AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sindhutai Sapkal Death | माई गेली आणि अवघा महाराष्ट्र पोरका झाला!

सिंधुताईंच्या अतुलनीय कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशा 900 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. तर मानाचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने देऊन त्यांना नुकताच गौरवलं होतं.

| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jan 04, 2022 | 10:41 PM
Share
अनेक संघर्षांना सामोरं जात सिंधूताई यांनी हजारो अनाथ बालकांचं पालकत्व स्विकारलं होतं. दरम्यान, वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सगळ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या सिंधूताईंच्या निधनानं हजारो लेकरं पोरकी झाली आहे. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

अनेक संघर्षांना सामोरं जात सिंधूताई यांनी हजारो अनाथ बालकांचं पालकत्व स्विकारलं होतं. दरम्यान, वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सगळ्यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या सिंधूताईंच्या निधनानं हजारो लेकरं पोरकी झाली आहे. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

1 / 12
1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात  सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी एक संस्था स्थापन केली. ममता बाल सदन असं या संस्थेला नाव देण्यात आलं होतं. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी एक संस्था स्थापन केली. ममता बाल सदन असं या संस्थेला नाव देण्यात आलं होतं. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

2 / 12
चिमुकल्यांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या उज्जव भविष्याची जबाबदारी सिंधुताईंनी आपल्या खांद्यावर घेतली होती. अनेक वर्ष अविरतपणे त्यांनी हे काम प्रामाणिकपणे आणि मन लावून केलं. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

चिमुकल्यांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या उज्जव भविष्याची जबाबदारी सिंधुताईंनी आपल्या खांद्यावर घेतली होती. अनेक वर्ष अविरतपणे त्यांनी हे काम प्रामाणिकपणे आणि मन लावून केलं. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

3 / 12
आपल्या संस्थेच्या माध्यमातून हजारपेक्षा जास्त बालकांना त्यांनी लहानाचं मोठं केलं. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अनाथ बालकांची जबाबदारी सिंधुताईंनी आपल्या खांद्यावर सक्षपणे पेलली. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

आपल्या संस्थेच्या माध्यमातून हजारपेक्षा जास्त बालकांना त्यांनी लहानाचं मोठं केलं. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अनाथ बालकांची जबाबदारी सिंधुताईंनी आपल्या खांद्यावर सक्षपणे पेलली. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

4 / 12
संपूर्ण जगभरात सिंधूताईंच्या कामाची दखल घेण्यात आली असून अनेक मुलाखतींमधून त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांचं काम याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यांच्यावर आधारीत एक मराठी सिनेमाही प्रकाशित झाला होता. तेजस्विनी पंडीत यांनी या सिनेमात सिंधूताईंची भूमिका वढवली होती. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

संपूर्ण जगभरात सिंधूताईंच्या कामाची दखल घेण्यात आली असून अनेक मुलाखतींमधून त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांचं काम याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यांच्यावर आधारीत एक मराठी सिनेमाही प्रकाशित झाला होता. तेजस्विनी पंडीत यांनी या सिनेमात सिंधूताईंची भूमिका वढवली होती. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

5 / 12
सिंधूताईंनी आपल्या आयुष्यात अनेक संघर्ष केले. अत्यंत खडतर प्रवास केला. सर्व कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

सिंधूताईंनी आपल्या आयुष्यात अनेक संघर्ष केले. अत्यंत खडतर प्रवास केला. सर्व कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

6 / 12
जन्मापासूनच सिंधुताई यांचा खडतर प्रवास सुरु झाला होता. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

जन्मापासूनच सिंधुताई यांचा खडतर प्रवास सुरु झाला होता. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

7 / 12
घराला वंशाचा दिवा हवा असताना मुलगी जन्माला आली म्हणून सिंधूताई यांचं नाव चिंधी ठेवण्यात आलं होतं, असं त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

घराला वंशाचा दिवा हवा असताना मुलगी जन्माला आली म्हणून सिंधूताई यांचं नाव चिंधी ठेवण्यात आलं होतं, असं त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

8 / 12
गाव लहान असल्याने सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळे सिंधुताई यांचं फक्त इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झालं. मात्र त्यानंतर त्यांचा व्यासंग इतका होता, की सुरेश भटांच्या अनेक गझला त्यांना तोंडपाठ होत्या. अनेक कविताही त्यांना पाठ होता.  (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

गाव लहान असल्याने सुविधांचा अभाव आणि इतर कारणांमुळे सिंधुताई यांचं फक्त इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झालं. मात्र त्यानंतर त्यांचा व्यासंग इतका होता, की सुरेश भटांच्या अनेक गझला त्यांना तोंडपाठ होत्या. अनेक कविताही त्यांना पाठ होता. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

9 / 12
वयाच्या 9 व्या वर्षी सिंधूताईंचं लग्न झालं होतं. आपल्यापेक्षा वयाने 26 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी त्यांचं लग्न झालं होतं. श्रीहरी सपकाळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

वयाच्या 9 व्या वर्षी सिंधूताईंचं लग्न झालं होतं. आपल्यापेक्षा वयाने 26 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी त्यांचं लग्न झालं होतं. श्रीहरी सपकाळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

10 / 12
सिंधूताई यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नुकतच पद्मपुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.  (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

सिंधूताई यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नुकतच पद्मपुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

11 / 12
नेहमी हसतखेळत असणाऱ्या, आनंदाचा निखळ झरा ज्यांच्या डोळ्यातून वाहत असायचा, त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलंय. त्यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी पुन्हा कधीच भरुन येणार नसल्याची खंत अनेकांच्या मनात आहे. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

नेहमी हसतखेळत असणाऱ्या, आनंदाचा निखळ झरा ज्यांच्या डोळ्यातून वाहत असायचा, त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केलंय. त्यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी पुन्हा कधीच भरुन येणार नसल्याची खंत अनेकांच्या मनात आहे. (Photo Source - सिंधूताई सपकाळ यांच्या फेसबुक अकाऊंटवर साभार)

12 / 12
Follow Us
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
Rohit Pawar | केडीएमसी रुग्णालयातील मारहाण प्रकरण; रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
Jalgaon | जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवार
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवारांचीही उपस्थिती, बैठकीत...
एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मोठी बातमी! एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, पुण्यात खळबळ
बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही
Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक!
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक! पाण्याच्या थेंबाथेंबासाठी...
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील आपत्ती निवारण कक्षाला भेट
NDA प्रवेशाच्या चर्चांवर संजय गायकवाडांचं मोठं विधान
शरद पवार आहेत तोपर्यंत...; NDA प्रवेशाच्या चर्चांवर संजय गायकवाडांचं मोठं विधान
आघाडी सरकारने 14 कारणं देत...मिसिंग लिंकचा फडणवीसांनी इतिहास मांडला, व
आघाडी सरकारने 14 कारणं देत...मिसिंग लिंकचा फडणवीसांनी इतिहास मांडला, विरोधकांना घेरलं!
इंद्रायणीला महापूर; वारकऱ्यांना येऊ नका, सरकारचं मोठं आवाहन
Alandi Indrayani River Flood | पालखीपूर्वीच आळंदी संकटात! इंद्रायणीला महापूर; वारकऱ्यांना येऊ नका, सरकारचं मोठं आवाहन