AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : 4 संघ, 8 गुण आणि 1 स्थान… कोणता संघ मारणार बाजी, कोणाला मिळणार प्लेऑफचं तिकीट? वाचा सविस्तर एका क्लिकवर

आयपीएल 2021 स्पर्धा प्रत्येक सामन्यासह रोमांचक होत आहे. स्पर्धेतील अनेक संघांची प्लेऑफसाठीची शर्यत प्रत्येक सामन्यासह अधिक कठीण होत आहे.

| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 10:51 AM
Share
आयपीएल 2021 स्पर्धा प्रत्येक सामन्यासह रोमांचक होत आहे. स्पर्धेतील अनेक संघांची प्लेऑफसाठीची शर्यत प्रत्येक सामन्यासह अधिक कठीण होत आहे. प्लेऑफ हे एक कोडे बनले आहे. प्लेऑफच्या शर्यतीत पहिल्या 3 संघांचे स्थान निश्चितपणे दिसून येते. अशा स्थितीत खरी लढत फक्त एकाच जागेची असते. कारण त्या एका जागेसाठी चार संघांमध्ये चुरस आहे. आयपीएलमध्ये चार संघ सध्या 8 गुणांसह चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. या चौघांपैकी केवळ एकालाच प्लेऑफचं तिकीट मिळू शकतं, किंवा बँगळुरुचा संघ पुढचे सामने पराभूत झाला तर या चारपैकी दोन संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता येईल.

आयपीएल 2021 स्पर्धा प्रत्येक सामन्यासह रोमांचक होत आहे. स्पर्धेतील अनेक संघांची प्लेऑफसाठीची शर्यत प्रत्येक सामन्यासह अधिक कठीण होत आहे. प्लेऑफ हे एक कोडे बनले आहे. प्लेऑफच्या शर्यतीत पहिल्या 3 संघांचे स्थान निश्चितपणे दिसून येते. अशा स्थितीत खरी लढत फक्त एकाच जागेची असते. कारण त्या एका जागेसाठी चार संघांमध्ये चुरस आहे. आयपीएलमध्ये चार संघ सध्या 8 गुणांसह चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. या चौघांपैकी केवळ एकालाच प्लेऑफचं तिकीट मिळू शकतं, किंवा बँगळुरुचा संघ पुढचे सामने पराभूत झाला तर या चारपैकी दोन संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता येईल.

1 / 6
चेन्नई सुपर किंग्ज : धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने यंदाच्या मौसमात चांगली कामगिरी केली आहे. या संघाने 10 पैकी 8 सामने जिंकत 16 गुण मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचं प्लेऑफचं तिकीट जवळपास पक्कं झालं आहे. आयपीएलच्या इतिहासात असं कधीच घडलेलं नाही की, 16 गुण मिळवणाऱ्या संघाला प्लेऑफचं तिकीट मिळालेलं नाही. चेन्नईने उर्वरिीत चारपैकी एक सामना जिंकला तरी त्यांना प्ले ऑफ गाठता येईल.

चेन्नई सुपर किंग्ज : धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने यंदाच्या मौसमात चांगली कामगिरी केली आहे. या संघाने 10 पैकी 8 सामने जिंकत 16 गुण मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचं प्लेऑफचं तिकीट जवळपास पक्कं झालं आहे. आयपीएलच्या इतिहासात असं कधीच घडलेलं नाही की, 16 गुण मिळवणाऱ्या संघाला प्लेऑफचं तिकीट मिळालेलं नाही. चेन्नईने उर्वरिीत चारपैकी एक सामना जिंकला तरी त्यांना प्ले ऑफ गाठता येईल.

2 / 6
दिल्ली कॅपिटल्स : हा संघ आयपीएल 2021 च्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईप्रमाणे या संघानेदेखील 10 सामन्यांपैकी 8 विजयानंतर 16 गुण मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचंदेखील प्लेऑफचं तिकीट जवळपास पक्कं झालं आहे. उर्वरित चारपैकी एक सामना जिंकला तर त्यावर शिक्कामोर्तब होईल.

दिल्ली कॅपिटल्स : हा संघ आयपीएल 2021 च्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईप्रमाणे या संघानेदेखील 10 सामन्यांपैकी 8 विजयानंतर 16 गुण मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचंदेखील प्लेऑफचं तिकीट जवळपास पक्कं झालं आहे. उर्वरित चारपैकी एक सामना जिंकला तर त्यावर शिक्कामोर्तब होईल.

3 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : 10 सामने खेळल्यानंतर यापैकी 6 सामन्यांमधील विजयासह बंगळुरु संघाच्या खात्यात 12 गुण आहेत. अशा परिस्थितीत, हा संघ प्लेऑफसाठी दावेदार आहे. तथापि, त्यांना त्यासाठी उर्वरित 4 सामन्यांपैकी किमान 2-3 सामने जिंकणे आवश्यक आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : 10 सामने खेळल्यानंतर यापैकी 6 सामन्यांमधील विजयासह बंगळुरु संघाच्या खात्यात 12 गुण आहेत. अशा परिस्थितीत, हा संघ प्लेऑफसाठी दावेदार आहे. तथापि, त्यांना त्यासाठी उर्वरित 4 सामन्यांपैकी किमान 2-3 सामने जिंकणे आवश्यक आहे.

4 / 6
KKR, PBKS, RR आणि MI : या चार संघांचे 10 सामन्यांनंतर समान 8 गुण आहेत. म्हणजेच, प्लेऑफ खेळण्याची शक्यता अद्याप अबाधित आहे. या सगळ्यात केकेआरला एक फायदा होऊ शकतो, तो म्हणजे त्यांचा रन रेट पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच, जर पुढे दोन-तीन संघांचे गुण समान राहिले तर, नेट रनरेटवर त्यांचा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय होऊ शकतो.

KKR, PBKS, RR आणि MI : या चार संघांचे 10 सामन्यांनंतर समान 8 गुण आहेत. म्हणजेच, प्लेऑफ खेळण्याची शक्यता अद्याप अबाधित आहे. या सगळ्यात केकेआरला एक फायदा होऊ शकतो, तो म्हणजे त्यांचा रन रेट पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच, जर पुढे दोन-तीन संघांचे गुण समान राहिले तर, नेट रनरेटवर त्यांचा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय होऊ शकतो.

5 / 6
सनरायझर्स हैदराबाद : आयपीएलच्या इतिहासात 10 सामने खेळल्यानंतर फक्त एक जिंकणारा हा पहिला संघ आहे. यामुळेच ऑरेंज आर्मी आता प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.

सनरायझर्स हैदराबाद : आयपीएलच्या इतिहासात 10 सामने खेळल्यानंतर फक्त एक जिंकणारा हा पहिला संघ आहे. यामुळेच ऑरेंज आर्मी आता प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.

6 / 6
Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....