AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Kapoor | राहाच्या जन्मानंतर रणबीर कपूर याला ‘या’ गोष्टीमुळे वाटत आहे असुरक्षित

रणबीर आणि आलिया दोघेही जास्त वेळ हा आपल्या मुलीसोबतच घालवत आहेत.

Ranbir Kapoor | राहाच्या जन्मानंतर रणबीर कपूर याला 'या' गोष्टीमुळे वाटत आहे असुरक्षित
| Updated on: Dec 09, 2022 | 6:02 PM
Share

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बाॅलिवूडमधील सर्वाच चर्चेत असलेली नावे आहेत. काही दिवसांपूर्वीच आलियाला मुलगी झालीये. आलिया आणि रणबीर यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आलियाने मुलीच्या नावाचा अर्थही सांगून टाकला आहे. रणबीर आणि आलिया दोघेही जास्त वेळ हा आपल्या मुलीसोबतच घालवत आहेत. सौदी अरेबिया येथे रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये रणबीर कपूर याने हजेरी लावली होती.

रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये रणबीर कपूर याने चित्रपटांविषयी अनेक गोष्टींवर चर्चा केली. इतकेच नाही तर मुलीचा बाप झाल्यापासून रणबीर खूप जास्त आनंदी आहे. मात्र, यादरम्यानच त्याला असुरक्षित देखील वाटत असल्याचे रणबीर याने सांगितले.

रणबीर म्हणाला की, मुलगी झाल्यामुळे मी खूप जास्त खुश आहे. परंतू मला असुरक्षित देखील वाटत आहे. रणबीर म्हणाला मी हा विचार करतोय की या सर्व गोष्टी करण्यासाठी मी इतका जास्त वेळ का घेतला?

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

मी हा विचार करतो की, मी ज्यावेळी 60 वर्षांच्या होईल. त्यावेळी माझी मुले 20-21 वर्षांची असतील मग मी त्यांच्यासोबत फुटबॉल खेळू शकेल? त्यांच्यासोबत पळू शकेल? हे थोडे वेगळे विचार असल्याचे देखील रणबीर याने सांगितले.

यापूर्वी आयुष्यामध्ये कधीच असा विचार केला नसल्याचे देखील यावेळी रणबीर कपूर याने सांगितले. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी तब्बल 5 वर्ष डेट करून लग्नाचा निर्णय घेतला. यांच्या लग्नाचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

रणबीर आणि आलिया यांच्या मुलीचे नाव नीतू कपूर यांनी ठेवले आहे. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून यांच्या लेकीची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, रणबीर किंवा आलिया यांनी कोणीच राहाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.