Maharashtra News LIVE : ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळणार
Maharashtra News LIVE : मान्सूनने हुलकावणी दिली आहे. मान्सून उद्या राज्यात सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. तर आज नवी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे.

Maharashtra News LIVE : मान्सूनने हुलकावणी दिल्याने आणि तो वेळेत दाखल न झाल्याने शेतकर्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. मान्सून उद्यापासून राज्यात सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. तर काही ठिकाणी येत्या 10 जूनपर्यंत दमदार पावसाची शक्यता आहे. तर उद्या दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके हे अमेरिकेतून थेट दिल्ली विमानतळावर दाखल होतील आणि तिथून ते मैदानावर जाणार असल्याचे समजते. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 6 जागा बिनविरोध निवडून आणण्यात महायुतीला मोठे यश आले आहे. तर उर्वरीत 11 ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने असेल. मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय होत असले तरी शासन निर्णयाचा कागद हाती आला नसल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
LIVE NEWS & UPDATES
-
जामनेरमध्ये पोलिसांकडून बनावट बियाण्याचा 9 लाख 15 हजार रुपयांचा साठा जप्त
जळगावच्या जामनेर येथे पोलिसांकडून बनावट बियाण्याचा 9 लाख 15 हजार रुपयांचा साठा जप्त.
बनावट व अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश
जामनेरमधील दीपक चौधरी यांच्या राहत्या घरात अनधिकृतरित्या कापूस बियाण्यांचा साठा करून त्याची विक्री होत होती.
कारवाईत एकूण बनावट बियाण्यांच्या 40 गोण्या आणि 1 हजार 16 पॅकेट्स जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात 7 आरोपींविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
सांगली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी
सांगली जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सांगलीसह मिरजमध्ये देखील पाऊस झाला आहे. सांगली जिल्ह्यात अजूनही चांगलाच उकाडा जाणवत आहे. परंतु आता पाऊस पडल्यानं हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
-
-
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पैठणचे आमदार विलास भुमरे बिनविरोध
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पैठणचे आमदार विलास भुमरे बिनविरोध
आमदार विलास भुमरे यांच्या विरोधात कोणताही अर्ज न आल्याने बँकेवर संचालक म्हणून भुमरे बिनविरोध
छत्रपती संभाजीनगर येथील संपर्क कार्यालयाबाहेर आमदार भुमरेंच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
-
आशुतोष दीक्षित हे हवाई दलाचे पुढील उपप्रमुख असतील
निष्णात लढाऊ आणि चाचणी वैमानिक, एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1 जुलै रोजी आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारतील.
-
ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळणार
ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळतील, असा निर्णय सरकारने घेतला आहे. मराठा समाजासाठी 8 योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना मिळणार आहे.
-
-
राहुल गांधी यांच्यावरील मानहानीच्या खटल्यातील युक्तिवाद 25 जून रोजी होणार
सुलतानपूर: राहुल गांधी यांच्यावरील मानहानीच्या खटल्याची सुनावणी आता 25 जून रोजी होणार आहे. सीडीवरील आवाजांच्या जुळवणीवर चर्चा केंद्रित होणार होती. भाजप नेते विजय यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. मूळ सुनावणी 17 जून रोजी होणार आहे.
-
जिल्हा बँकेची निवडणूक लढवायची असल्याने माघार- डोणगावकर
जिल्हा बँकेची निवडणूक लढवायची असल्याने माघार घ्यावी लागली असं कृष्णा डोणगावकर यांनी सांगितलं. विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ठाकरे सेनेत असल्याने सत्ताधारी पक्षाचा त्रास असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. माझं भाजपाशी जमत नाही आणि शिवसेनेला शिवसेनाच पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलं. डोणगावकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची आता चर्चा रंगली आहे.
