ना शिवसेना, ना अकाली, पासवानांच्या निधनानंतर NDA जवळपास रिकामी, एकट्या आठवलेंवर भाजपची भिस्त

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात मित्र पक्षांचं स्थान नसल्यासारखं झालं आहे.

ना शिवसेना, ना अकाली, पासवानांच्या निधनानंतर NDA जवळपास रिकामी, एकट्या आठवलेंवर भाजपची भिस्त
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 12:59 PM

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मित्र पक्षांचं स्थान नसल्यासारखंच आहे. मोदींचं मंत्रिमंडळ आता केवळ नावापुरतं एनडीएचं (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) मंत्रिमंडळ आहे. पासवानांच्या मृत्यूनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ एकच मंत्री हे गैरभाजपचे आहेत. उर्वरीत सर्व मंत्री हे भाजपचे आहेत. (After Ram Vilas Paswan demise only one non bjp face in nda cabinet now)

पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा सरकार स्थापन करताना पूर्वीपेक्षा लहान मंत्रीमंडळ बनवलं होतं. गेल्या दिड वर्षात एक-एक करुन वेगवेगळ्या कारणांमुळे भाजपचे मित्रपक्ष एनडीएमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता केवळ एकाच पक्षाचे केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येत आहेत. परंतु त्याबद्दल अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यंदाच्या नवरात्रीदरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी सुरुवातीला चर्चा होती. परंतु आता पीएम मोदी बिहार निवडणुकीदरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

कॅबिनेटमध्ये 57 मंत्री होते

पीएम मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात बनवलेल्या मंत्रिमंडळात सुरुवातीला 57 मंत्री होते. त्यावेळी जदयू आणि अपना दल या पक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. त्यावेळी अशी चर्चा सुरु होती की, मोदी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. त्यामध्ये या दोन पक्षांना स्थान दिले जाईल.

मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद दिले होते. परतु महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिवसेनेने राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आहे.

आता फक्त आठवलेंवर भिस्त

अकाली दलच्या हरसिमरत कौर यांनी नव्या कृषी कायद्याला विरोध करत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान लोजपाचे रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ एक मंत्री गैरभाजप पक्षाचे आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले केंद्रिय मंत्रीमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात मराठीचा आग्रह संविधानविरोधी, आठवलेंना भय्यांचा पुळका

Ram Vilas Paswan | रामविलास पासवान : राजकीय हवेचा अंदाज अचूक ओळखणारा नेता

Ram Vilas Paswan | रामविलास पासवान यांच्या जाण्याने देशाने द्रष्टा नेता गमावला: राष्ट्रपती रामनाथ कोविंद

(After Ram Vilas Paswan demise only one non bjp face in nda cabinet now)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.