Maharashtra Election News LIVE : भाजपच्या गणेश नाईक आणि शिंदेसेनेत पुन्हा खडाजंगी
77th Republic Day Parade Live Updates in Marathi : आजच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सुरुवात 10.30 वाजता होईल. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीद वीरांना श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर परेडसाठी कर्तव्य पथावर पोहोचतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, युरोपीय परिषद आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष पारंपारिक बग्गी मधून येतील.

आज भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन आहे. याच दिवशी देशात संविधान लागू झालं होतं. कर्तव्य पथावर आज देशाच्या सैन्य शक्तीचा अनोखा संगम पहायला मिळेल. राफेल, सुखोई, जॅग्वार ही फायटर विमानं आपलं कौशल्य सादर करतील. त्याशिवाय देशातील सांस्कृतिक परंपरा आणि सैन्य ताकद यांनी शानदार झलक पहायला मिळेल. कर्तव्य पथासह संपूर्ण दिल्लीत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 10,000 जवान ड्युटीवर तैनात आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला युरोपियन परिषदेच्या अध्यक्ष एंटोनियो कोस्टा आणि यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन प्रमुख पाहुणे आहेत. हे वर्ष यासाठी सुद्धा खास आहे की, यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. कर्तव्य पथाला भव्यतेने सजवण्यात आलं आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
मुंबईकडे पायी निघालेल्या लाँग मार्चमधील आंदोलकांच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन दाखल
मुंबईकडे पायी निघालेल्या लाँग मार्चमधील आंदोलकांच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन दाखल
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पिंपरी फाटा येथे आंदोलकांची घेतली भेट
आज दुपारी केली होती मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा, त्यानंतर आता घेणार भेट
लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं निघाला
-
सलग तीन दिवस सुट्ट्या, वसई, विरारच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी
सलग तीन दिवस सुट्ट्या, वसई, विरारच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी
सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासह समुद्र किनाऱ्यावर
लहान मुल, जेष्ठ नागरिकांची देखील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी
वसई विरार महापालिकेचे तटरक्षक दलही तैनात
-
-
हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने
हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने
मुंबई – आग्रा महामार्गवरून पायी चालत हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना
मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर उद्या चार वाजता मुंबईत बैठक
मात्र तरही आंदोलक मुंबईकडे रवाना
-
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर दौऱ्यावर
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर दौऱ्यावर
नगरपालिका निवडणुकांनंतर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सोलापूर दौऱ्यावर
28 जानेवारी रोजी अक्कलकोटमध्ये घेणार जाहीर सभा
सभांसोबतच घेणार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आढावा
-
कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर, राऊत भडकले
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यानंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना भाजपाकडून सन्मान मिळाल्याचं राऊत यांनी सांगितलं. दुसरीकडे, काही छोट्या मनाचे लोक विवाद निर्माण करत असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
-
-
अंबादास दानवेंची आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरु झाली आहे- सामंत
अंबादास दानवे यांची आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरू झाल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. अंबादास दानवे थोड्याच दिवसात आमच्यासोबत असू शकतात असं त्यांनी सांगितल्याने खळबळ उडाली आहे. सामंतांनी त्यांच्याकडे येण्याची प्रोसेस विस्तृतरित्या सांगावी असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.
-
भाजपच्या गणेश नाईक आणि शिंदेसेनेत पुन्हा खडाजंगी
भाजपा नेते आणि मंत्री गणेश नाईक आणि शिंदेसेनेत पुन्हा एकदा खडाजंगी पाहायला मिळत आहे. ‘भाजपनं परवानगी दिली तर नामोनिशाण मिटवू’, ठाण्यातून गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे. दुसरीकडे, आम्ही बोललो तर विषय देशपातळीवर जाईल, असं शिरसाट म्हणाले आहेत.
