टप्पूने ‘तारक मेहता..’ मालिका का सोडली? बबितासोबत अफेअरच्या चर्चांवर म्हणाला..

'या' कारणामुळे टप्पूने सोडली 'तारक मेहता..' मालिका; अखेर कारण आलं समोर

टप्पूने 'तारक मेहता..' मालिका का सोडली? बबितासोबत अफेअरच्या चर्चांवर म्हणाला..
Raj Anadkar and Munmun DuttaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 8:58 AM

मुंबई: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेनं गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यात टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकत याने नुकताच मालिकेला रामराम केला. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने मालिकेचा निरोप घेत असल्याचं जाहीर केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजने मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं. यासोबतच त्याने बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता हिच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली.

‘तारक मेहता..’ मालिकेतील टप्पू म्हणजेच राज आणि बबिता म्हणजेच मुनमुन हे एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा होती. राज आणि मुनमुन यांच्या वयात 9 वर्षांचं अंतर आहे. मालिकेच्या सेटवर या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले, असं म्हटलं जात होतं. अनेकदा या दोघांना सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा केलं गेलं. मात्र दोघांनी वारंवार या चर्चा फेटाळल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. “काही लोक अजूनही त्याबद्दल बोलतात. मात्र मी नेहमीच माझ्या कामावर लक्ष केंद्रीत केलंय. गॉसिप हा अभिनेत्याच्या आयुष्याचा एक भाग असतो. मी माझ्या कामावर अधिक लक्ष देतो आणि अशा चर्चांकडे दुर्लक्ष करतो. माझ्या कामावरून लक्ष विचलित होईल अशा चर्चांकडे मी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. मला अशा चर्चांचा त्रास होत नाही”, असं तो म्हणाला.

यावेळी त्याने मालिका सोडण्यामागचं कारणसुद्धा सांगितलं. “हा माझा वैयक्तिक निर्णय होता. त्यात काहीच चुकीचं झालं नाही. एक अभिनेता म्हणून मला पुढे जायचं आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारून मला एक कलाकार म्हणून पुढे जायचं आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी टप्पूची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी मी कायम कृतज्ञ राहीन. मात्र यापुढे मला काहीतरी वेगळं साकारायचं आहे”, असं उत्तर राजने दिलं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.