Maharashtra News LIVE : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली – रोहित पवार
Maharashtra News LIVE Updates : आज तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्याशिवाय अशोक खरातसह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या घडामोड राजकीय, मनोरंजनाच्या अपडेटसाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES
-
सिल्लोड आगाराच्या वाहतूक निरीक्षकाची आत्महत्या
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप. सिल्लोड डेपो मॅनेजर तिघां विरोधात आत्महत्या प्रवृत्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कारवाईच्या मागणीसाठी सहकारी कर्मचारी आक्रमक
-
मुंबईची हवा गुणवत्ता सुधारली, प्रदूषणात १७ टक्क्यांची घट…
मुंबई शहरासाठी दिलासादायक बातमी… मुंबईची हवा गुणवत्ता सुधारली, प्रदूषणात १७ टक्क्यांची घट. २०२६ च्या पहिल्या तिमाहीत शहरातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सुमारे १७ टक्क्यांनी घटले असून, मागील ३ वर्षांतील ही सर्वात स्वच्छ हवा मानली जात आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) आणि राज्य प्रदूषण नियंत्रण यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, धूळकण (PM2.5 आणि PM10) पातळीमध्ये घट झाल्याने हवेचा दर्जा सुधारला आहे. यामागे बांधकामांवर नियंत्रण, रस्ते स्वच्छता मोहीम आणि औद्योगिक उत्सर्जनावर कडक कारवाई यांचा मोठा वाटा असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
-
-
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात घोटाळा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्य नियोजन विभागाकडे धाव. निधी वाटपात अनियमितता झाल्याचा शिवसेन ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटलांचा आरोप. राज्य नियोजन विभागाकडून चौकशीचे आदेश, अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. जिल्हा नियोजन समितीच्या निधीला यापूर्वी वादामुळे मिळाली होती स्थगिती. मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदी पेक्षा जास्त निधीची मान्यता, समितीची मान्यता न घेताच निधीची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात अनियमितता झाल्याचा कैलास पाटलांचा आरोप
-
युद्धविराम पुन्हा धोक्याच्या स्थितीत..
अमेरिका आणि इराणकडून युद्धविराम जाहीर करण्यात आले. पण तीन अटींचे उल्लंघन झाल्याचे इराणने म्हटले. त्यानंतर इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा जग संकटात आले.
-
पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली – रोहित पवार
पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली. पार्थ पवारांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये थोडी नाराजी. अजितदादांना न्याय द्या असा काँग्रेसने संदेश दिला. भेटी दरम्यान रोहित पवारांचा चेन्नीथलांसोबत संवाद. ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत.
-
-
रोहित पवारांनी घेतली हर्षवर्धन सपकाळ यांची भेट
रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. बंद दाराआड केली चर्चा. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी चर्चा. काँग्रेसने आकाश मोरे यांनी दिलीय उमेदवारी.
-
मुंबई शहरासाठी दिलासादायक बातमी
मुंबईची हवा गुणवत्ता सुधारली. प्रदूषणात 17 टक्क्यांची घट. 2026 च्या पहिल्या तिमाहीत शहरातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सुमारे 17 टक्क्यांनी घटले असून, मागील तीन वर्षातील ही सर्वात स्वच्छ हवा मानली जात आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) आणि राज्य प्रदूषण नियंत्रण यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, धूळकण (PM2.5 आणि PM10) पातळीमध्ये घट झाल्याने हवेचा दर्जा सुधारला आहे.
-
-
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात घोटाळा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्य नियोजन विभागाकडे धाव. निधी वाटपात अनियमितता झाल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटलांचा आरोप. राज्य नियोजन विभागाकडून चौकशीचे आदेश. अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. जिल्हा नियोजन समितीच्या निधीला यापूर्वी वादामुळे मिळाली होती स्थगिती. मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदी पेक्षा जास्त निधीची मान्यता, समितीची मान्यता न घेताच निधीची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात अनियमितता झाल्याचा कैलास पाटलांचा आरोप.
-
भोंदू अशोक खरात प्रकरणी चौदावा गुन्हा दाखल
भोंदू अशोक खरात प्रकरणी चौदावा गुन्हा दाखल. सिन्नर मिरगाव येथील जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक केल्याचा अशोक खरात आणि कल्पना खरातवर गुन्हा दाखल. माळी बंधूंकडून कवडीमोल भावात घेतली कोट्यवधी रुपयांची जमीन. तुम्ही जमीन विकली नाही तर 4 पैकी एका भावाचा मृत्यू होईल अशी दिली धमकी. माळी बंधूंची फसवणूक करत 16 एकर जागा भोंदू खरातने केली हडप. याच जमिनीवर नंतर त्याने उभारले ईशानेश्वर मंदिर आणि स्वतःचा भव्य फार्म हाऊस.सिन्नर पोलिसांकडून तपास सुरू.
-
आज तीन राज्यात विधानसभा निवडणुका, मतदानाला सुरुवात
केरळ, असम आणि पुडुचेरी या तीन राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. केरळमध्ये 2.71 कोटी मतदार 883 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील. असममध्ये 2.50 कोटी मतदार आहेत. 31,490 मतदान केंद्र आहेत. मतमोजणी 4 मे रोजी होईल.
भारतातील तीन राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. केरळ, असम आणि पुडुचेरी. केरळमध्ये विधानसभेच्या 140, असममध्ये 126 आणि पुडुचेरीमध्ये 30 जागा आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येईल. केरळमध्ये 2.71 कोटी मतदार 883 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील. असममध्ये 2.50 कोटी मतदार आहेत. 31,490 मतदान केंद्र आहेत. मतमोजणी 4 मे रोजी होईल. पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर परिसरात एमएनजीएल कंपनीच्या पीएनजी (पाइप नॅचरल गॅस) लाईनची गळती होऊन झालेल्या स्फोटात एक जण जखमी झाल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published On - Apr 09,2026 8:03 AM
