
तुमच्या लक्षात असेल की आपण कधी फ्रेंच फ्राइज खाल्लं तर आपल्याला त्यानंतर प्रचंड भूक लागते. का? शरीरात जर मीठ जास्त झालं की आपलं शरीर डिहायड्रेट होतं. म्हणजेच आपल्याला सारखी तहान लागते. सतत तहान लागत असेल तर समजा की आपल्या शरीरात मीठ जास्त आहे.

मीठ जास्त झालं की सारखी लघवी येते. मिठाचे जास्त सेवन होत असेल तर रात्री अनेक वेळा टॉयलेटला जाण्यासाठी जाग येते. झोपण्यापूर्वी मिठाचे सेवन मर्यादित करा. सारखी लघवी लागते आणि मग शरीर डिहायड्रेट होतं. डिहायड्रेशन ही समस्या मिठाचे जास्त सेवन केल्यानेच येते.

मिठाचे जास्त सेवन केल्याने सारखी डोकेदुखी होते. शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त होते आणि मग मेंदूतील रक्तवाहिन्या एक्सपांड होतात, पसरतात, विस्तारतात. यामुळेच डोकेदुखीची समस्या उद्भवते.

2012 च्या एका कॅनेडियन अभ्यासानुसार, मिठाच्या जास्त सेवनाने आपल्याला लक्ष केंद्रित करायला अडचण निर्माण होऊ शकते. जे लोकं मीठ जास्त खातात त्यांना एकाग्रता एक अडचण वाटू शकते. अशी लोकं मन शांत करून लक्ष केंद्रित करूच शकत नाहीत.

सोडियम जास्त झाल्यास आपली त्वचा कोरडी होते. असं म्हणतात की मिठाचं सेवन कमी असल्यास त्वचा टवटवीत दिसते. परंतु हेच प्रमाण जर जास्त असेल तर त्वचा कोरडी दिसते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. मिठाचे सेवन प्रमाणात करा.