-
मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर
मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर करण्यात आली आहे. 8 जिल्ह्यातील 34 व्यक्तीच्या कायदेशीर वारसदारांना मदत दिली जाणार आहे. 10 लाख रुपयांप्रमाणे 3 कोटी 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
-
राऊत पैसे मोजायला होते का? उपमुख्यमंत्र्यांची टीका
भाजपाकडे पुरेसं संख्याबळ असताना घोडेबाजार का? असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आता राऊत पैसे मोजायला होते का? असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
-
खासदार श्रीकांत शिंदे यांचा धुळ्यात शिव संवाद दौरा
शिव संवाद दौऱ्यानिमित्त खासदार श्रीकांत शिंदे धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, साक्री त्याचबरोबर धुळे ग्रामीण आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा घेणार आहेत. या दौऱ्यानिमित्त श्रीकांत शिंदे कार्यकर्त्यांशी काय संवाद साधणार याकडे लक्ष लागले आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन म्हणजे ‘सौ चूहे खाके बिल्ली हज को चली – सदाभाऊ खोत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महागाई विरोधातले आंदोलन म्हणजे ‘सौ चूहे खाके बिल्ली हज को चली’ अशातला प्रकार आहे अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर केली आहे.
-
महायुती मजबूतीने यशस्वीपणे वाटचाल करत आहे – एकनाथ शिंदे
महायुतीच्या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महायुती मजबूतीने यशस्वीपणे वाटचाल करत आहे. मविआत बिघाडी सुरु असून कोणाचा कोणाशी ताळमेळ नसल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
-
करमाळा : 12 जून रोजी ‘मशाल आंदोलन’ करण्याचा इशारा
करमाळा तालुक्यातील सावडी येथे रात्रीच्या वेळी होणाऱ्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही वेळ बदलून रात्री पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करावा, अन्यथा 12 जून 2026 रोजी महावितरण कार्यालयासमोर ‘मशाल आंदोलन’ केले जाईल, असा इशारा जनशक्ती संघटनेचे तालुका उपाध्यक्ष शरद किसान एकाड पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यासंदर्भातील निवेदन आज महावितरण, करमाळा तहसील व करमाळा पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले.
-
यवतमाळ : मोहूर्ली ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप
यवतमाळच्या वणी तालुक्यातील मोहूर्ली ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. मोहूर्ली ग्रामपंचायतीची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रशासकीय सदस्यांनी गावातील विकासकामे, खर्च तसेच इतर कामकाजाची माहिती सरपंच व सचिवांकडे मागितली मात्र, संबंधितांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
-
पिंपरी चिंचवड : आज चादर विकली उद्या बॉम्ब विकतील, व्यापाऱ्यांचा संताप
पाकिस्तानी चादर विक्री प्रकरणानंतर मोरया गोसावी मंदिर परिसरातील व्यावसायिक चांगलेच संतापले आहेत. या परिसरात बेकायदेशीर फेरीवाले विक्रेत्यांना प्रवेश दिला जाऊ नये अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. आज चादर ठेवली उद्या काहीही ठेवतील, त्यांना इथ प्रवेश नको असं व्यापारी सांगत आहेत.
-
बुलढाणा : IMA च्या शाखेत आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) बुलढाणा शाखेच्या नावाने बनावट लेटरहेड, शिक्के आणि पदाचा गैरवापर करून आर्थिक अपहार केल्याप्रकरणी डॉ. अजित सिरसाठ तसेच डॉ. गजेंद्र निकम यांच्याविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. फिर्यादी डॉ. जादुसिंग राजपूत यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी अधिकृत पदावर नसतानाही अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवत संस्थेच्या नावाने पत्रव्यवहार केला आणि बँक व्यवहारात हस्तक्षेप केला. IMA च्या खात्यातून 3 लाख 23 हजार 716 रुपयांच्या अपहाराचा आरोप असून न्यायालयाच्या आदेशानंतर विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
-
महायुतीचे उमेदवार विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड, विजयी जल्लोष
महायुतीचे उमेदवार विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी विजयाचा जल्लोष होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत अनेक पदाधिकारी या जल्लोषात सहभागी झाले.
