Maharashtra News LIVE : अहिल्यानगर : जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी
Maharashtra News LIVE Updates: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पंचतत्वात विलीन झाले. उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पावर यांचं नाव आघाडीवर आलं आहे. सध्या राष्ट्रवादीत याविषयीच्या हालचाली वाढल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्या निधनानंतर आता उपमुख्यमंत्री पदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. दरम्यान सध्या राष्ट्रावादीत याविषयावर खलबतं सुरू आहेत. राज्यभरात अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रचार या अचानक धक्क्यामुळे थंडावला आहे. सध्या अजितदादांच्या विमान अपघाताचीच चर्चा सुरू आहे. तर या अपघाताची चौकशी करण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांनी पाठवले होते. त्यानुसार चौकशीला सुरूवात झाली आहे. लवकरच याविषयीचा अहवाल समोर येईल.
LIVE NEWS & UPDATES
-
उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार उपस्थित राहणार
सुनेत्रा पवार या देखील उद्याच्या बैठकीत उपस्थित राहण्याची शक्यता
उद्याच्या बैठकीत गटनेता निवडला जाणार
सुनील तटकरे यांची माहिती
-
दिप्ती चौधरी आत्महत्या प्रकरण, सीसीटीव्ही फुटेज समोर
दिप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट.
आत्महत्येच्या घटनेनंतरचे घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज समोर.
दीप्ती चौधरी यांचे पती रोहन चौधरी हे दिप्ती यांना उचलून गाडीत बसवतानाचे सीसीटीव्ही फुटेज.
रोहन चौधरी यांनी आपल्या गाडीतून दीप्ती चौधरी यांना केले होते हॉस्पिटलमध्ये दाखल.
-
-
अजितदादांच्या निधनामुळे नागरिक शोकाकूल, सिन्नरमध्ये शोकसभेचं आयोजन
अजितदादांच्या निधनामुळे नागरिक शोकाकूल, सिन्नरमध्ये शोकसभेचं आयोजन
माजी मंत्री माणिकराव कोकाटे आणि राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार , खासदार राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाशभाऊ वाजे यांची उपस्थिती
अजितदादांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन
-
अहिल्यानगर : जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी देण्यात आली आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेलवर धमकीचा मेसेज आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अहिल्यानगर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी करण्यात आली. यापूर्वीही एकदा जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
-
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी
जळगावच्या चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. हा चौक शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा चौक असून दिवसेंदिवस येथे वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या चौकात वाहतूक नियंत्रणाचा अभाव असल्याने वारंवार अपघात होत असून, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत विविध सामाजिक संघटनांनी वारंवार प्रशासनाकडे सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी केली आहे.
-
-
सोलापूर : माढ्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली
सोलापूरच्या माढ्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रध्दांजली वाहण्यात आली. माढ्याचे आमदार अभिजीत पाटलांच्या वतीने माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेते मंडळीना समवेत घेऊन शोकसभा घेतली. यावेळी आमदार पाटलांसह अनेक नेत्यांनी आपल्या भाषणातून आठवणी जागवल्या.
-
उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक – छगन भुजबळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, दादा गेले आणि ज्या पद्धतीने गेले, सर्वांची झोप उडाली. शेवटी शो मस्ट गो ऑन. कुणाकडे तरी जबाबदारी देऊन पक्ष चालवला पाहिजे. सरकार असेल. उद्या विधान मंडळाचे सदस्य आहेत. त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात विधान मंडळ प्रमुख अजितदादाकडे होतं. ते पद देण्याबाबत निर्णय होईल. सुनेत्रा ताईंकडे पद देण्याची मागणी आहे. ते रास्त आहे.
-
दोन्ही राष्ट्रवादी आता त्वरित एकत्र आल्या पाहिजे – धनंजय महाडिक
धनंजय महाडिक यांनी म्हटले की, दोन्ही राष्ट्रवादीने आता त्वरित एक झालं पाहिजे. राज्यात दोन्ही राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणात ताकद आहे. 40 आमदार, 10 खासदार आहेत. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित झाले पाहिजे. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिले तर त्या चांगल्या प्रकारे काम करू शकतात. त्यांना आता राज्यसभेचाही अनुभव आहे.
