AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

आपला देश 15 ऑगस्ट 1947मध्ये स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर देशाला संविधानाची आवश्यकता होती. त्यामुळे संविधान सभेची स्थापना करण्यात आली. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधानाच्या निर्मितीचं काम सुरू झालं. डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून देशाचं संविधान लिहिलं. त्यामुळे त्यांना संविधानाचे शिल्पकारही म्हणतात. भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे. संविधान निर्मितीसाठी 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस लागले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना संविधान सुपुर्द केलं. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशाने संविधान स्वीकारलं. 26 जानेवारीपासूनच देशात संविधान लागू झालं. त्यानुसार भारताला लोकसत्ताक आणि सार्वभौम देश म्हणून घोषित झाला. आपलं संविधान देशातील नागरिकांना लोकशाही पद्धतीने सरकार निवडण्याचा अधिकार देतं. 26 जानेवारी 1950 (Republic Day India) रोजी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांच्या सलामीसह ध्वजारोहण करून भारताला संपूर्ण प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं. हा देशाच्या इतिहासातील सर्वोच्च क्षण होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी 26 जानेवारी रोजी देशभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टीही दिली जाते. 26 जानेवारी रोजी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची परेड असते. त्या दिवशी पंतप्रधान देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित करतात. तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला उद्देशून संदेश देतात.

Read More
Republic Day: अक्षय कुमार ते अनुष्का शर्मा.. या सेलिब्रिटींचं भारतीय सैन्याशी तगडं कनेक्शन

Republic Day: अक्षय कुमार ते अनुष्का शर्मा.. या सेलिब्रिटींचं भारतीय सैन्याशी तगडं कनेक्शन

भारतीय लष्कराच्या शौर्याचे किस्से आपण अनेकदा बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी मोठ्या पडद्यावर सैनिकाची भूमिका साकारून आपलं स्वप्न पूर्ण केलंय. पण इंडस्ट्रीत असेही काही कलाकार आहेत ज्यांचं खऱ्या आयुष्यातही लष्कराशी संबंध आहेत.

उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे.
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी.
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा.
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात..
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात...
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे.
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट.
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले..
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले...
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया
शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया.
प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव करत दुसऱ्याच महिलेला जीवंत जाळलं अन्...
प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव करत दुसऱ्याच महिलेला जीवंत जाळलं अन्....