-
आयटीआय विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; आंबेगाव तालुक्यात खळबळ
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. गोणवडी येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्याने चाकूने भोसकून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घोडेगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
-
रोहित पवार गिरगाव मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल
रोहित पवार गिरगाव मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाडही कोर्टासमोर हजर राहिले होते. 2025 च्या आझाद मैदानातील आंदोलनाबाबत हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.
-
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या नेतृत्वात थोडा बदल केला पाहिजे – नितेश राणे.
हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या नेतृत्वात थोडा बदल केला पाहिजे. 40-50 आमदार जाऊनही जर ते शिकले नसतील तर बिनविरोधची मालिका बंदच होणार नाही. ही चूक त्यांची आहे, आमचं नाही त्यात काही – नितेश राणेंनी लगावला टोला.
-
संजय राऊत व्यवहारांचे आरोप करतात, त्यांनी पुरावे द्यावेत – नितेश राणे
संजय राऊत हे मोठे नेते आहेत, त्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावं. त्यांनी व्यवहारांचे आरोप केलेत, तर त्याचे पुरावे द्यावेत – नितेश राणे यांची मागणी
-
मी फक्त प्रतिनिधी, खरे रणनीतीकार देवेंद्र फडणवीस -नितेश राणे
मी फक्त प्रतिनिधी, खरे रणनीतीकार देवेंद्र फडणवीस आहेत. जी जबाबदारी मला दिली ती मी पूर्ण केली. ठरलेल्या रणनीतीची अंमलबजावणी करण्याचे काम मी केले – नितेश राणे
-
नाशिक – उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून प्रचाराला सुरुवात
नाशिक – पक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून प्रचाराला सुरुवात. एकीकडे गोकुळ गीते यांच्या पाठिंबासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक तर दुसरीकडे गोकुळ गीते प्रचारात व्यस्त आहेत. माघारीचा विषय संपला आता माघार घेणार नाही गोकुळ गीते या भूमिकेवर ठाम आहेत. महायुतीतील नेत्यांनी भेटीगाठीसाठी बोलावल्यास जाणार, मात्र माघार घेणार नाही असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना विनंती करतो त्यांनी नेमलेल्या निष्क्रिय उमेदवाराचा पाठिंबा मला द्यावा आणि महायुतीचा पुरस्कृत उमेदवार घोषित करावा.
-
भर पावसाळ्याच्या तोंडावर देखील जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील जालना जिल्ह्यात पाणीटंचाईच्या भीषण स्वरूप पाहायला मिळत आहे, जिल्ह्यातील 48 गावे आणि 31 वाड्यांमध्ये प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून दररोज 79 टँकरच्या जवळपास 154 खेपा सुरू असल्याची आकडेवारी प्रशासनाने दिली. शिवाय जालना जिल्ह्यातल्या 1 लाख 32 हजार नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचं भीषण वास्तव प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आलं. बदनापूर तालुक्यात पाणीटंचाईची दाहकता सर्वाधिक पाहायला मिळत आहे, अजूनही अनेक नागरिकांना आपल्या घरासमोर टाक्या आणि ड्रम ठेवून पाणी भरावे लागत असल्याचे चित्र बदनापूर तालुक्यातल्या चिखली गावात पाहायला मिळाले.
-
नागपुरात मनपाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात काँग्रेसचे आंदोलन
हालातील गांधी झोन कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. फायरची एनओसी नसताना मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम करून लोकांचे जीव धोका आणण्याचा काम भ्रष्ट अधिकारी करत असल्याचा आरोप आहे.
