नाशिक : राज्य सरकारकडून किराणा दुकानात वाईनच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान आता मंत्री छगन भुजबळ यांनी देखील विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. वाईनच्या मुद्द्यावरून उपोषण करणारे सात वर्ष कुठे होते असा सवाल त्यांनी केलाय? पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, नोटबंदी, जीएसटी यामुळे लाखो लोक बरोजगार झाले तेव्हा आता उपोषण करणारे कुठे होते? अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.