Maharashtra News LIVE : सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेलं
Maharashtra News LIVE : सोनम वांगचुक यांना आज सकाळीच पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी नेले. दिल्लीतील जंतरमंतरवर पोलिसांच्या या कारवाईने गोंधळ झाला. मुंबई-ठाण्यात पावसाने आज हजेरी लावली. नागपूरमध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
फलटणची पूजा होताच संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा बरडकडे प्रस्थान
पुण्यातील फलटण येथील पहाटेची पूजा विधीवत संपन्न झाली. त्यानंतर आता संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी बरडकडे प्रस्थान झालाय. ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात वारकरी भक्तिभावाने माऊलींसोबत मार्गस्थ झालेत.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पंढरपूर दौऱ्यावर
आषाढी वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. पंढरपुरातील आषाढी एकादशी निमित्त उभारण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री शिंदे करणार आहेत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी अशाच प्रकारे आषाढीपूर्व आढावा दौरा केला होता. मात्र आता उपमुख्यमंत्री असतानाही ते आढावा दौरा करत आहेत
-
-
भावली धरण पर्यटक मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट
पर्यटक आणि आरोपी यांच्यातील वादाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पीडित महिलेकडूनच मारहाण केली जात असल्याचा आरोप होतो आहे. इथूनच वादाला सुरवात झाली होती. आठ दिवसांपूर्वी महिलेची छेड काढून नाशिकच्या कुटूंबावर गावगुंडानी हल्ला केला होता. आतापर्यंत 12 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
-
अन्न व औषध प्रशासनाचा धसका, दूध ओतले ओढ्यात
सांगलीच्या मिरज तालुक्यातील टाकळी येथे ओढापत्रामध्ये पाण्यात दूध ओतण्यात आल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. ओढ्यात ओतण्यात आलेले दूध भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त दूध व अन्न भेसळी विरोधात जोरदार कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कारवाईच्या भीतीने ओढ्यात दूध ओतून देण्याचे कृत्य करण्यात आल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ओढ्याच्या पत्रामध्ये दूध ओतल्याने ओढ्यातील पाणी पांढरे दिसू लागले होते.
-
नाशिककरांना मोठा दिलासा
नाशिक मधील दर शनिवारी होणारी पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. १७ जून पासून शहरात दर शनिवारी पाणीकपात लागू होणार होती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ७१ टक्के तर मुकणे धरणात ४८ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे १८ जुलै पासून शहरातील दर शनिवारचा पाणीकपात रद्द करण्याची घोषणा महापौर हिंमगौरी आहेर आडके यांनी केली आहे
-
-
मातोश्रीसमोर सोनम वांगचूक यांना पाठिंबा देणारे बॅनर
मुंबईच्या मातोश्री समोर शिवसेना ठाकरे पक्षाकडून उपोषणकर्ते सोनम वांगचूक यांना पाठिंबा देणारे बॅनर चर्चेत आले आहे. सर्व तरुणांना 19 जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजता मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. चला शिवतीर्थावर, सरकारच्या हुकुमशाही विरोधात लढा देणाऱ्या सोनम वांगचूक आणि भारतातल्या सर्व तरुणांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येऊयात आणि सरकारला जाब विचारण्यात असा या बॅनरवर आशय आहे.
-
केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे – शरद पवार
नीटमुळे हजारो शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. पण केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. वांगचुक यांना आज पहाटे सरकारने अटक केली तरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
-
-
पोलिसांनी मारहाण केली- अभिजीत दिपके
पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केला आहे. पोलिसांनी सकाळीच काहीही सूचना न देता वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवले. त्यावेळी मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी शिवीगाळ केल्याचा आरोपही दिपके यांनी केला.
-
उपोषण स्थळ लवकर खाली करा -दिल्ली पोलीस
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांना आज उचलून नेलं. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी तातडीने उपोषण स्थळ सोडण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.
Maharashtra News LIVE : सोनम वांगचुक यांचे गेल्या 20 हून अधिक दिवसांपासून उपोषण सुरू होते. आज सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांना उपोषण स्थळावरून उचलत उपचारासाठी रुग्णालयात नेले. 20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याशी सरकारच्या प्रतिनिधीने यापूर्वी कोणतीही चर्चा केली नाही. यावेळी उपोषण स्थळावर मोठा गोंधळ उडाला. त्यांच्या समर्थकांना आवरताना पोलिसांचे नाकीनऊ आले. आंदोलनस्थळ तात्काळ रिकामे करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आज उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना निमंत्रण दिले आहे.
राज्यात काही ठिकाणी काल पावसाने अचानक हजेरी लावली. तर आज मुंबई, ठाण्यासह पश्चिम महाराष्ट्रात हजेरी लावली. तर राज्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पावसाळी अधिवेशनानंतर राज्यात बड्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रात तीन मंत्रीपदं मिळावीत यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
Published On - Jul 18,2026 8:58 AM