-
सांगतील जिल्हा परिषद-पंचायत समितीचा प्रचार साध्या पध्दतीने करण्याच्या जंयत पाटील यांच्या सूचना
सांगलीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार साध्या पध्दतीने करण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर जंयत पाटील यांनी या सूचना केल्या आहेत. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाच्या चर्चेबाबत बोलण्यास जंयत पाटील यांनी नकार दिला आहे.
-
उल्हासनगर महापालिकेत सत्ता समीकरण बदलले
राज्यातील एकूण 29 महापालिका निवडणुकींचा निकाल स्पष्ट होऊन बरेच दिवस झालेत. मात्र त्यानंतरही महापौर-उपमहापौर पदासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. अशात उल्हासनगर महानगरपालिकेतून मोठी अपडेट समोर आली आहे. उल्हासनगर महापालिकेत सत्ता समीकरण बदललं आहे. महापालिकेत अखेर महायुतीची सत्ता असणार आहे. महापौर पद शिवसेनेकडे तर उपमहापौरपद हे भाजपकडे असणार आहे.
-
अमरावती महानगरपालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी विलास इंगोले यांची निवड
अमरावती महानगरपालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी माजी महापौर विलास इंगोले यांची निवड करण्यात आली आहे. विलास इंगोले यांची यंदा अमरावती महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येण्याची सहावी वेळ ठरली आहे. जवळपास सात हजार पेक्षा अधिक मतांनी ते या निवडणुकीमध्ये विजय झाले. महानगरपालिकेमधील सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची अमरावतीमध्ये ओळख आहे.
-
भाजप-शिंदेशिवसेनेकडून महापौर-उपमहापौर पदासाठी अर्ज खरेदी
जळगाव महापालिकेत महापौर-उपमहापौर पदासाठी भाजप आणि शिंदेशिवसेनेकडून अर्ज खरेदी करण्यात आले आहेत. नामनिर्देशन पत्र घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज खरेदी करण्यात आले. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी स्वतंत्ररित्या अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
महापालिका निवडणूक भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने महायुती म्हणून एकत्र लढवली होती. मात्र दोन्ही पक्षांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी स्वतंत्र अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जळगाव महापालिकेच्या 75 जागांपैकी भाजपने 46 तर शिंदेच्या शिवसेनेचे 22 उमेदवार विजयी झाले होते.
-
चाळीसगाव बाजार समितीत मक्याला हमीभाव नाही, शेतकरी चिंतेत
जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याला हमीभाव मिळत नसल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतीसाठी मोठा खर्च करूनही उत्पन्नातून खर्च न निघाल्याने शेतकऱ्यांची नाराजी वाढली आहे. सध्या बाजार समितीत मक्याला केवळ १४०० ते १६५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असून, आवक कमी असतानाही दरात वाढ होत नाहीये. देशांतर्गत उत्पादन आणि आयात वाढल्याचा दरांवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत हर्षला चौधरी थविल महापौर?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी हर्षला चौधरी थविल तर उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे मनसेचे राजू पाटील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते
-
जिल्हा परिषदेला महायुतीला चांगलं यश मिळेल-बसवराज पाटील
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून माजी मंत्री आणि भाजपाचे नेते बसवराज पाटील यांनी केली जिल्हा परिषदेच्या प्रचाराला सुरुवात. लातूर आणि धाराशिव दोन्ही जिल्ह्यामधील जनता आमच्याबरोबर आहे त्यामुळे जिल्हा परिषदेला महायुतीला चांगलं यश येईल असं मत माजी मंत्री बसवराज पाटील यांनी व्यक्त केलं
-
मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू! धक्कादायक घटना
जळगावच्या अमळनेर तालुक्यात अमळनेर – मारवड रोडवर मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू तर दोन जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. नकुबाई झुलाल भिल असे मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 65 वर्षीय वृद्धेचे नाव आहे.
