आदित्य ठाकरे हे अलिबागच्या दौऱ्यावर आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून आरोप- प्रत्यारोपाचं राजकारण दिसून येत आहे. आदित्य ठाकरे यांना जबरदस्तीने सभा भरवावी लागत असल्याचा टोला शिंदे गटाचे रायगड उत्तर जिल्ह्याध्यक्ष राजा कोणी यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी सभा जबरदस्ती भरवली आहे. त्यांच्यांवर या मेळाव्याला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते बोलावण्याची वेळ आली आहे. आदित्य ठाकरे यांनी आलिबागवरून शिंदे गटावर निशाना साधल जोरदार टिका देखील केलीयं.