-
ही तर फक्त सुरुवात आहे… बरेली शहर दंडाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद व्यक्त झाले
बरेलीचे शहर दंडाधिकारी अलंकार अग्निहोत्री यांनी यूजीसी नियम आणि प्रयागराजमध्ये शंकराचार्यांचा अपमान हे कारण असल्याचे सांगत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, ही फक्त सुरुवात आहे, संपूर्ण देश संतप्त आहे.
-
अकोला : महापौर पदासाठी भाजपकडून शारदा खेडकर यांनी दाखल केला अर्ज
अकोला महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला सकाळी 11 वाजता विशेष सभा आयोजित केली आहे. अकोल्याचं महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपकडून महापालिकेच्या महापौर पदासाठी आज नगरसेविका शारदा खेडकर आणि उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांचा नामांकन अर्ज दाखल केला आहे. यावेळी राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला पालकमंत्री आकाश फुंडकर आणि भाजपचे आमदार रणधीर सावरकर उपस्थित होते.
-
लासलगाव : वातावरणातील बदलामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली
गेल्या पावसाळ्यात तब्बल सहा महिने सतत पडलेला पाऊस आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे सुमारे 50 ते 60 टक्क्यांहून अधिक द्राक्ष बागा बाधित झाल्याचे चित्र आहे. त्यातच सध्या जाणवणारी थंडी व ढगाळ वातावरण यामुळे द्राक्ष बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून यंदा एकरी सुमारे 200 क्विंटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र प्रतिकूल हवामान आणि रोगराईमुळे आता केवळ 50 क्विंटल उत्पादन निघण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. रोग नियंत्रणासाठी अतिरिक्त औषध फवारण्या कराव्या लागत असल्याने द्राक्ष उत्पादकांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
-
कल्याण : ठाकरे गटाच्या उपविभाग प्रमुखाचा मृत्यू
कल्याण पूर्वेत बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावण्याच्या प्रकरणातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर हा विषय अधिकच गंभीर बनला आहे. बेपत्ता नगरसेवक मधुर मात्रे यांचे वडील उमेश मात्रे आणि पोलिसांच्या दबावामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाने थेट प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. तर बेपत्ता मधुर मात्रे यांचे वडील उमेश मात्रे आणि प्रशासनावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करा अन्यथा आम्ही शहर बंद करण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे .
-
धुळे : शेतीपंपाच्या वीज प्रश्नावरून सामोडे ग्रामस्थ आक्रमक; महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे
शेतीपंपासाठी दिवसा किमान 8 तास सुरळीत वीज मिळावी या मागणीसाठी सामोडे येथील शेतकरी, राजकीय पदाधिकारी आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. वारंवार आश्वासने देऊनही वीज पुरवठ्यात सुधारणा होत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पर्याय निवडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले.
-
मुंब्रा कधी एक रंगावर अवलंबून राहिला नाही- सहर युनूस शेख
गेले अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेली मुंब्रा येथील नगरसेविकास सहर युनूस शेख यांनी तन्वर नगर या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा फडकवून आपल्या समाजकार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे, नेहमीच हिरव्या रंगावर वाद होत असताना तिने केलेल्या वक्तव्यानंतर राज्या आहे
-
भारतीय जनता पार्टीसोबत युती होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु- महेंद्र दळवी
महायुती होऊ नये यासाठीच काही नेते प्रयत्न करत असल्याचा आरोप करत शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी अप्रत्यक्षपणे खासदार सुनील तटकरे यांना टोला लगावला आहे. काही नेते “मिठाचा खडा घेऊन बसलेले आहेत”, कुठे तरी युतीत वाद होईल याचीच वाट पाहत असल्याचे दळवी म्हणाले.
-
भगतसिंग कोश्यारी यांना दिला जाणार पद्मभूषण याचा निषेध-माजीमंत्री के.सी.पाडवी
माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला जाणार पद्मभूषण याचा निषेध केला पाहीजे. कोश्यारी हे RSS च्या कार्यकर्ते आहेत. म्हणून पद्मभूषण पुरस्कार दिला आहे. भाजपचा सरकार हे देशाला घातक आहे. कोश्यारीला पद्माभूषण देण्याची गरज नाही होती. या राज्यत भाजप सरकार यायला नको असं कोश्यारी यांनी करून ठेवला होता असे माजीमंत्री के.सी.पाडवी यांनी म्हटले आहे.