-
आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्राचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती नियमबाह्य-माहिती अधिकारात धक्कादायक माहिती
आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या नियुक्ती संदर्भात माहिती अधिकारात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीड मधील माहिती अधिकार कार्यकर्ते शुभम शिंदे यांनी वकिलासोबत यासंदर्भात बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती नियमबाह्य असून आरोग्य मंत्री यांची सही न घेताच मुख्यमंत्र्यांची सही घेतल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे आरोग्यमंत्र्यांच्या टेबल वरून फाईल मुख्यमंत्र्याच्या टेबलवर सहा मिनिटांत जाते आणि आरोग्यमंत्र्याची सही न होताच मुख्यमंत्र्यांची सही घेतली जाते. यावर त्यांनी शंका उपस्थित केली आहे.
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी,घोषणाबाजी करत सरकारचा निषेध
जालना जिल्ह्यातल्या परतुर तालुक्यातील सातोना येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. या कर्जमाफीच्या शासन निर्णयामधील जाचक अटीमुळे फक्त 5 टक्के शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरणार आहेत. उर्वरित 95 टक्के शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी योजना नसून ही कर्ज वसुली योजना असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला.
-
फुगेवाडीतील बेकायदेशीर दारू अड्डा उद्ध्वस्त, पालिकेच्या धडक कारवाईने नागरिकांमध्ये समाधान.
पिंपरी-चिंचवड: फुगेवाडी येथील विषारी दारू प्रकरणात १२ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला दारू विक्रेता कर्नल सिंग विरखा याच्या बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अत्यंत संवेदनशील असलेल्या या कारवाईसाठी आज प्रशासनाकडून ट्रॅक्टर ब्रेकरचाही वापर करण्यात येत असून, आज सायंकाळपर्यंत हे संपूर्ण घर आणि दारू अड्डा जमीनदोस्त केला जाणार आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या मुख्य आरोपीच्या घरावर अखेर महापालिकेचा हातोडा चालल्याने फुगेवाडी परिसरात आणि पीडित कुटुंबांकडून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.
-
सत्ताधाऱ्यांकडे पैसा असला तरी विजय माझाच, शरद तायडेंचा दावा
जळगाव विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेले महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे यांनी निवडणुकीत विजयाचा मोठा विश्वास व्यक्त केला आहे. एका विशेष मुलाखतीत (वन टू वन) बोलताना तायडे म्हणाले की, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव होता, मात्र मी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि संजय सावंत यांचे आशीर्वाद घेतले. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत भांडणाचा आणि बंडखोरीचा आपल्याला मोठा फायदा होईल, असा दावा त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांकडे सत्ता आणि पैसा असला तरी महायुतीतील अनेक नाराज नगरसेवक आणि पदाधिकारी आपल्या संपर्कात असून, ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ याप्रमाणे आपला विजय निश्चित आहे, असे शरद तायडे यांनी स्पष्ट केले.
-
सोलापूर विधान परिषदेत मविआमध्ये मोठी फूट, उत्तम जानकरांचा मतदानावर बहिष्कार; मोहिते-पाटलांवर गंभीर आरोप
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतनाना देशमुख यांच्या उमेदवारीवरून मविआमध्ये मोठी फूट पडल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा थेट निर्णय घेतला आहे. “मोहिते-पाटलांनी वसंतनाना देशमुख यांचे नाव जाहीर करून आमचा केसाने गळा कापला आहे,” असा गंभीर आरोप जानकर यांनी केला. ज्या व्यक्तीला साधी जिल्हा परिषदेची जागा निवडून आणता येत नाही, अशा अक्षम उमेदवाराला उमेदवारी देऊन मोहिते-पाटलांनी ही निवडणूक भाजपसाठी बिनविरोध केल्यासारखाच निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. सोलापूर जिल्ह्यातील आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, नारायण आबा पाटील यांसारखे शरद पवार गटाचे सर्वच मातब्बर नेते या उमेदवारीवर तीव्र नाराज असून, आम्ही कोणीही वसंतनाना देशमुख यांच्यासोबत नसल्याचे आमदार उत्तम जानकर यांनी स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
