मुंबई – मुंबईकरांच्या चिंतेत वाढ करणारी बातमी आहे. मुंबईतील हवेचा दर्जा प्रचंड घसरला असून, हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबईचा एअर क्वॉलेटी इंडेक्स 345 वर पोहोचला आहे. मुंबईतील हवा प्रदूषणात दिल्ली पेक्षाही जास्त वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण आणि वाहनांच्या अतिवापरामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सफर संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.