-
कल्याण पूर्वेत पोस्टर प्रकरणाचा दुर्दैवी शेवट
कल्याण पूर्वेत पोस्टर प्रकरणाचा दुर्दैवी शेवट झाला आहे. ठाकरे गटाच्या उपविभाग प्रमुख रमेश टिके यांचा मृत्यू झाला आहे. ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख रमेश टिके असे मयत पदाधिकाऱ्याचे नाव आहे. काल कल्याण कोळशेवाडी परिसरात ठाकरे गटाचे बेपत्ता नगरसेवकांचे पुस्तक लावल्याने टिके यांच्या विरोधात देखील तक्रार दाखल होतील.
-
ठाकरे गटाचे नगरसेवक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
चंद्रपूर महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे नगरसेवक आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडींवर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार धानोरकर म्हणाल्या की, “महानगरपालिकेत संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे महापौर आमच्याच पक्षाचा बसेल, याबाबत कोणतीही शंका नाही. आमचे जे घटक पक्ष आहेत, ते सर्व आमच्या सोबतच ठामपणे उभे राहतील.” ठाकरे गटाचे नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत असल्याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत म्हटले की, “ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे कोणीही त्यांची भेट घेऊ शकते. मात्र या भेटीमुळे महानगरपालिकेतील सत्तासमीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही.” महापौर पदावर काँग्रेसचाच उमेदवार विराजमान होईल, असा ठाम विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
-
‘देशात कोणतेही सरकार आले तरी संविधान बदलू शकणार नाही’- चंद्रकांत पाटील
देशात कोणतेही सरकार आले तरी संविधान बदलू शकणार नाही. संविधानामध्ये दुरुस्त करता येते. स्वर्गीय इंदिरा गांधींनीही दुरुस्त्या केल्या. पण त्यांनी थोड्या भयानक केल्या. 1975 ते 77 दरम्यान त्यांनी लोकशाहीची गळचेपी करून आणीबाणी आणली. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह 20 लाख लोक डांबली गेली. मोरारजी देसाई यांचे सरकार आल्यानंतर आणीबाणी आणली जाते ही घटना बदलली गेली. त्यामुळे केवळ घटनादुरुस्त्या करता येतात पण मूळ संविधान कोणाला बदलता येत नाही. त्यामुळे संविधान बदलले जाणार हे फेक निरेक्टिव्ह लोकसभेमध्ये लोकांना खरा वाटला. पण हे चुकीचं नेरीटिव्ह विधानसभेत बदललं. त्यानंतर बिहार, दिल्ली, नगरपालिका आणि महानगरपालिका मध्येही बदललं ते आता जिल्हा परिषद मध्ये ही बदललं जाईल, असं वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केले.
-
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण
राज्यासह देशामध्ये आज मोठा उत्साहात 77 प्रजासत्ताक दिवस साजरा आज होत आहे. मुंबईच्या बोरिवली पूर्वेत मागाठाने विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिवस निमित्ताने त्यांच्या कार्यालयावर ध्वजवंदन करण्यात आला. यावेळी मागाठाने मतदार संघात निवडून आलेले सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांचा सत्कार आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन कार्यक्रमात मोठा संख्या मध्ये नागरिकांची त्यासोबत दहिसर,कस्तुरबा समता नगर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे आणि पोलिसांना शाळकरी मुलांकडून परेड काढून मानवंदना देण्यात आली….
-
कल्याण पश्चिमेत मोठी आग; पोलीस लाईनमधील जप्त गाड्यांना आग
कल्याण पश्चिमेकडील मच्छी मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस लाईनमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. जप्त केलेल्या वाहनांना अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, परिसरात गोंधळ उडाला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू.
-
जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार; पंकजा मुंडे यांचं वक्तव्य
जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार असल्याचं वक्तव्य पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय. एकीकडे जालन्यामध्ये दोन दिवसाला खून होत असून गुन्हेगारीच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यावरच प्रतिक्रिया देताना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भुवया उंचावणारं विधान केलंय. जालन्यात बाहेरचे लोक येऊन तर क्राईम करत नाहीत ना? जालन्यातीलच लोक करतात असं म्हणत आपण ज्या भागात आहोत त्या भागाची अनावश्यक बदनामी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असंदेखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
-
कल्याण पश्चिमेत मोठी आग; पोलीस लाईनमधील जप्त गाड्यांना आग
कल्याण पश्चिमेकडील मच्छी मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस लाईनमध्ये आग लागली आहे. जप्त केलेल्या वाहनांना अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून परिसरात गोंधळ निर्माण झाला आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे.
-
महाराष्ट्राच्या चित्ररथात दिसली गणेशोत्सवाची संकल्पना
कर्तव्यपथावर महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ पहायला मिळाला, ज्यामध्ये गणेशोत्सवाची संकल्पना अत्यंत सुंदररित्या साकारण्यात आली होती. मूर्तीकार, लेझीम, ढोलपथक.. यांचं सुंदर चित्रण या चित्ररथावर साकारण्यात आलं होतं.
-
एनडीआरएफच्या चित्ररथात भूज भूकंपाचं चित्रण
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भूज भूकंपाच्या 25 व्या वर्षानिमित्त गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि एनडीआरएफ यांचं प्रतिनिधित्व करणारं चित्ररथ होतं. यामध्ये त्या काळात एनडीआरएफ पथकाने नागरिकांची कशी मदत केली, हे दाखवण्यात आलं.
-
घोडबंदर रोड पूर्णपणे खड्डेमुक्त करणार : एकनाथ शिंदे
मुंबई: रस्ते सुरक्षा कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान; ‘घोडबंदर रोड पूर्णपणे खड्डेमुक्त करणार’
मुंबई: रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत महत्त्वाच्या घोषणा केल्या. “प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात होणार नाहीत, रस्ते सुरक्षा ही केवळ मोहीम नसून ती काळाची गरज आहे,” असे ते यावेळी म्हणाले. घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी सोडवण्यास आपले प्राधान्य असून, शहरातील काही चुकीचे कट्स बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, घोडबंदर रोड लवकरच पूर्णपणे खड्डेमुक्त केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर भाष्य करताना त्यांनी कडक शब्दांत सुनावले की, “मद्यपान केले असेल तर घरी जा, दुसऱ्यांना त्रास का देता? मुंबईत माझ्या एका उद्योगपती मित्राला दुसऱ्याच्या चुकीमुळे प्राण गमवावे लागले,” अशी आठवण त्यांनी सांगितली.