-
उर्वरित ११ जागा महायुती चांगल्या मतांनी जिंकणार, शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला विश्वास
सर्व बेरीज पाहता महाविकासआघाडीचा टिकाव लागू शकत नाही. उर्वरित ११ जागा महायुती चांगल्या मतांनी जिंकणार अशा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. संख्याबेरीज पाहता बाळ मानेंनी अर्ज मागे घेतला, असेही शंभूराज देसाई म्हणाले
-
अजित पवारांच्या आशीर्वादाने जागा बिनविरोध; महाराष्ट्राला नवी दिशा देण्यास महायुती सक्षम: डॉ. अभिजित मोरे
विधान परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या दोन्ही जागा बिनविरोध निवडून आल्याने महायुतीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या आशीर्वादामुळे, तसेच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वावरील विश्वासामुळेच हे यश मिळाल्याचे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली असून मविआचा कार्यकर्ता आता तळागाळात सक्रिय राहिलेला नाही. मविआचे तिन्ही पक्ष कमकुवत झाले असून राज्यात सक्षम विरोधी पक्षच उरलेला नाही. येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा लौकिक अधिक उंचावण्यासाठी आणि राज्याला नवी दिशा देण्यासाठी महायुती सरकार पूर्णपणे सक्षम असल्याचे डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले.
-
सर्व 17 जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी होतील : संजय शिरसाठ
महायुती किती भक्कम आहे हे आता दिसून येईल. सर्व १७ जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी होतील, महाविकासआघाडीच्या ज्या उमेदवारांनी माघार घेतली तिथे त्यांनी आरोप केले, असे संजय शिरसाठ म्हणाले.
-
ठाकरे सेनेतून हकालपट्टी झालेले बाळ माने नारायण राणेंच्या भेटीला
ठाकरे सेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले माजी आमदार बाळ माने हे भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांच्यासोबत चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली असून, ते लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईनंतर बाळ माने यांनी थेट राणे आणि भाजप नेत्यांशी संपर्क साधल्याने, ते लवकरच भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
-
वाशिम जिल्ह्यात खरिपाच्या तोंडावर खताचा तीव्र तुटवडा; शेतकरी चिंतेत
वाशिम: खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच वाशिम जिल्ह्यात ‘डीएपी’ (DAP) खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यासाठी एकूण १२ हजार ८०० मेट्रिक टन डीएपी खताची मागणी असताना, आतापर्यंत केवळ ४ हजार १०० मेट्रिक टन म्हणजेच मागणीच्या तुलनेत तब्बल ६८ टक्के कमी पुरवठा झाला आहे. सद्यस्थितीत दुकानांमध्ये विक्रीसाठी केवळ १०८ मेट्रिक टन डीएपी शिल्लक राहिल्याने अनेक कृषी सेवा केंद्रांमधील स्टॉक संपला असून शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. जिल्ह्यात इतर खतांचा पुरवठा सुरळीत असला, तरी पेरणीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या डीएपीच्या भीषण टंचाईमुळे शेतीचे गणित कोलमडण्याची भीती आहे. त्यामुळे खरीप पेरणीपूर्वी प्रशासनाने तातडीने डीएपी खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
-
मी त्यांची माफी मागते, माझी उमेदवारी कायम राहील – रेश्मा काळे
जळगावच्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांची उमेदवारी कायम आहे. शेवटपर्यंत लढाई लढणार असून या लढाईमध्ये लाडक्या बहिणी आणि लाडक्या भाऊ माझ्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास रेशमा काळे यांनी व्यक्त केला. नेत्यांनी कितीही समजून घालण्याचा प्रयत्न केला तरी मी त्यांची माफी मागते, माझी उमेदवारी कायम राहील मी कुणालाही पाठिंबा देणार नाही असं रेश्मा काळे म्हणाल्या.
