AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026 : अर्शदीप-बुमराहमध्ये थेट लढत, टीम इंडियाचे प्रमुख गोलंदाज एका गोष्टीसाठी आमनेसामने, नक्की काय?

Icc T20 World Cup 2026 IND vs SA Super 8: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी 22 फेब्रुवारीला भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध सुपर 8 फेरीतील आपला पहिला सामना खेळणार आहेत. या सामन्यात अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह यांच्यात थेट लढत होणार आहे.

| Updated on: Feb 22, 2026 | 5:18 PM
Share
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहेत. या सामन्यात अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या 2 भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Photo Credit : PTI)

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहेत. या सामन्यात अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या 2 भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे दोघे टीम इंडियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. या दोघांच्या निशाण्यावर टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. सध्या हा विक्रम हा माजी फिरकीपटू आर अश्विन याच्या नावावर आहे. अश्विनने 24 सामन्यांमध्ये 32 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : PTI)

अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे दोघे टीम इंडियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. या दोघांच्या निशाण्यावर टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. सध्या हा विक्रम हा माजी फिरकीपटू आर अश्विन याच्या नावावर आहे. अश्विनने 24 सामन्यांमध्ये 32 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : PTI)

2 / 5
जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह या दोघांना टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी प्रत्येकी 2 विकेट्सची गरज आहे. बुमराह आणि अर्शदीप या दोघांच्या नावावर प्रत्येकी 30-30 विकेट्सची नोंद आहे. त्यामुळे सर्वात आधी कोण 2 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरणार याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)

जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह या दोघांना टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी प्रत्येकी 2 विकेट्सची गरज आहे. बुमराह आणि अर्शदीप या दोघांच्या नावावर प्रत्येकी 30-30 विकेट्सची नोंद आहे. त्यामुळे सर्वात आधी कोण 2 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरणार याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
अर्शदीप आणि जसप्रीत या दोघांव्यतिरिक्त ऑलराउंडर हार्दिक पंड्या हा देखील या शर्यतीत आहे. हार्दिकने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत 29 विकेट्स मिळवल्या आहेत.  त्यामुळे हार्दिकला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी 4 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्शदीप, बुमराह आणि हार्दिक या तिघांपैकी कोण जास्तीत जास्त विकेट्स घेण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo Credit : PTI)

अर्शदीप आणि जसप्रीत या दोघांव्यतिरिक्त ऑलराउंडर हार्दिक पंड्या हा देखील या शर्यतीत आहे. हार्दिकने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत 29 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे हार्दिकला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी 4 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्शदीप, बुमराह आणि हार्दिक या तिघांपैकी कोण जास्तीत जास्त विकेट्स घेण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांसाठी सुपर 8 मधील पहिला सामना फार महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना जिंकून विजयी सलामी देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकतं हे निकालानंतरच स्पष्ट होईल. (Photo Credit : PTI)

दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांसाठी सुपर 8 मधील पहिला सामना फार महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना जिंकून विजयी सलामी देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकतं हे निकालानंतरच स्पष्ट होईल. (Photo Credit : PTI)

5 / 5
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.