मुंबई : महाविकास आघाडी सरकारला खिंडार पाडून सत्तेत आलेल्या शिंदे वर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निशाना साधला आहे. यावेळी त्यांनी बोलताना शिवसेना कमबॅक करणार करेल असा विश्वास दाखवला आहे. तर हे सरकार लवकरच पडेल. तसेच या सरकारमध्ये निष्ठेला कोठेही स्थान देण्यात आलेलं नाही असं ही आदित्य ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर जे शिवसेनेतून गेले, जे गद्दार म्हणून गेले त्यांचीतर तेथे किंमतच उरलेली नाही असा घनाघात पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.