नुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत आणि धान्य, उद्यापासून मदतीचं वाटप करणार अ्सल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने मोठं नुकसान झालं आहे. १६९ जणांचा अतिवृष्टी आणि घडफूटीत मृत्यू, आणि ५५ जखमी, एक बेपत्ता आहे. जवळपास १८०० कोटी रुपयांचं रस्त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर ४ लाख हेक्टर शेतीचं नुकसान आहे. हा आकडा आणखी तीनपट वाढण्याची शक्यता असल्याची भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.