AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 RCB vs PBKS : पावसामुळे सामना राखीव दिवशीही झाला नाही तर विजेता कोण? जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट आहे. मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे सामना वेळेतच सुरु होणं कठीण असल्याचं दिसत आहे. असं असताना हा सामना ठरलेल्या दिवशी झाला नाही आणि राखीव दिवशीही तीच स्थिती ओढावली तर काय? जाणून घ्या

| Updated on: Jun 03, 2025 | 5:37 PM
Share
अहमदाबादमध्ये होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल फायनल सामन्यावर पावसाचं सावट आहे. अ‍ॅक्यूवेदरच्या मते, रविवारी अहमदाबादमध्ये पावसाची 66 टक्के शक्यता आहे. तसेच, संध्याकाळनंतर 33 टक्के ढगाळ हवामान राहील. (Photo- BCCI/IPL)

अहमदाबादमध्ये होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल फायनल सामन्यावर पावसाचं सावट आहे. अ‍ॅक्यूवेदरच्या मते, रविवारी अहमदाबादमध्ये पावसाची 66 टक्के शक्यता आहे. तसेच, संध्याकाळनंतर 33 टक्के ढगाळ हवामान राहील. (Photo- BCCI/IPL)

1 / 8
पावसाच्या भीतीमुळे अंतिम सामना पूर्ण करण्यासाठी आयपीएलकडून काही नियम लागू करण्यात आले आहेत. आयपीएलचा अंतिम सामना या नियमांद्वारे पूर्ण केला जाईल. जर पावसाने अंतिम सामना व्यत्यय आणला तर कोणते नियम लागू होतील ते पाहूया. (Photo- BCCI/IPL)

पावसाच्या भीतीमुळे अंतिम सामना पूर्ण करण्यासाठी आयपीएलकडून काही नियम लागू करण्यात आले आहेत. आयपीएलचा अंतिम सामना या नियमांद्वारे पूर्ण केला जाईल. जर पावसाने अंतिम सामना व्यत्यय आणला तर कोणते नियम लागू होतील ते पाहूया. (Photo- BCCI/IPL)

2 / 8
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. जर पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला तर अतिरिक्त 120 मिनिटे घेतली जातील.जर सामना रात्री 9.40 वाजता सुरू झाला तर षटकांची कपात केली जाणार नाही. दोन्ही संघ 20 षटकांचा खेळ खेळतील. (Photo- BCCI/IPL)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. जर पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला तर अतिरिक्त 120 मिनिटे घेतली जातील.जर सामना रात्री 9.40 वाजता सुरू झाला तर षटकांची कपात केली जाणार नाही. दोन्ही संघ 20 षटकांचा खेळ खेळतील. (Photo- BCCI/IPL)

3 / 8
पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि रात्री 9.40 नंतर सुरू झाला तर षटके कमी केली जातील. त्यानंतर, डकवर्थ-लुईस नियमानुसार निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 5 षटके खेळली पाहिजेत. (Photo- BCCI/IPL)

पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि रात्री 9.40 नंतर सुरू झाला तर षटके कमी केली जातील. त्यानंतर, डकवर्थ-लुईस नियमानुसार निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 5 षटके खेळली पाहिजेत. (Photo- BCCI/IPL)

4 / 8
सामना निर्धारित वेळेत खेळवला गेला नाही तर अतिरिक्त वेळ घेतला जाईल. यामुळे 5 षटकांचा सामना होईल. त्यानुसार रात्री 1.30  वाजेपर्यंत 5 षटकांचा सामना आयोजित करण्याचे नियोजन असेल. (Photo- BCCI/IPL)

सामना निर्धारित वेळेत खेळवला गेला नाही तर अतिरिक्त वेळ घेतला जाईल. यामुळे 5 षटकांचा सामना होईल. त्यानुसार रात्री 1.30 वाजेपर्यंत 5 षटकांचा सामना आयोजित करण्याचे नियोजन असेल. (Photo- BCCI/IPL)

5 / 8
जर 5 षटकांचा सामना रात्री 1.30 वाजेपर्यंत होऊ शकला नाही, तरच सामना राखीव दिवसासाठी पुढे ढकलला जाईल. त्यानुसार अंतिम सामना बुधवारी पुन्हा आयोजित केला जाईल. (Photo- BCCI/IPL)

जर 5 षटकांचा सामना रात्री 1.30 वाजेपर्यंत होऊ शकला नाही, तरच सामना राखीव दिवसासाठी पुढे ढकलला जाईल. त्यानुसार अंतिम सामना बुधवारी पुन्हा आयोजित केला जाईल. (Photo- BCCI/IPL)

6 / 8
पावसामुळे राखीव दिवशी किमान 5 षटकांचा खेळ होऊ शकला नाही तरच अंतिम सामना रद्द केला जाईल. तसेच, लीग टप्प्यातील 70 सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. (Photo- BCCI/IPL)

पावसामुळे राखीव दिवशी किमान 5 षटकांचा खेळ होऊ शकला नाही तरच अंतिम सामना रद्द केला जाईल. तसेच, लीग टप्प्यातील 70 सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. (Photo- BCCI/IPL)

7 / 8
सामना राखीव दिवशी खेळला गेला नाही तर पंजाब किंग्स संघ चॅम्पियन होईल. कारण या वर्षीच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. पावसामुळे राखीव दिवशी सामना रद्द झाला तर पंजाब किंग्ज संघाला विजेता घोषित केले जाईल. (Photo- BCCI/IPL)

सामना राखीव दिवशी खेळला गेला नाही तर पंजाब किंग्स संघ चॅम्पियन होईल. कारण या वर्षीच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. पावसामुळे राखीव दिवशी सामना रद्द झाला तर पंजाब किंग्ज संघाला विजेता घोषित केले जाईल. (Photo- BCCI/IPL)

8 / 8
Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल.