विरोधक राज्य अस्थिर करू पाहत आहे का? असा सवाल केला असता महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे वारंवार प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. जेव्हापासून महाराष्ट्रात आमचं सरकार आलं. तेव्हापासून विरोधक खूश नाहीत. त्यामुळे या ना त्या कारणाने सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार पाडण्याची त्यांची टॅक्टिस सुरू आहे, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.