-
‘एक पेड माँ के नाम’ पर्यावरण जपण्याचा एक आगळावेगळा उपक्रम
दहिसर विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार मनीषा चौधरी यांच्या पुढाकाराने पर्यावरण जपण्याचा एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक पेड माँ के नाम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात चित्रपटसृष्टीतील कलाकारांसोबत मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वांनी मिळून वृक्षारोपण करत ‘आईच्या नावाने एक झाड’ लावण्याचा संकल्प केला.
-
अंबरनाथमध्ये घराच्या टेरेसमध्ये अनधिकृत कबुतरखाना
अंबरनाथमध्ये घराच्या टेरेसमध्ये सुरू केला अनधिकृत कबुतरखाना. कबुतरांची लाखो रुपयांना विक्री होत असल्याचा आरोप. कारवाई करण्याची नगरसेविका अर्चना रसाळ यांची मागणी.
-
परभणी रेल्वे दुहेरीकरणाच्या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध..
गंगाखेड रेल्वे स्टेशनं वर रेल्वे दुहेरीकरच्या विरोधात रेल रोको आंदोलन करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी स्टेशन बाहेरच रोखलं..शेतकऱ्यांची रेल्वे स्टेशनच्या बाहेर रेल्वे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. रेल्वे स्टेशन बाहेर काही काळ तणावाचं वातावरण..
-
शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू
गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलना दुसऱ्या दिवशीही सुरू_ मोठ्या संख्येत शेतकऱ्यांनी या आंदोलनाला मुक्कामी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहेत. विमानतळ जमीन अधिग्रहणाच्या विरोधात 14 गावातील शेतकरी विरोध करीत आहेत. एमआयडीसी विमानतळ नको आमची सुपीक जमीन आम्हालाच राहू द्या_ अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सुरू असलेला अधिग्रहण प्रक्रिया रद्द करण्यात यावी शेतकऱ्यांची मागणी
-
मतीन पटेलची आयटी कंपनी लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात तिसऱ्यांदा चौकशी
तब्बल सहा तास विशेष पथकाकडून करण्यात आली चौकशी. संशयित आरोपी निदा खान हिला हनीफ खान याच्या घराची चावी मतीन पटेल यानेच उपलब्ध दिली होती करून. नंतर निदाने हनीफच्या घरात आश्रय घेतल्याचे तपासात उघड. निदाला आश्रय देण्यात माझा संबंध नाही, मी निदाला ओळखत नाही मतीन पटेल ने दिली होती अशी माहिती. मात्र, निदा खान आणि मतीन पटेल यांचा संपर्क नेमका कधी, कुठे आणि कोणाच्या माध्यमातून झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही
-
उमेदवारी कायमच ठेऊन पाठिंबा द्या.. नाशिकमध्ये मोठ्या घडामोडी..
नाशिक विधान परिषदेमध्ये मोठी ट्वविस्ट आलाय. उमेदवारी कायम ठेऊन दराडेंना पाठिंबा द्या, असे शिंदेंच्या शिवसेनेचे म्हणणे आहे. गीते यांनी शेवटपर्यंत अर्ज मागे घेतला नाही. त्यामध्येच आता ही मागणी करण्यात आली.
-
आज मुंबईत संमिश्र वातावरण कुठे ढगाळ तर कुठे कडक ऊन
आज मुंबईत संमिश्र वातावरण कुठे ढगाळ तर कुठे कडक ऊन असेल. वातावरणातील आद्रता वाढली आहे. उद्या आणि परवा पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मान्सूनने केरळ किनारपट्टीवर दाखल, गाठली, येत्या 48 तासांत गोवा, कर्नाटक आणि तळ कोकणात प्रवेश होण्याची शक्यता आहे. 10 जूनपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून पोहोचेल, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. 5 आणि 6 जून रोजी कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि डहाणू परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून येणारे दमदार पश्चिमेकडील वारे सक्रिय झाल्यामुळे वातावरणात मोठे बदल होणार आहेत.