-
ठाण्याचा महापौर बिनविरोध होणार
उपमुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडी मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला पिंपोळकर यांची वर्णी लागणार आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय रोहित पिंपोळकर – गायकवाड यांच्या पत्नी शर्मिला पिंपोळकर महापौर पदाच्या दावेदार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. उपमहापौर पदी कृष्णा पाटील यांच्या नावांवर शिक्का मोहरतोब होणार आहे.
-
नांदेडच्या अर्धापूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या गाडीला अपघात
नांदेडच्या अर्धापूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अर्धापूर शहरातील वनविभागाच्या कार्यालयासमोर ट्रॅक्टर व तहसीलदारांच्या गाडीचा अपघात झाला आहे. ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात तहसीलदार रेणुकादास देवणीकर, चालक व शिपाई जखमी असे तिघेजण जखमी झाले आहेत. तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्यावर अर्धापूर येथील रुग्णालयात तर एकावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 10 हजार तर चांदीचे दर 30 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 72 हजार 10 रुपयांवर तर चांदीचे दर 3 लाख 72 हजार 860 रुपयांवर आले आहेत. सोन्या चांदीच्या दरात काल विक्रमी वाढ झाल्यानंतर आज मोठी घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे.
-
नाशिक महापालिकेत सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला भाजपाचा प्रस्ताव
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. भाजपाची एक हाती सत्ता आली असताना देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी शहराध्यक्ष सुनील केदार यांनी प्रस्ताव दिला. सत्तेत सन्मानपूर्वक सहभाग दिल्यास विचार करू अशी दोन्ही पक्षांची भूमिका आहे. केंद्रात आणि राज्यात आम्ही सोबत आहोत त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील सोबत राहण्यासाठी प्रस्ताव दिल्याची माहिती सुनील केदार यांनी दिली.
-
सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 10 हजार तर चांदीचे दर 30 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 72 हजार 10 रुपयांवर तर चांदीचे दर 3 लाख 72 हजार 860 रुपयांवर आले आहेत. सोन्या, चांदीच्या दरात काल विक्रमी वाढ झाल्यानंतर आज मोठी घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे .
-
तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या गाडीला अपघात
नांदेडच्या अर्धापूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या गाडीला अपघात. अर्धापूर शहरातील वनविभागाच्या कार्यालयासमोर ट्रॅक्टर व तहसीलदारांच्या गाडीचा अपघात. ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर. या अपघातात तहसीलदार रेणुकादास देवणीकर, चालक व शिपाई जखमी असे तिघेजण जखमी. तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्यावर अर्धापूर येथील रुग्णालयात तर एकावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू.
-
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून राजेश टोपे यांचं विधान
अजित दादांच्या दु:खद घटनेतून कोणीही सावरलेलं नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही जनभावना सुद्धा आहे आणि दोन्ही पक्षाच्या वतीने त्याबाबतचे प्रयत्न पूर्वीसुद्धा झालेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून राजेश टोपे यांचं विधान. पवार साहेब, सुनेत्रा वहिनी, तटकरे साहेब यांनी याबाबत निर्णय घ्यावा ही आमच्यासारख्यांची भावना आहे असं राजेश टोपे म्हणाले.
-
अजित दादांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अधुरं राहिलं त्या बद्दल शशिकांत शिंदे यांच्याकडून खंत व्यक्त
अजित दादांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अधुरं राहिलं त्या बद्दल व्यक्त केली खंत. मागील काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत बैठका सुरू होत्या. या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय अजितदादांनी घ्यायचं ठरवलं होतं अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली.