-
आदिवासींचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने; प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन आणि जे.पी. गावित यांच्यात चर्चा
नाशिक: विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉम्रेड जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा ‘लॉंग मार्च’ मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात एक महत्त्वाचे राजकीय चित्र पाहायला मिळाले. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन आणि कॉम्रेड जे.पी. गावित एकाच सोफ्यावर बसून सविस्तर चर्चा करताना दिसले. विशेष म्हणजे, एका बाजूला गिरीश महाजन, मध्यभागी जे.पी. गावित आणि दुसऱ्या बाजूला साधू-महंत असे चित्र यावेळी पाहायला मिळाले. या प्राथमिक चर्चेनंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर बैठक होणार असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
प्रजासत्ताक दिनीच काळाचा घाला; अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
धाराशिव: प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहावर आज उमरगा तालुक्यात शोककळा पसरली. तलमोड सीमा तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (दारूबंदी) अधिकारी मोहन जाधव (वय ५५) यांचा ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. प्रजासत्ताक दिनाची तयारी पूर्ण करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. जाधव हे मूळचे सोलापूरचे रहिवासी असून ते तलमोड नाक्यावर कार्यरत होते. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर, सातारा जिल्हा परिषद प्रचारासाठी आज दरे गावी होणार रवाना
राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. काही वेळातच ते ठाण्यातील आपल्या निवासस्थानाहून सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी, दरे येथे रवाना होणार आहेत. सातारा दौऱ्यादरम्यान ते तळेगाव येथे आयोजित एका भव्य जाहीर सभेला संबोधित करणार असून, या सभेच्या माध्यमातून ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. दरे येथे थोडा वेळ मुक्काम केल्यानंतर, उद्या संध्याकाळी ते पुन्हा मुंबईत दाखल होतील. त्यांच्या या दौऱ्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
-
साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण; विद्यार्थ्यांच्या संचलनाने वेधले लक्ष
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त सातारा येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. ध्वजारोहणानंतर विविध प्रशासकीय विभाग आणि शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध पथसंचलनाने उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी पालकमंत्री देसाई यांनी सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या आजी-माजी सैनिकांची व नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
-
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण; बालविवाह रोखण्याची घेतली शपथ
जळगाव: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तिरंगा फडकवून सलामी देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना बालविवाह मुक्त समाज घडवण्यासाठी बालविवाह न करण्याची विशेष प्रतिज्ञा देण्यात आली. या सोहळ्यात पोलीस दलाच्या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली, तसेच पोलीस विभाग आणि इतर सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध आंदोलने, अनेकांकडून आत्मदहनाचा इशारा
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध मागण्यांसाठी अनेक आंदोलनं होत आहेत. या सर्व एकत्रित होत असलेल्या आंदोलनांनी लक्ष वेधले आहे. तर अनेक आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
-
जळगावात पोलीस कवायत मैदानावर शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण…
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बालविवाह न करण्याची उपस्थित सर्वांना प्रतिज्ञा देण्यात आली. पोलीस दलासह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. पोलीस दलाकडून पथसंचलन करत यावेळी तिरंग्याला मानवंदना देण्यात आली तर मंत्री गुलाबराव यांना सलामी देण्यात आली.
-
प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ
नाशिक याठिकणी प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ उडाला. माधवी जाधव या वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ उडाला. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही? महिला कर्मचाऱ्याने आक्षेप घेतला. महिला कर्मचाऱ्यांकडून जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
-
सातारा: 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण
77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण पार पडल्यानंतर विविध प्रशासकीय विभागातील आणि विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर संचलन करण्यात आले. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला आलेल्या आजी-माजी सैनिक आणि नागरिकांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागराजन आणि प्रशासकीय अधिकारी कार्यक्रमाला उपस्थि होते.
-
जालना – पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडलं. आमदार अर्जुन खोतकर,नारायण कुचे,बबनराव लोणीकर,जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
-
प्रजासत्ताक दिनी युवक चढला ३०० फूट मोबाईल टॉवरवर
प्रजासत्ताक दिनी बुलढाणा येथ युवक ३०० फूट मोबाईल टॉवर वर चढला. वैभव करे असे त्याचे नाव असून तो मांडवा तालुका मेहकर येथील रहिवासी आहे. ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी आहे .
-
बाबासाहेबांनी जगातील सर्वोत्तम संविधान दिलं – मुख्यमंत्री फडणवीस
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सर्व स्वातंत्र्यसेनानींच्या चरणी मी नतमस्तक होतो. बाबासाहेबांनी जगातील सर्वोत्तम संविधान दिलं. तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मुंबईत ध्वजवंदन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
-
रायगडमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा – मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ आज अलिबाग येथील पोलीस मुख्यालय मैदानावर संपन्न झाला. रोहयो, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर प्रथमच मंत्री भरत गोगावले यांना हा मान देण्यात आला आहे.
-
77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात शासकीय ध्वजवंदन
छत्रपती संभाजीनगर – 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात शासकीय ध्वजवंदन. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या ध्वजवंदन कार्यक्रमासाठी चंद्रकांत खैरे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवकांची उपस्थिती असेल.
