Maharashtra News LIVE : मान्सूनने राज्य व्यापले, पेरणीची लगबग, बि-बियाणांच्या दुकानावर गर्दी
Maharashtra News LIVE : राज्यात मान्सूनने पाय पसरले आहेत. काय जिल्हे आणि परिसर वगळता मान्सूनने राज्य व्यापले आहे. त्यामुळे शेतीच्या कामाला वेग आला आहे. शेतकऱ्यांनी बि-बियाणांच्या दुकानावर गर्दी सुरू केली आहे. येत्या चार पाच दिवसात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
अशोक चव्हाण यांच्याकडून आम्ही बरच काही शिकलो-आमदार रोहित पवार
काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांच्याकडून आम्ही बरच काही शिकलो. माझ्या मतदार संघात सुद्धा ते महाविकास आघाडीत असताना त्यांचं शंभर टक्के सहकार्य मला झालेला आहे. दुर्दैवानं एवढ्या मोठ्या नेत्याला जिल्हा पुरत आणि शहरापुरतं ठेवलेलं बघून मला वेदना होत आहेत. महाराष्ट्र व्यापी काम करणाऱ्याला नेत्याला जर भाजप एखादया छोट्या कामात गुंतवून ठेवत असेल तर भाजप या मोठ्या नेत्यावर त्यांच्या कतृत्वावर आणि त्यांच्या परिवारावर अन्याय करतोय, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
-
आ. प्रवीण स्वामी यांचे बॅनर व्हायरल; फुटीर खासदारांना अप्रत्यक्ष टोला?
उद्धव ठाकरे यांच्या २८ जूनच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले बॅनर सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.बॅनरवरील “फुटीने बदलतात ते आकडे… शिवसैनिकांची निष्ठा नाही!” या संदेशातून खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्यात करण्यात आले आहे “फुटल्याने शिवसैनिकांची निष्ठा बदलणार नाही,” असा स्पष्ट संदेश देत ठाकरे गटाने आपल्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आवाहन केल्याचे या पोस्टमधून दिसून येत आहे. दरम्यान, २८ जून रोजी उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यापूर्वी हे बॅनर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात ठाकरे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे
-
-
शेतकरी कुटुंबांना लग्नसराईसाठी दारात एसटी : परिवहनमंत्री
एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन बस दाखल झाल्यानंतर, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात मुलगा किंवा मुलीचे लग्न असल्यास त्यांना विशेष सवलतीच्या आणि माफक दरात एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल.
-
विदर्भातील पद्मश्री पुरस्कृत मान्यवरांचा नागरी सत्कार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे विदर्भातील पद्मश्री पुरस्कृत मान्यवरांचा नागरी सत्कार केला जाणार आहे या नागरिक सत्कार कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई उपस्थित राहणार आहेत रविवार 28 जून रोजी नागपुरातील देशपांडे सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडणार आहे
-
नागपुरात भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव
नागपुरात भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. सकाळी फिरणारे नागरिक, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांवर श्वानांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहे. भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवणारी ‘श्वान नसबंदी मोहीम’ गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. यापूर्वी काम करणाऱ्या तीन संस्थांचे कंत्राट ३१ मार्च २०२६ रोजी संपले असून नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नवीन टेंडरला मंजुरी मिळू शकली नाही.
-
-
वन्यजीव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफास
महसूल गुप्तवार्ता संचालनालय नागपूर प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफास केला. २४ आणि २५ जून रोजी आंध्र प्रदेशातील श्रीकाकूलम जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. श्रीकाकूलम आणि रायाकुर्डी या दुर्गम गावातून पिंजऱ्यात डांबून ४ शेकरू,१ भारतीय तारा कासव,१४ रानकोंबड्या आणि उदमांजराची २ पिल्ले सुरक्षित जप्त केली.जप्तींनंतर एका संशयित आरोपीसह सर्व वन्यजीवांना पुढील कारवाईसाठी श्रीकाकूलम वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. विदेशी पाळीव प्राण्याची मागणी आणि वन्यजीव संग्राहकामुळे ही तस्करी होत असून नागरिकांनी अशा गुन्ह्याची माहिती सुरक्षा यंत्रणा द्यावी अशी आवाहन डीआरआयने केले आहे.
-
नाशिकमधील पर्यटन स्थळावर असणार कडक निर्बंध
यंदा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर असणार कडक निर्बंध असतील. विशेष करून त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पर्यटनस्थळांवर कडक निर्बंध असतील. नियमभंग करणाऱ्यांवर वन विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. पहिने, दुगारवाडी धबधबा, ब्रह्मगिरी पर्वत, हरिहरगड परिसरात नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी स्वरूपाच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटकांनी वन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
-
नव्या पासपोर्टसाठी २,५०० रुपये शुल्क
केंद्र सरकारने १४ वर्षांनंतर पासपोर्ट शुल्कात वाढ केली असून, येत्या एक जुलैपासून नवीन दर लागू होणार आहेत. नवीन नियमांनुसार, सामान्य श्रेणीतील ३६ पानांच्या पासपोर्टसाठी आता १,५०० रुपयांऐवजी २,५०० रुपये मोजावे लागतील, तर तत्काळ पासपोर्टसाठी ३,५०० रुपयांऐवजी पाच हजार रुपये शुल्क आकारले जाईल
Maharashtra News LIVE : राज्यात मान्सूनने धडक दिली आहे. तळकोकणात ढगांची जमवाजमव सुरू झाली आहे. वाऱ्यामुळे हे ढग आता राज्याच्या कानाकोपऱ्यात पावसाचा सांगावा घेऊन आले आहेत. समाधानकारक पावसामुळे आता खरिपाच्या पेरणीला सुरुवात होत आहे. शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. तर शेतकऱ्यांनी बि-बियाणे खरेदीसाठी दुकानांसमोर गर्दी करायला सुरुवात केली आहे. येत्या चार ते पाच दिवसात मान्सून अधिक सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे.
काल खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकीवजा इशारा दिल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिल्याचे समजते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संजय दिना पाटील यांच्यावर विरोधक तुटून पडले आहेत. बच्चू कडू यांनी संजय पाटील यांनी माफी मागावी असे वक्तव्य केले आहे. आमदार रोहित पवार हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर टीका केली. तर अशोक चव्हाण यांचे कौतुक केले आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
Published On - Jun 26,2026 8:04 AM
