AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटावर विश्वास; कल्याण मधील ‘या’ गावाला तब्बल 20 वर्षानंतर मिळाला पहिला सरपंच

कल्याण तालुक्यातील (Kalyan) वाहोली ग्रामपंचायतीला तब्बल वीस वर्षानंतर पहिला सरपंच मिळाला आहे.

ठाकरे गटावर विश्वास; कल्याण मधील 'या' गावाला तब्बल 20 वर्षानंतर मिळाला पहिला सरपंच
| Updated on: Oct 17, 2022 | 5:36 PM
Share

मुंबई : राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. मात्र, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत एक अजब निकाल पहायला मिळाला आहे. कल्याण तालुक्यातील (Kalyan) वाहोली ग्रामपंचायतीला तब्बल वीस वर्षानंतर पहिला सरपंच मिळाला आहे. ठाकरे गटाचे शाहीम सरवले वाहोली ग्रामपंचायतीचे सरंपच झाले आहेत. येथील ग्रामस्थांनी ठाकरे गटावर विश्वास दाखवला आहे. यामुळे येथे वेगळाच जल्लोष पहायला मिळत आहे.

कल्याण तालुक्यातील वाहोली ग्रामपंचायत मागील वीस वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली खाली होती. मागील 20 वर्षांनंतर ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

मात्र, यंदा निवडणुकीवर बहिष्कार न टाकता ग्रामस्थांनी मतदानाचा निर्णय घेतला. ठाकरे गटाने शाहीम सरवले यांना सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले. मात्र, वाहोली पाड्यातून कैलास रोहने यांनी थेट सरपंच पदासाठी अर्ज दाखल केल्याने येथे निवडणूक घेण्यात आली.

तब्बल वीस वर्षांनतर ग्रामस्थांनी मतदान केले. या निवडणुकीच ठाकरे गटाचे शाहीम सरवले सरपंच म्हणून निवडणून आले आहेत.

कल्याण तालुक्याचा निकाल

  1. वाहोली ग्रामपंचायत – ग्रामविकास पॅनल कडून शाहीम सरवले विजयी
  2. केळणी कोलम गट ग्रा. प. – भाजपचे राजेश भोईर विजयी
  3. मामनोली ग्रामपंचायत – भाजपचे सुशांत कोर
  4. दहिवली अडीवली ग्रामपंचायत – ठाकरे गटाकडून कमलाकर राऊत विजयी
  5. रुंदे ग्रामपंचायत – भाजप चे नरेश चौधरी
  6. फळेगाव ( बिनविरोध) – राष्ट्रवादी भारती जाधव
  7. उषीद बिनविरोध – शिवसेना ठाकरे गट सुवर्णा भोईर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि तालुक्यातील एकूण सात ग्रामपंचायतसाठी निवडणूक पार पडली.

यातील कल्याण तालुक्यातील फळेगाव आणि उशीद या दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे या दोन ग्रामपंचायत वगळून इतर पाच ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी झाली असून या ग्रामपंचायतीत भाजप 3, ठाकरे गट 2, राष्ट्रवादी 1,तर इतर 1 असा निकाल लागला आहे.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.