव्हा आशियातून खूप कमी संघ निवडले जात होते. त्यामुळे भारताचं पात्र होणं कठीण होतं. त्यानंतर 48 संघ झाले तेव्हा भारताच्या आशा वाढल्या. आता 2030 मध्ये 64 संघ झाल्यास आशियाई देशांची संख्या वाढेल आणि भारताला संधी मिळण्याची शक्यता वाढेल. (PHOTO CREDIT- Indian Football Twitter)

भारतीय चाहत्यांसाठी ही बातमी आनंददायी आहे. कारण जेव्हा वर्ल्डकप स्पर्धेत 32 संघ खेळत होते तेव्हा आशियातून खूप कमी संघ निवडले जात होते. त्यामुळे भारताचं पात्र होणं कठीण होतं. त्यानंतर 48 संघ झाले तेव्हा भारताच्या आशा वाढल्या. आता 2030 मध्ये 64 संघ झाल्यास आशियाई देशांची संख्या वाढेल आणि भारताला संधी मिळण्याची शक्यता वाढेल. (PHOTO CREDIT- Indian Football Twitter)

6 / 6
Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश