कोल्हापुरातील पंचगंगा नदी ही अखेर पाच दिवसानंतर धोका पातळीच्या खाली आली आहे. पावसाने उघडीप दिल्याने नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने घट होतेय. नदीची पाणीपातळी सध्या 41 फुटांवर आहे. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे देखील बंद झाले आहेत. हळूहळू वाहतूकही सुरळीत होतेय. मात्र, अद्याप 47 बंधारे पाण्याखाली आहेत. 9 राज्य मार्ग अजूनही बंदच आहेत.