AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटावर विश्वास; कल्याण मधील ‘या’ गावाला तब्बल 20 वर्षानंतर मिळाला पहिला सरपंच

कल्याण तालुक्यातील (Kalyan) वाहोली ग्रामपंचायतीला तब्बल वीस वर्षानंतर पहिला सरपंच मिळाला आहे.

ठाकरे गटावर विश्वास; कल्याण मधील 'या' गावाला तब्बल 20 वर्षानंतर मिळाला पहिला सरपंच
vanita kamble
vanita kamble | Updated on: Oct 17, 2022 | 5:36 PM
Share

मुंबई : राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. मात्र, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत एक अजब निकाल पहायला मिळाला आहे. कल्याण तालुक्यातील (Kalyan) वाहोली ग्रामपंचायतीला तब्बल वीस वर्षानंतर पहिला सरपंच मिळाला आहे. ठाकरे गटाचे शाहीम सरवले वाहोली ग्रामपंचायतीचे सरंपच झाले आहेत. येथील ग्रामस्थांनी ठाकरे गटावर विश्वास दाखवला आहे. यामुळे येथे वेगळाच जल्लोष पहायला मिळत आहे.

कल्याण तालुक्यातील वाहोली ग्रामपंचायत मागील वीस वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली खाली होती. मागील 20 वर्षांनंतर ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

मात्र, यंदा निवडणुकीवर बहिष्कार न टाकता ग्रामस्थांनी मतदानाचा निर्णय घेतला. ठाकरे गटाने शाहीम सरवले यांना सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले. मात्र, वाहोली पाड्यातून कैलास रोहने यांनी थेट सरपंच पदासाठी अर्ज दाखल केल्याने येथे निवडणूक घेण्यात आली.

तब्बल वीस वर्षांनतर ग्रामस्थांनी मतदान केले. या निवडणुकीच ठाकरे गटाचे शाहीम सरवले सरपंच म्हणून निवडणून आले आहेत.

कल्याण तालुक्याचा निकाल

  1. वाहोली ग्रामपंचायत – ग्रामविकास पॅनल कडून शाहीम सरवले विजयी
  2. केळणी कोलम गट ग्रा. प. – भाजपचे राजेश भोईर विजयी
  3. मामनोली ग्रामपंचायत – भाजपचे सुशांत कोर
  4. दहिवली अडीवली ग्रामपंचायत – ठाकरे गटाकडून कमलाकर राऊत विजयी
  5. रुंदे ग्रामपंचायत – भाजप चे नरेश चौधरी
  6. फळेगाव ( बिनविरोध) – राष्ट्रवादी भारती जाधव
  7. उषीद बिनविरोध – शिवसेना ठाकरे गट सुवर्णा भोईर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि तालुक्यातील एकूण सात ग्रामपंचायतसाठी निवडणूक पार पडली.

यातील कल्याण तालुक्यातील फळेगाव आणि उशीद या दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे या दोन ग्रामपंचायत वगळून इतर पाच ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी झाली असून या ग्रामपंचायतीत भाजप 3, ठाकरे गट 2, राष्ट्रवादी 1,तर इतर 1 असा निकाल लागला आहे.

Follow Us
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलां
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान
राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच
Sanjay Dina Patil | राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं....
Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात धक्कादायक खुलासा, आता...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी... राजकारणात मोठं घडतंय?
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?