टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यभरातून नाराजीचा सूर होता. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखर (Natrajan Chandrashekhar) यांना पत्र लिहिलं आहे. टाटा समुहाने नागपुरातील मिहानमध्ये एव्हिएशन हब उभारावं, अशी विनंती करणारं पत्र गडकरींनी लिहिलं आहे. त्यामुळे टाटा ग्रुप गडकरींची ही मागणी मान्य करतं का? हे पाहणं महत्वाचं असेल.