AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Story of Shangchul Mahadev | ऐकावे ते नवलच! घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगूलांना या मंदिरात मिळतो आश्रय , पांडवांपासून सुरु आहे परंपरा

महाभारताच्या सुवर्ण पानांमध्ये भारतातील अनेक मंदिरांचे वर्णन पाहायला मिळते. त्यापैकी एक मंदिर म्हणजे 'शांगचूल महादेव'. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे या मंदिराचे रहस्य

| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 12:04 PM
Share
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हिमाचल प्रदेश हे एक उत्तम राज्य आहे. येथील हिल स्टेशन्स सर्वाच लोकांना आकर्षित करतात. निर्सगाने संपन्न असणाऱ्या या राज्याची अजून एक खासियत आहे ती म्हणजे या राज्यातील मंदिरे. या राज्यात ज्वाला देवी मंदिर, नैना देवी मंदिर, माँ हिडिंबा मंदिर, जाखू मंदिर यासारख्या अनेक प्राचीन मंदिरे आहेत. पण यांपैकी एक मंदिर या सर्वांमध्ये खास आहे. ते म्हणजे 'शांगचूल महादेव'चे मंदिर. हे स्थान प्रेम युगूलांना आश्रय देणारे स्थान म्हणून मानले जाते. हे मंदिर हिमाचल प्रदेशमधील कुल्लू येथील शांगड गावात स्थित आहे.

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हिमाचल प्रदेश हे एक उत्तम राज्य आहे. येथील हिल स्टेशन्स सर्वाच लोकांना आकर्षित करतात. निर्सगाने संपन्न असणाऱ्या या राज्याची अजून एक खासियत आहे ती म्हणजे या राज्यातील मंदिरे. या राज्यात ज्वाला देवी मंदिर, नैना देवी मंदिर, माँ हिडिंबा मंदिर, जाखू मंदिर यासारख्या अनेक प्राचीन मंदिरे आहेत. पण यांपैकी एक मंदिर या सर्वांमध्ये खास आहे. ते म्हणजे 'शांगचूल महादेव'चे मंदिर. हे स्थान प्रेम युगूलांना आश्रय देणारे स्थान म्हणून मानले जाते. हे मंदिर हिमाचल प्रदेशमधील कुल्लू येथील शांगड गावात स्थित आहे.

1 / 6
'शांगचूल महादेव'चे मंदिर शानगड गावाचे आराध्य दैवत आहे. हे मंदिर तेथे महाभारताच्या काळापासून तेथे असल्याचे पुराणात सांगितले जाते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे मंदिर  प्रेमी युगुलांना आसरा देते. येथे येणाऱ्या प्रेमी जोडप्यांना कोणीच काही करु शकत नाही. या गावातील स्थानिक त्यांना मदत करतात.  शानगड गावात अशा प्रेमळ जोडप्यांचे खूप आदरातिथ्य केले जाते.हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात बांधलेले शांगचुल महादेव मंदिराचे क्षेत्र १०० गुंठ्याच्या जमिनीवर पसरलेले आहे असे मानले जाते की महादेव स्वतः घरातून पळून या मंदिरात आलेल्या प्रेमी युगलांचे  रक्षण करतात. अशी मान्यता आहे.

'शांगचूल महादेव'चे मंदिर शानगड गावाचे आराध्य दैवत आहे. हे मंदिर तेथे महाभारताच्या काळापासून तेथे असल्याचे पुराणात सांगितले जाते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे मंदिर प्रेमी युगुलांना आसरा देते. येथे येणाऱ्या प्रेमी जोडप्यांना कोणीच काही करु शकत नाही. या गावातील स्थानिक त्यांना मदत करतात. शानगड गावात अशा प्रेमळ जोडप्यांचे खूप आदरातिथ्य केले जाते.हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात बांधलेले शांगचुल महादेव मंदिराचे क्षेत्र १०० गुंठ्याच्या जमिनीवर पसरलेले आहे असे मानले जाते की महादेव स्वतः घरातून पळून या मंदिरात आलेल्या प्रेमी युगलांचे रक्षण करतात. अशी मान्यता आहे.

