AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prabodhankar Thackeray Death Anniversary | महाराष्ट्राचे ‘प्रबोधन’ करणारे प्रबोधनकार, जाणून घ्या त्यांच्या बद्द्लच्या खास गोष्टी

केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे. विचारवंत, नेते, लेखक, पत्रकार, संपादक, प्रकाशक, वक्ते, धर्मसुधारक, समाजसुधारक, इतिहाससंशोधक, नाटककार, सिनेमा पटकथा संवाद लेखक, अभिनेते, संगीततज्ज्ञ, शिक्षक, भाषाविद, लघुउद्योजक, फोटोग्राफर, टायपिस्ट, चित्रकार अशी सगळी विशेषणं लावूनही त्यांची ओळख आपण एका शब्दात सांगू शकत नाही.

| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 3:12 PM
Share
सत्यशोधक आंदोलनातले एक धडाडीचे समाजसुधारक आणि प्रभावी लेखक पत्रकार म्हणून सर्वश्रूत असणारे लेखक म्हणजे केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे. विचारवंत, नेते, लेखक, पत्रकार, संपादक, प्रकाशक, वक्ते, धर्मसुधारक, समाजसुधारक, इतिहाससंशोधक, नाटककार, सिनेमा पटकथा संवाद लेखक, अभिनेते, संगीततज्ज्ञ,  शिक्षक, भाषाविद, लघुउद्योजक, फोटोग्राफर, टायपिस्ट, चित्रकार अशी सगळी विशेषणं लावूनही त्यांची ओळख आपण एका शब्दात सांगू शकत नाही.

सत्यशोधक आंदोलनातले एक धडाडीचे समाजसुधारक आणि प्रभावी लेखक पत्रकार म्हणून सर्वश्रूत असणारे लेखक म्हणजे केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे. विचारवंत, नेते, लेखक, पत्रकार, संपादक, प्रकाशक, वक्ते, धर्मसुधारक, समाजसुधारक, इतिहाससंशोधक, नाटककार, सिनेमा पटकथा संवाद लेखक, अभिनेते, संगीततज्ज्ञ, शिक्षक, भाषाविद, लघुउद्योजक, फोटोग्राफर, टायपिस्ट, चित्रकार अशी सगळी विशेषणं लावूनही त्यांची ओळख आपण एका शब्दात सांगू शकत नाही.

1 / 7
प्रबोधनकारांचा जन्म  १७ सप्टेंबर १८८५ रोजी रायगडमधील पाली येथे झाला. अष्टविनायकमधील पालीचा गणपती त्यांचे कूलदैवत असल्याचा उल्लेख काही कागदपत्रात मिळतो. त्यांच्या  जडणघडणीत वडिलांपेक्षाही आईचा प्रभाव मोलाचा होता. त्यांच्या आईने त्यांना स्वाभिमानाचे संस्कार दिले. एकदा त्यांच्या वडिलांना ल़ॉटरी लागली होती तेव्हा  लॉटरी ७५ रुपयांची होती. पण हे पैसे परक्याचे आहेत आपल्याला कष्टाचीच भाकरी हवी, अशी त्यांच्या आईची शिकवण होती. त्यांच्या आईमुळेच त्यांना वाचनाची सवय लावली आणि त्यानंतर महाराष्ट्राला एक हरहून्नरी लेखक पत्रकार मिळाला.

प्रबोधनकारांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ रोजी रायगडमधील पाली येथे झाला. अष्टविनायकमधील पालीचा गणपती त्यांचे कूलदैवत असल्याचा उल्लेख काही कागदपत्रात मिळतो. त्यांच्या जडणघडणीत वडिलांपेक्षाही आईचा प्रभाव मोलाचा होता. त्यांच्या आईने त्यांना स्वाभिमानाचे संस्कार दिले. एकदा त्यांच्या वडिलांना ल़ॉटरी लागली होती तेव्हा लॉटरी ७५ रुपयांची होती. पण हे पैसे परक्याचे आहेत आपल्याला कष्टाचीच भाकरी हवी, अशी त्यांच्या आईची शिकवण होती. त्यांच्या आईमुळेच त्यांना वाचनाची सवय लावली आणि त्यानंतर महाराष्ट्राला एक हरहून्नरी लेखक पत्रकार मिळाला.

2 / 7
 समोर दिसणाऱ्या अन्याया विरुद्ध पेटून उठणे. बंडखोर स्वभावाचा वटवृक्षासारखा बहरणारा हा माणूस जणू शंभर माणसांच आयुष्य जगला. चाकोरीत विचार करणं  त्यांना मान्यच नव्हत. एका चौकटीत राहून त्यांनी काम केलं नाही . वडिलांची नोकरी सुटल्यामुळे आणि पनवेलमध्येपुढचं शिक्षण नसल्यामुळे त्यांच शिक्षण थांबलं. त्यामुळे कधी बारामती तर कधी मध्य भारतातलं देवास अशी धावाधाव झाली.  तेव्हापासून साईनबोर्ड रंगवणं, रबरी स्टॅम्प बनवणं, बुकबायडिंग, भिंती रंगवणं, फोटोग्राफी, मशीन मेकॅनिक असे  व्यवसाय त्यांनी केले. हुन्नर असेल तर बेकारी कशाला, हे जगण्याचं ध्येयच होतं.