-
छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षण आंदोलनाचा थेट परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीत
मराठा आरक्षणासाठी झालेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर निर्माण झालेला सामाजिक बदल आता थेट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत स्पष्टपणे दिसून येत आहे. 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र मिळालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 70 नव ओबीसी उमेदवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करून नशीब आजमावले आहे. जिल्हा परिषदेत ओबीसीसाठी राखीव असलेल्या १७ जागांसाठी ३१, तर पंचायत समितीच्या २९ गणांसाठी ३९ नव ओबीसी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
-
दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं मला वाटतं – विजय वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र येणं न येणं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं मला वाटतं – असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
-
गडचिरोली शेवटच्या भाग छत्तीसगड सीमारती भागात माओवाद्यांचं स्मारक पोलिसांनी केलं नष्ट
गडचिरोली शेवटच्या भाग छत्तीसगड सीमारती भागात माओवाद्यांचं स्मारक पोलिसांनी नष्ट केलं . लाहेरी पासून 18 किलोमीटर अंतरावर माओवादी संघटनेने एक मोठं स्मारक उभारला होतं. हे स्मारक छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या माओवाद्यांचं प्रवेशद्वार होतं. नक्षलविरोधी पोलीस पथक व गडचिरोली पोलिसांनी आग लावून ते नष्ट केलं.
-
अजित दादांच्या मृत्यूनंतर राजकारण होणं चुकीचं – संजय राऊत
अजित पवारांबाबत राजकीय बोलणं आता योग्य नाही. सगळं स्थिरस्थावर झाल्यावर यावर चर्चा होऊ शकते. या विमान अपघातबाबात चौकशी करा अशी माझी मागणी आहे – संजय राऊत
-
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू आहे. सीआयडी चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाच्या तपासाला चौकशी सुरूवात केली आहे. प्राथमिक चौकशी होईल, या अपघाताचा तपशील नीट तपासला जाईल.
-
मध्य रेल्वेची लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं उशिराने
चाकरमानी वर्गांचे मोठे हाल. रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी. कर्जत खोपोली ठाण्याहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत.
-
एमडी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; 20 पेडलरांचे जाळे उघड
छत्रपती संभाजीनगर शहरात अमली पदार्थांचे सेवन वाढत असतानाच, गुजरात व मुंबईहून कुख्यात गुन्हेगार सर्रास एमडी पावडर सारख्या महागड्या ड्रग्सची तस्करी करत आहेत. याच एमडी पावडर तस्करीवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पाच दिवसांत शहरातील २० पेडलरांचे जाळे उघडकीस आले आहे. एका प्लंबरने ड्रग्ज विक्रीतून लाखोंची कमाई केल्याचे समोर येताच पोलिसांची चक्रे फिरली.
-
केडीएमसी महापौर उपमहापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज सादर होणार
अनुसूचित जमाती आरक्षणामुळे राजकीय समीकरणं बदलली. शिवसेनेकडून किरण भांगले व हर्षाली चौधरी रेसमध्ये. मनसेकडून शीतल मंडारी यांचे नाव चर्चेत. मात्र मनसे ने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेचा महापौर निश्चित मानला जातो
-
अजित पवार यांच्या आठवणीत हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर
नरहरी झिरवाळ आणि हिरामण खोसकर अजित पवार यांच्या आठवणीत भावूक झाले असून हिरामण खोसकर यांना अश्रू अनावर झाले आहेत. लोकांनी व्यक्त केलेली इच्छा मी सांगितले असेही नरहरी झिरवाळ यांनी म्हटले.
-
यवतमाळ जिल्ह्यात केवायसी केल्यानंतरही 58 हजार लाडक्या बहिणींचा हप्ता थांबला
असा अहवाल राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने यवतमाळला आज पाठविला. या अहवालानुसार गृह चौकशी करण्याचे आदेश अंगणवाडीताईंना देण्यात आले आहेत. पुढील 4 दिवसांत याचा अहवाल महिला व बालकल्याण विभागाकडे द्यावा लागणार आहे.
-
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री ही लोकांची इच्छा- नरहरी झिरवाळ
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. यावर बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्यात ही लोकांची इच्छा आहे..
-
नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात 2 फेब्रुवारीला होणार भाजपची गटनोंदणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर शेट्टी यांची भाजपच्या गटनेते पदी निवड होण्याची शक्यता, चंद्रशेखर शेट्टी पहिल्यांदाच नगरसेवक झाले असून तरुण नेतृत्वाकडे पक्ष संधी देण्याची शक्यता,तर दुसरीकडे विभागीय आयुक्त रविवार पर्यंत सुट्टीवर असल्याने वडेट्टीवार गटाकडून धानोरकर समर्थक असलेल्या 13 नगरसेवकांनी नोंदवलेल्या गटावर नोंदवलेल्या आक्षेपावर देखील आता सोमवारीच सुनावणी होण्याची शक्यता.