-
शिवसेनेच्या माजी आमदाराचा भाजपात पक्ष प्रवेश
मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात आज मौसा लातूरचे शिवसेनेचे माजी आमदार दिनकरराव माने यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे होणार भाजपात पक्ष प्रवेश. मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजप कार्यालयात दाखल. थोड्याच वेळात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिथितीत होणार पक्ष प्रवेश.
-
77th Republic Day 2026 : 30,000 पेक्षा जास्त सुरक्षारक्षक तैनात
प्रजासत्ताक दिन असल्याने दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत मल्टी-लेयर सिक्योरिटी तैनात आहे. यात 30,000 पेक्षा जास्त सुरक्षारक्षक तैनात आहेत.
-
77th Republic Day 2026 : नाशिक जिल्ह्यातील तीन मंत्री असताना गिरीश महाजन करणार ध्वजवंदन
मंत्री गिरीश महाजन आज नाशिकला करणार ध्वजवंदन. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन आणि पोलीस संचलन कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन राहणार उपस्थित. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण नंतर आता ध्वजवंदन. नाशिक जिल्ह्यातील तीन मंत्री असताना कुंभ मंत्री गिरीश महाजन करणार ध्वजवंदन.
-
धाराशिवमध्ये निर्माण झालेल्या गोंधळावर प्रताप सरनाईक यांच्याकडून पडदा
एबी फॉर्म वाटपावरून धाराशिवमध्ये शिवसेनेत निर्माण झालेल्या अंतर्गत गोंधळावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून अखेर पडदा. शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांची ऑडिओ क्लिप प्रसारित करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने मागितली माफी. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. शिवसेनेच्या ज्या जागा भाजपला देण्यात आल्या आहेत, त्या जागा पुन्हा शिवसेनेकडे घेतल्या जातील असं ठाम आश्वासन प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं आहे. एबी फॉर्म वाटपावरून निर्माण झालेला संभ्रम, अंतर्गत नाराजी आणि पक्षातील गोंधळ यावर आम्ही पर्याय काढू असेही पालकमंत्री प्रथम सरनाईक म्हणाले.
-
काँग्रेसने शेतकऱ्यांवर अत्याचार केले – नवनीत राणा
काँग्रेसने शेतकऱ्यावर अत्याचार केले. शेतकऱ्यांच्या मुलाला बारा तास शेतात राबवून शेतकऱ्यांवर खरे अत्याचार या काँग्रेस पक्षाने गेली साठ वर्ष केले. भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांची काँग्रेसवर टीका. अन्यथा शेतकऱ्यांचा प्रत्येक मुलगा आज अधिकारी म्हणून शासकीय कार्यालयात बसला असता.
-
77th Republic Day 2026 : कर्तव्य पथावर गर्दी जमू लागली
77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडआधी कर्तव्य पथावर तयारी पूर्ण झाली आहे. मोठ्या संख्येने लोक कर्तव्य पथावर पोहोचत आहेत. सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तपासणीशिवाय कोणालाही प्रेक्षक रांगेत बसू दिलं जाणार नाही.
-
77th Republic Day 2026 : विकसित भारताचा संकल्प अधिक भक्कम होवो – पीएम मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली आहे. त्यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या आन-बान आणि शानचा प्रतीक आहे. हे राष्ट्रीय महापर्व तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि नवी उत्साह घेऊन येवो. विकसित भारताचा संकल्प अधिक भक्कम होवो, हीच कामना.
सभी देशवासियों को गणतंत्र दिवस की बहुत-बहुत बधाई। भारत की आन-बान और शान का प्रतीक यह राष्ट्रीय महापर्व आप सभी के जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। विकसित भारत का संकल्प और अधिक सुदृढ़ हो, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2026
-
77th Republic Day 2026 : संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट
आज प्रजासत्ताक दिन असून कर्तव्य पथावर परेड होणार आहे. त्यासाठी संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट आहे. कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.
Published On - Jan 26,2026 7:28 AM
