Nanded Flood : हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला, अस्मानी संकटानं बळीराजाचे अश्रू थांबेना… बघा आक्रोश

Nanded Flood : हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला, अस्मानी संकटानं बळीराजाचे अश्रू थांबेना… बघा आक्रोश

Harshada Shinkar | Updated on: Sep 29, 2025 | 5:12 PM

नांदेड जिल्ह्यातील नानला दिगरस परिसरात मुसळधार पावसामुळे सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले आहे. चार महिन्यांपासून केलेल्या मेहनतीवर पाणी फिरल्याने शेतकरी हताश झाले आहेत. लाखोंचे कर्ज आणि पिकाच्या नुकसानीमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

नांदेड जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान पोहोचवले आहे. विशेषतः नानला दिगरस परिसरातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून पिकवलेले सोयाबीन पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, एका एकर सोयाबीनसाठी त्यांना किमान १० ते १५ हजार रुपये खर्च येतो. मात्र, शासनाने जाहीर केलेली एकरी ३,४०० रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असून, ती स्वीकारार्ह नाही. बँक कर्जे, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. शासनाने तातडीने हेक्टरी ५०,००० रुपये अनुदान देऊन किंवा एकरकमी कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा, त्यांना मोठे संघर्ष करावे लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Published on: Sep 29, 2025 5:12 PM
Follow Us