-
३२१ पैकी १६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
जळगाव महापालिका निवडणुक रिंगणातील ३२१ पैकी १६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण ३२१ उमेदवारांपैकी निम्म्याहून अधिक, म्हणजेच १६७ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवण्यात अपयश आले. महापालिका निवडणुकीत उभ्या बहुतांश अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचा देखील समावेश आहे. अपक्षांची संख्या मोठी असली तरी, प्रमुख राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेसला सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र आहे.
-
लाल कांद्याच्या हंगामातील विक्रमी आवक
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या हंगामातील विक्रमी आवक आली आहे. 2 हजार 10 वाहनातून लाल कांद्याची आवक आली. 32 हजार 172 क्विंटल लाल कांदा दाखल झाला. लाल कांद्याला जास्तीतजास्त 1640 रुपये, कमीतकमी 400 रुपये तर सरासरी 1280 रुपये इतका प्रति क्विंटलला दर मिळाला.
-
गोंदिया शहरात चोरांची टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद
गोंदिया शहरात चोरांची टोळी फिरत असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे, तर या टोळीने एका घराची दाराची कडी कोंडा तोडून घरातून दागिने, रोख व साहित्य असा एकूण एक लाख 86 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. गोंदिया शहरातील फुलचूर येथील आशीर्वाद कॉलनीत ही घटना घडली आहे, या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्यादी देण्यात आली आहे.
-
अवकाळी पावसामुळे 8 तालुक्यांना फटका
जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी गारपीट व वादळासह झालेल्या अवकाळी पावसामुळे 8 तालुक्यांना फटका बसला. चोपडा, रावेर, चाळीसगाव , मुक्ताईनगर ,एरंडोल, पारोळा , जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. चोपड्यात गारपिटीमुळे ५७ गावातील पिकांचे नुकसान झाले आहे. चाळीसगावच्या ९ गावांमधील पिकांची हानी झाली आहे. जळगावच्या १७, मुक्ताईनगरच्या ६५, एरंडोलच्या १६, पारोळ्यातील २५ व धरणगावच्या ५४ गावांमधील रब्बी हंगामाला अवकाळीचा फटका बसला आहे.
-
हिंदू जनजागृती समितीची सभा
जळगाव शहरातील मानराज पार्क येथील मैदानावर 1 फेब्रुवारीला हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याने सभेत दहा हजारांहून अधिक हिंदू समाज बांधव एकत्रितपणे वंदे मातरमचे गायन करणार आहे. सभेत सनातन संस्थेच्या वतीने राष्ट्रधर्म अध्यात्म देवता सन उत्सव बाल संस्कार यासह विविध विषयांवर ग्रंथ तसेच फलक यांचं प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सभेच्या प्रचार प्रसार तसेच जनजागृतीसाठी 31 जानेवारी रोजी शहरात दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.
-
अजित पवारांना मदरशातील विद्यार्थ्यांकडून श्रद्धांजली
सांगलीच्या मिरजेमध्ये मुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना मदरशातील विद्यार्थ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.मिरजेच्या मंगळवार पेठेतील ईसापुर गल्लीतील मदरशामध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आलं होतं,यावेळी लहान विद्यार्थ्यांनी कुराण पठण करत अजित पवारांच्या आत्म्यास शांती लाभावी,यासाठी मुस्लिम धर्मगुरूच्या उपस्थितीत प्रार्थना केली.
-
विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना धमकी
विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सौरभ ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे ५ नगरसेवक वडेट्टीवारांनी पळवून नेले होते, त्यातील ३ नगरसेवक त्या गाडीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती, आम्ही ती गाडी थांबवली पण मी कोणालाही शिवीगाळ केली नाही किंवा मारण्याची धमकी दिली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
Published On - Jan 30,2026 8:10 AM