2 / 6
या मंदिरात देशाच्या विविध राज्यांतून पळून आलेले प्रेमी युगुल सुरक्षिततेसाठी पोहोचतात, असे सांगितले जाते. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मंदिर प्रशासन करते. शानगड गावातील लोक त्यांचे खूप आदरातिथ्य करतात. मंदिर परिसरात पोलिसांनाही मनाई आहे. शांगचुळ महादेवाचे संपूर्ण भक्तीभावाने पालन करणाऱ्या या गावात प्रत्येक नियम व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

या मंदिरात देशाच्या विविध राज्यांतून पळून आलेले प्रेमी युगुल सुरक्षिततेसाठी पोहोचतात, असे सांगितले जाते. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मंदिर प्रशासन करते. शानगड गावातील लोक त्यांचे खूप आदरातिथ्य करतात. मंदिर परिसरात पोलिसांनाही मनाई आहे. शांगचुळ महादेवाचे संपूर्ण भक्तीभावाने पालन करणाऱ्या या गावात प्रत्येक नियम व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

3 / 6
महाभारत काळातील या मंदिराबाबत असे मानले जाते की पांडवांना वनवास देण्यात आला तेव्हा ते या गावात आले आणि गावकऱ्यांनी त्यांना आश्रय दिला. जेव्हा कौरव त्यांच्या शोधात येथे येत होते, तेव्हा शांगचूल महादेवाने त्यांना गावात येण्यापासून रोखले होते आणि सांगितले होते की जे लोक त्यांच्या आश्रयाला येतील ते त्यांचे रक्षण करतील. अशा विश्वासामुळे गावकरी आश्रयाला आलेल्या रसिकांना खूप मान देतात. या गावात  भांडणे तर दूरच, कोणीही मोठ्या आवाजात बोलू शकत नाही.

महाभारत काळातील या मंदिराबाबत असे मानले जाते की पांडवांना वनवास देण्यात आला तेव्हा ते या गावात आले आणि गावकऱ्यांनी त्यांना आश्रय दिला. जेव्हा कौरव त्यांच्या शोधात येथे येत होते, तेव्हा शांगचूल महादेवाने त्यांना गावात येण्यापासून रोखले होते आणि सांगितले होते की जे लोक त्यांच्या आश्रयाला येतील ते त्यांचे रक्षण करतील. अशा विश्वासामुळे गावकरी आश्रयाला आलेल्या रसिकांना खूप मान देतात. या गावात भांडणे तर दूरच, कोणीही मोठ्या आवाजात बोलू शकत नाही.

4 / 6
2015 मध्ये मध्यरात्री अचानक आग लागून मंदिर आणि 20 मूर्तींसह 3 घरे जळून खाक झाली. पण पुन्हा हे मंदिर बांधण्यात आले. द्वापर युगातही पांडवांच्या काळात बांधलेले हे शांगचूल महादेवाचे मंदिर जळून राख झाल्याचे सांगितले जाते.

2015 मध्ये मध्यरात्री अचानक आग लागून मंदिर आणि 20 मूर्तींसह 3 घरे जळून खाक झाली. पण पुन्हा हे मंदिर बांधण्यात आले. द्वापर युगातही पांडवांच्या काळात बांधलेले हे शांगचूल महादेवाचे मंदिर जळून राख झाल्याचे सांगितले जाते.

5 / 6
 लग्नात अडथळे येणारे तरुणही इथे पोहोचतात. या मंदिरातही तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता. मंदिराभोवती संपूर्ण गावात हिरवळ पाहायला मिळेल. येथील हिरवळ तुमच्या मनावर कायमची कोरली जाईल.

लग्नात अडथळे येणारे तरुणही इथे पोहोचतात. या मंदिरातही तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता. मंदिराभोवती संपूर्ण गावात हिरवळ पाहायला मिळेल. येथील हिरवळ तुमच्या मनावर कायमची कोरली जाईल.

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.