RCB | अखेर पुन्हा लाल झेंडा फडकला! सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर RCB चा कब्जा
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) दमदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत आरसीबीने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) दमदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत आरसीबीने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 155 धावांची मजल मारली आणि आरसीबीसमोर 156 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात आरसीबीने हे लक्ष्य 18 षटकांत 5 विकेट्स गमावून पूर्ण केले.
आरसीबीच्या विजयात स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. विराटने नाबाद 75 धावांची शानदार खेळी करत संघाचा विजय जवळपास एकहाती निश्चित केला. त्याला टीम डेव्हिडने 24 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली, तर जितेश शर्मासोबतच्या भागीदारीने आरसीबीचा विजय शिक्कामोर्तब केला.
गुजरातकडून राशिद खानने नवव्या षटकात रजत पाटीदार आणि कृणाल पंड्या यांना बाद करत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट कोहलीच्या संयमी आणि आक्रमक खेळीसमोर गुजरातचे प्रयत्न अपुरे ठरले. या विजयासह आरसीबीने आयपीएल इतिहासातील एक महत्त्वाचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा आरसीबी हा चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी Chennai Super Kings, Mumbai Indians आणि Kolkata Knight Riders यांनी ही कामगिरी केली होती.
तसेच 2018 पासून सुरू असलेली ‘क्वालिफायर-1 विजेता संघच आयपीएल चॅम्पियन’ ही परंपराही आरसीबीने कायम राखली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आरसीबीच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
