AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना तिकीटचं टेन्शन, ना टीसीची कटकट, भारतीय रेल्वेचा असा एक मार्ग; जिथे मोफत करता येतो प्रवास

भारतात एक अशी रेल्वे आहे जिथे गेल्या ७५ वर्षांपासून प्रवाशांकडून एकही रुपया तिकीट आकारले जात नाही. भाक्रा नांगल धरण परिसरातील या अनोख्या आणि मोफत रेल्वे सेवेचा रंजक इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या.

| Updated on: Jan 04, 2026 | 3:37 PM
Share
भारतात रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तिकीट काढणे अनिवार्य असते, अन्यथा दंड भरावा लागतो. परंतु, आपल्या देशात एक अशीही रेल्वे आहे जिने गेल्या ७५ वर्षांत एकाही प्रवाशाकडून एक पैसाही आकारलेला नाही. ही कोणतीही तांत्रिक चूक किंवा तात्पुरती सवलत नसून एक जाणीवपूर्वक घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे.

भारतात रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तिकीट काढणे अनिवार्य असते, अन्यथा दंड भरावा लागतो. परंतु, आपल्या देशात एक अशीही रेल्वे आहे जिने गेल्या ७५ वर्षांत एकाही प्रवाशाकडून एक पैसाही आकारलेला नाही. ही कोणतीही तांत्रिक चूक किंवा तात्पुरती सवलत नसून एक जाणीवपूर्वक घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे.

1 / 8
या मोफत रेल्वे सेवेची सुरुवात १९४८ मध्ये झाली. स्वातंत्र्यानंतर जेव्हा भाक्रा नांगल धरणाचे काम सुरू झाले, तेव्हा कामगार, अभियंते आणि अवजड यंत्रसामग्री नेण्यासाठी या विशेष रेल्वेची निर्मिती करण्यात आली होती.

या मोफत रेल्वे सेवेची सुरुवात १९४८ मध्ये झाली. स्वातंत्र्यानंतर जेव्हा भाक्रा नांगल धरणाचे काम सुरू झाले, तेव्हा कामगार, अभियंते आणि अवजड यंत्रसामग्री नेण्यासाठी या विशेष रेल्वेची निर्मिती करण्यात आली होती.

2 / 8
धरणाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत ही रेल्वे या भागाची जीवनवाहिनी बनली होती. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ही सेवा बंद न करता भाक्रा बियास मॅनेजमेंट बोर्डाने (BBMB) ती तशीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

धरणाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत ही रेल्वे या भागाची जीवनवाहिनी बनली होती. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ही सेवा बंद न करता भाक्रा बियास मॅनेजमेंट बोर्डाने (BBMB) ती तशीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

3 / 8
यामागील मुख्य उद्देश म्हणजे भाक्रा धरणा परिसरातील पर्यटनाला चालना देणे. तसेच जास्तीत जास्त लोकांनी या ऐतिहासिक वास्तूला भेट द्यावी, यासाठी ही ट्रेन आजही विनामूल्य चालवली जाते. नांगल ते भाक्रा दरम्यान सुमारे १३ किलोमीटर धावणारी ही ट्रेन आजही डिझेल इंजिन आणि जुन्या लाकडी डब्यांसह आपला वारसा जपून आहे.

यामागील मुख्य उद्देश म्हणजे भाक्रा धरणा परिसरातील पर्यटनाला चालना देणे. तसेच जास्तीत जास्त लोकांनी या ऐतिहासिक वास्तूला भेट द्यावी, यासाठी ही ट्रेन आजही विनामूल्य चालवली जाते. नांगल ते भाक्रा दरम्यान सुमारे १३ किलोमीटर धावणारी ही ट्रेन आजही डिझेल इंजिन आणि जुन्या लाकडी डब्यांसह आपला वारसा जपून आहे.

4 / 8
याचा सर्वाधिक फायदा बीबीएमबी कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी, शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांसाठी मोफत प्रवास आणि आजूबाजूच्या गावांतील लोकांसाठी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून होतो.

याचा सर्वाधिक फायदा बीबीएमबी कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी, शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांसाठी मोफत प्रवास आणि आजूबाजूच्या गावांतील लोकांसाठी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून होतो.

5 / 8
विशेष म्हणजे, भारतीय रेल्वेप्रमाणे या ट्रेनला तिकिटातून उत्पन्न मिळत नाही. या रेल्वेचा संपूर्ण खर्च भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ स्वतः उचलते. ते या रेल्वेला केवळ एक वाहतुकीचे साधन न मानता महत्त्वाची सार्वजनिक सुविधा मानतात.

विशेष म्हणजे, भारतीय रेल्वेप्रमाणे या ट्रेनला तिकिटातून उत्पन्न मिळत नाही. या रेल्वेचा संपूर्ण खर्च भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ स्वतः उचलते. ते या रेल्वेला केवळ एक वाहतुकीचे साधन न मानता महत्त्वाची सार्वजनिक सुविधा मानतात.

6 / 8
तसेच आधुनिक भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारी ही ट्रेन केवळ लोखंडी रुळांवर धावणारी गाडी नसून, ती आपल्या गौरवशाली इतिहासाची आणि जनसेवेच्या निस्वार्थ भावनेची जिवंत साक्ष आहे.

तसेच आधुनिक भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारी ही ट्रेन केवळ लोखंडी रुळांवर धावणारी गाडी नसून, ती आपल्या गौरवशाली इतिहासाची आणि जनसेवेच्या निस्वार्थ भावनेची जिवंत साक्ष आहे.

7 / 8
जर तुम्हालाही विनातिकीट कायदेशीर प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल आणि ऐतिहासिक भाक्रा धरणाचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल, तर या अनोख्या रेल्वेचा प्रवास नक्कीच करायला हवा.

जर तुम्हालाही विनातिकीट कायदेशीर प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल आणि ऐतिहासिक भाक्रा धरणाचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल, तर या अनोख्या रेल्वेचा प्रवास नक्कीच करायला हवा.

8 / 8
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित.
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी.
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका.
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.