-
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध आले आहेत. नाबार्डच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सहा महिन्यांत पुनरुज्जीवन आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
नाशिक मधील नंदिनी नदी महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार- मंत्री गिरीश महाजन
नंदिनी नदी स्वच्छ करण्यासाठी आपण आलो आहोत. नाशिक चे नावलौकिक जगभरात आहे. दहा बारा पंधरा हजार स्वयंसेवक आहे. आपली नदी स्वच्छ असावी प्रत्येकाची जबाबदारी आहे. कुंभमेळ्यासाठी जगभरातून लोक येतील त्यांनी कौतुक केले पाहिजे. कायम स्वरुपी आपल्याला नाशिक स्वच्छ सुंदर ठेवायचे आहे. आपल्या हे काम करायचे आहे. पर्यावन दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
-
मी भाजपमध्ये आजही आहे आणि उद्याही राहील-प्रसाद हिरे
मी भाजपमध्ये आजही आहे आणि उद्याही राहील, असे वक्तव्य MLC नाशिक उमेदवार प्रसाद हिरे यांनी केले आहे. कर्मवीर भाऊसाहेब हिरेंचा व बळीराम हिरे यांचा मला वारसा आहे. मला दृढनिष्ठ आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीशजी महाजन यांची आहे. विधान परिषदेचे निवडणुकीत मी यशस्वी होईल. माझ्यामागे अनेक ताकदी उभ्या आहेत. ही निवडणूक मी फार मताधिक्याने निवडणार आहे. शिंदे सेनेने दिलेला उमेदवार, नाराजी मला जाणवली. नाराजीला तोंड फोडण्यासाठी मी उमेदवारी करण्याचा निर्णय केल्याचे ते म्हणाले.
-
फुगेवाडी मधील विषारी दारु अड्ड्यावरील कारवाई आज ही सुरूच राहणार
विषारी दारुकांडाचा अड्डा असलेला पिंपरी चिंचवडमधील केंद्रबिंदू आज ही तोडण्याची कारवाई सुरूच राहणार आहे. फुगेवाडीत निमुळते रस्ते असल्यानं जेसीबी आणि पोकलेन सारखी मशनरी इथं पोहचू शकत नाही. परिणामी हॅन्ड ब्रेकर आणि हतोड्याच्या साह्याने हे पाडकाम हाताने केलं जातंय. हे आव्हान यंत्रणेसमोर असल्यानं कर्नेलसिंगचं घर आणि त्या घरातील दारुअड्डा जमीनदोस्त करायला उशीर होतोय. काल काही प्रमाणात हा दारू अड्डा तोडण्यात प्रशासनाला यश आलं होतं,आज पूर्ण घर तोडण्याची शक्यता
-
भाजयुमोकडून ‘पेडल फॉर प्लॅनेट’चे आयोजन
बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजयुमो मुंबईतर्फे ‘पेडल फॉर प्लॅनेट (ग्रँड सायक्लोथॉन)’चे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन,आरोग्य जागरूकता आणि हरित भविष्याचा संकल्प यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे ‘पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन’ या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम विविध लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार, कलाकार उपस्थित राहून युवकांना प्रोत्साहन देणार आहेत.
-
रांजणगाव गणपती येथे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली
रांजणगाव गणपती येथे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. धावत्या एसटी बसमधून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. जीव वाचवण्यासाठी अनेक प्रवाशांनी तातडीने बसमधून उड्या मारल्याची घटना घडली. अहिल्यानगरहून पुण्याकडे जाणारी एसटी बस रांजणगाव गणपती येथील अमर इन हॉटेलसमोर पोहोचली असताना बसमधून अचानक धूर निघू लागला. धूर दिसताच बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.बस चालकाने बस थांबविली आणि काही प्रवाशांनी तातडीने बसमधून खाली उड्या मारत स्वतःचा जीव वाचवला.
Published On - Jun 05,2026 8:04 AM
