1/5

महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणरायाची चाहूल आता चाकरमान्यांना लागलीये. त्यामुळे आता चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले आहेत.
2/5

गणेशोत्सवासाठी कोकणात जवळपास 6 ते 7 लाख चाकरमानी येत असतात. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी येवू शकले नव्हते. मात्र, यंदा पाच ते सहा दिवस आगोदरच चाकरमानी कोकणात दाखल होवू लागलेत.
3/5

सध्या फेस्टिव्हल ट्रेनच्या माध्यमातून मुंबईतून चाकरमानी कोकणात दाखल होवू लागले आहेत. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सामानासकट चाकरमानी रत्नागिरीत दाखल झाले आहेत.
4/5

रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनवर सकाळी येणाऱ्या सर्वच ट्रेन सध्या चाकरमान्यांनी भरुन असलेल्या पहायला मिळत आहेत.
5/5

गणेशोत्सवासाठी सेलिब्रेशनचे प्लॅनिंग करुन चाकरमानी रत्नागिरीत दाखल होताहेत.