समोर दिसणाऱ्या अन्याया विरुद्ध पेटून उठणे. बंडखोर स्वभावाचा वटवृक्षासारखा बहरणारा हा माणूस जणू शंभर माणसांच आयुष्य जगला. चाकोरीत विचार करणं त्यांना मान्यच नव्हत. एका चौकटीत राहून त्यांनी काम केलं नाही . वडिलांची नोकरी सुटल्यामुळे आणि पनवेलमध्येपुढचं शिक्षण नसल्यामुळे त्यांच शिक्षण थांबलं. त्यामुळे कधी बारामती तर कधी मध्य भारतातलं देवास अशी धावाधाव झाली. तेव्हापासून साईनबोर्ड रंगवणं, रबरी स्टॅम्प बनवणं, बुकबायडिंग, भिंती रंगवणं, फोटोग्राफी, मशीन मेकॅनिक असे व्यवसाय त्यांनी केले. हुन्नर असेल तर बेकारी कशाला, हे जगण्याचं ध्येयच होतं.

3 / 7
सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे प्रणेते प्रबोधनकारांनीसार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात केली. गुजराती गरबे आणि बंगाली दुर्गापूजा हे आधीपासून असतीलही पण मूर्ती आणून देवीची महाराष्ट्रीय पद्धतीची  नवरात्री सुरू करण्याचं श्रेय प्रबोधनकारांचेच होते.

सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे प्रणेते प्रबोधनकारांनीसार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात केली. गुजराती गरबे आणि बंगाली दुर्गापूजा हे आधीपासून असतीलही पण मूर्ती आणून देवीची महाराष्ट्रीय पद्धतीची नवरात्री सुरू करण्याचं श्रेय प्रबोधनकारांचेच होते.

4 / 7
साहित्य :  ‘वक्तृत्वशास्त्र’ (१११९) हे प्रबोधनकारांचं पहिलं महत्त्वाचं पुस्तक मानायला हवं.  खुद्द लोकमान्य टिळकांनी याचं कौतूक केलं होतं. पण त्याआधीही त्यांनी ‘लाईफ अँड मिशन ऑफ रामदास ’ (१९१८) हे संत रामदासांचं इंग्रजी चरित्र लिहिल्याचा उल्लेख आहे. पण ते पुस्तक आज उपलब्ध नाही.‘माझी जीवनगाथा ’ हे त्यांचं आठवणीपर आत्मचरित्र आज विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज बनलाय.

साहित्य : ‘वक्तृत्वशास्त्र’ (१११९) हे प्रबोधनकारांचं पहिलं महत्त्वाचं पुस्तक मानायला हवं. खुद्द लोकमान्य टिळकांनी याचं कौतूक केलं होतं. पण त्याआधीही त्यांनी ‘लाईफ अँड मिशन ऑफ रामदास ’ (१९१८) हे संत रामदासांचं इंग्रजी चरित्र लिहिल्याचा उल्लेख आहे. पण ते पुस्तक आज उपलब्ध नाही.‘माझी जीवनगाथा ’ हे त्यांचं आठवणीपर आत्मचरित्र आज विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज बनलाय.

5 / 7
 संयुक्त महाराष्ट्र:  संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, भाई माधवराव बागल, ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी आणि सेनापती बापट प्रमुख नेत्यांमध्ये होते. मुंबई खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नानेच महाराष्ट्राला मिळाली.

संयुक्त महाराष्ट्र: संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, भाई माधवराव बागल, ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी आणि सेनापती बापट प्रमुख नेत्यांमध्ये होते. मुंबई खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नानेच महाराष्ट्राला मिळाली.

6 / 7
२० नोव्हेंबर १९७३ रोजी प्रबोधनकारांचं निधन झालं. आणि एक ज्वलंतशिल लेखणीला पुर्णविराम लागला. त्यांची अंत्ययात्रा ही बाबासाहेब आंबेडकरांनंतरची मुंबईतली सर्वात मोठी अंत्ययात्रा मानली गेली.

२० नोव्हेंबर १९७३ रोजी प्रबोधनकारांचं निधन झालं. आणि एक ज्वलंतशिल लेखणीला पुर्णविराम लागला. त्यांची अंत्ययात्रा ही बाबासाहेब आंबेडकरांनंतरची मुंबईतली सर्वात मोठी अंत्ययात्रा मानली गेली.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.