Maharashtra News LIVE: तमिळनाडूमध्ये विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा थोड्याच वेळात
Maharashtra News LIVE: अभिनेते विजय हे तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तमिळनाडूच्या नेहरू स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून बहुमतासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू होती.

LIVE NEWS & UPDATES
-
नसरापूर प्रकरणी पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांकडून मूक मोर्चा
पुण्यातील नसरापूर अत्याचारप्रकरणी पीडित चिमुकलीचं कुटुंब आक्रमक झालं असून आज मूक मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्यात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं वडिलांनी आवाहन केलं आहे. बालगंधर्व रंगमंदिर ते सावरकर भवनपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आणि नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
-
वाशिम जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे तीव्र पाणीटंचाई
वाशिम जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई तीव्र झाली असून जिल्ह्यातील 33 गावांना पाणीटंचाईचा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. 29 विहिरींचे अधिग्रहण तर 6 खाजगी बोअरवेलही प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. अधिग्रहित जलस्त्रोतांतून गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. मंगरूळपीर तालुक्यात सर्वाधिक 10 गावांमध्ये टंचाई आहे.
-
-
पावसाळ्यापूर्वी शाळांच्या इमारतींची तपासणी; 27 मुद्द्यांवर होणार स्ट्रक्चरल ऑडिट
छत्रपती संभाजीनगर- आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांच्या इमारतींच्या सुरक्षिततेची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तालुक्यातील सर्व शाळांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे जुन्या व कमकुवत इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. धोकादायक वर्गखोल्या रिकाम्या करून विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांची तपासणी बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांमार्फत केली जाणार आहे.
-
एल निनोचा प्रभाव; यंदा कमी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना मिश्र पिकांचा सल्ला
छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या मान्सून हंगामात ‘एल निनो’चा प्रभाव जाणवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगत पीक नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. एकाच पिकावर अवलंबून न राहता मिश्र पिके, आंतरपीक पद्धती तसेच कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा फटका उत्पादनावर बसू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीपासूनच नियोजन करणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे
-
महिला आणि बालकांच्या तक्रारींवर कारवाई करा; पोलीस ठाण्यांना आयुक्तांच्या सूचना
महिला आणि बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये अधिक संवेदनशीलता आणि तत्परता राखण्याचे निर्देश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. नसरापूर इथल्या घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आला आहे. अशा प्रकरणांमध्ये कोणताही विलंब होऊ नये याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
-
-
पुणे शहरातील 33 रस्त्यांच्या कामांना प्राधान्य
वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शहरातील 33 रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचं महापालिकेनं निश्चित केलं आहे. या रस्त्यांसाठी 1200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ते 30 पैकी 21 रस्त्यांसाठी भूसंपादनाचे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये वाकड ते नवले पूल या दरम्यानच्या महामार्गालगत दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांचा समावेश आहे.
-
राज्यातील तब्बल 487 शाळा अनधिकृत, मुंबई विभागात सर्वाधिक संख्या
राज्यात तब्बल 487 शाळा अधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शाळांपैकी केवळ 76 शाळांवर बंदीची कारवाई केली आहे. तर 111 शाळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 325 शाळांवर दंडात्मक कारवाई केली आहे. प्रत्यक्षात केवळ सोहळा प्रकरणात दंड वसूल झाला असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली आहे.
-
-
पुण्यात अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे प्रवेशाला कात्री
पुण्यात अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे प्रवेशाला कात्री लागली आहे. विद्यापिठाचा महाविद्यालयांना इशारा देण्यात आला असून माहिती भरण्यासाठी 18 मे पर्यंत मुदत दिली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कठोर पाऊल उचललं आहे. शिक्षक भरतीचा आकडा गाठण्यात अपयशी ठरणाऱ्या महाविद्यालयांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया यंदा रोखली जाणार आहे. या नियमावलीमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून माहिती भरण्यासाठी विद्यापीठाने 18 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
-
पुण्यातील धोकादायक 36 वाड्यांना नोटिसा
पुण्यातील धोकादायक 36 वाड्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील जुने वाडे, जुन्या इमारती, धोकादायक आणि राहण्यास अयोग्य असल्याने तिथं वास्तव्य करू नये, संबंधित इमारती वाढत तातडीने रिकामे करावेत, असं आवाहन महापालिका प्रशासनाने केलं. शहरातील 36 धोकादायक वाडे आणि इमारतीमधील रहिवाशांना महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.
-
मीरा भाईंदरमध्ये मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला अजय साळवे यांनी दिला चोप
मीरा भाईंदरमध्ये मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख अजय साळवे यांनी चोप दिला. मीरा गावठाण इथं बस स्टॉपवर एका मुलीची छेड काढून रेस्टॉरंटजवळ तिच्याकडे ‘रेट’ विचारणाऱ्या विकृत इसमाला अजय साळवे यांनी भरचौकात धडा शिकवला. या प्रकरणाची माहिती मिळताच शिवसेना शाखाप्रमुख अजय साळवे यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित इसमाला चांगलाच चोप दिला. भररस्त्यात बदडल्यानंतर त्या तरुणाने पीडित मुलीची माफी मागितली.
तमिळगा वेत्री कझगमचे (टीव्हीचे) प्रमुख विजय यांनी शनिवारी संध्याकाळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन 120 सदस्यांच्या पाठिंब्याचं पत्र सोपवलं. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्याबळावरून सुरू असलेलं नाट्य अखेर संपुष्टात आलं. आज (रविवार) सकाळी दहा वाजता चेन्नई इथल्या नेहरू स्टेडियमवर विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हीसीके आणि आयएमयूएल या पक्षांनी पाठिंब्याचं पत्र सोपवल्यानंतर तमिळनाडू विधानसभेत सत्तारुढ सदस्यांचं संख्याबळ बहुमताच्या पलीकडे गेलं. गेल्या दोन दिवसांपासून बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेची धावपळ सुरू होती. यासह राज्यातील, देश-विदेशातील इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग..
Published On - May 10,2026 9:00 AM
