AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटावर विश्वास; कल्याण मधील ‘या’ गावाला तब्बल 20 वर्षानंतर मिळाला पहिला सरपंच

कल्याण तालुक्यातील (Kalyan) वाहोली ग्रामपंचायतीला तब्बल वीस वर्षानंतर पहिला सरपंच मिळाला आहे.

ठाकरे गटावर विश्वास; कल्याण मधील 'या' गावाला तब्बल 20 वर्षानंतर मिळाला पहिला सरपंच
| Updated on: Oct 17, 2022 | 5:36 PM
Share

मुंबई : राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. मात्र, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत एक अजब निकाल पहायला मिळाला आहे. कल्याण तालुक्यातील (Kalyan) वाहोली ग्रामपंचायतीला तब्बल वीस वर्षानंतर पहिला सरपंच मिळाला आहे. ठाकरे गटाचे शाहीम सरवले वाहोली ग्रामपंचायतीचे सरंपच झाले आहेत. येथील ग्रामस्थांनी ठाकरे गटावर विश्वास दाखवला आहे. यामुळे येथे वेगळाच जल्लोष पहायला मिळत आहे.

कल्याण तालुक्यातील वाहोली ग्रामपंचायत मागील वीस वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली खाली होती. मागील 20 वर्षांनंतर ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

मात्र, यंदा निवडणुकीवर बहिष्कार न टाकता ग्रामस्थांनी मतदानाचा निर्णय घेतला. ठाकरे गटाने शाहीम सरवले यांना सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले. मात्र, वाहोली पाड्यातून कैलास रोहने यांनी थेट सरपंच पदासाठी अर्ज दाखल केल्याने येथे निवडणूक घेण्यात आली.

तब्बल वीस वर्षांनतर ग्रामस्थांनी मतदान केले. या निवडणुकीच ठाकरे गटाचे शाहीम सरवले सरपंच म्हणून निवडणून आले आहेत.

कल्याण तालुक्याचा निकाल

  1. वाहोली ग्रामपंचायत – ग्रामविकास पॅनल कडून शाहीम सरवले विजयी
  2. केळणी कोलम गट ग्रा. प. – भाजपचे राजेश भोईर विजयी
  3. मामनोली ग्रामपंचायत – भाजपचे सुशांत कोर
  4. दहिवली अडीवली ग्रामपंचायत – ठाकरे गटाकडून कमलाकर राऊत विजयी
  5. रुंदे ग्रामपंचायत – भाजप चे नरेश चौधरी
  6. फळेगाव ( बिनविरोध) – राष्ट्रवादी भारती जाधव
  7. उषीद बिनविरोध – शिवसेना ठाकरे गट सुवर्णा भोईर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि तालुक्यातील एकूण सात ग्रामपंचायतसाठी निवडणूक पार पडली.

यातील कल्याण तालुक्यातील फळेगाव आणि उशीद या दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे या दोन ग्रामपंचायत वगळून इतर पाच ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी झाली असून या ग्रामपंचायतीत भाजप 3, ठाकरे गट 2, राष्ट्रवादी 1,तर इतर 1 असा निकाल लागला आहे.

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.