भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 लाखांच्या पार; देशभरात 1 लाख 32 हजारांहून अधिक मृत्यू : आरोग्य मंत्रालय

देशात गेल्या 24 तासात 46 हजार 232 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 लाखांच्या पार; देशभरात 1 लाख 32 हजारांहून अधिक मृत्यू : आरोग्य मंत्रालय
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 11:35 AM

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांमध्ये 46 हजार 232 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे काल रात्री देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90.5 लाखांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नव्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 46 हजार 232 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 546 बाधितांचा उपचारांरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 90,50,598 इतकी झाली आहे. (Covid19 cases in india crossed 90.5 lakh and 132726 total deaths)

देशात 4 लाख 39 हजार 747 सक्रीय रुग्ण

देशात आज सकाळपर्यंत 4 लाख 39 हजार 747 सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत देशात 84 लाख 78 हजार 124 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आतापर्यंत देशात 13 कोटी 6 लाख 57 हजार 808 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात 10 लाख 66 हजार 22 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 20 हजारांपेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत.

मुंबई सावरतेय, दिल्लीत कोरोनाचा कहर

आतापर्यंत देशात सर्वाधित रुग्ण मुंबईत होते. परंतु हिवाळा सुरू होताच दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून मुंबई मात्र सावरल्याचं दिसून येत आहे. दिल्लीतील नागरिकांचा निष्काळजीपणा आणि सरकारचा हलगर्जीपणा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचं एका सर्व्हेतून आढळून आलं आहे. सणांमध्ये वाढलेली नागरिकांची गर्दी, मेट्रो आणि बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा घाईने घेतलेला निर्णय, लॉकडाऊनमध्ये दिलेली सवलत, कोविड सेंटरची कमतरता आणि मोहिमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आलेलं अपयश या पाच कारणांमुळे दिल्लीतील कोरोना नियंत्रणाचा कार्यक्रम फसल्याचं या अहवालातून पुढे आलं आहे.

हिवाळा सुरू झाला असून दिल्लीमध्ये कोविड बाधितांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तथापि, याबाबत एका डॉक्टराने तपमान व कोविड याचा थेट संबंध नसल्याचे सांगितले आहे. मात्र, हिवाळ्यात लोकांचे हात धुण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर दिल्लीकरांकडून सतत कपडे बदलण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे संसर्गात वाढ होऊ शकते, असे या डॉक्टराने नमूद केल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

28 ऑक्टोबरपासून दिल्लीतली परिस्थिती बिघडली

दिल्लीमध्ये 28 ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. 28 ऑक्टोबरला दिल्लीत 5 हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळली.11 नोव्हेंबरला 8 हजार कोरोना रुग्ण आढळले होते. कोरोना संसर्गाचे प्रमाण दिल्लीत वाढत असून बुधवारी 7486 कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 131 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 7943 वर पोहोचली आहे. यासोबत दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्येंने 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. 4 लाख 52 हजार 683 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 42 हजार 458 जणांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या

दिल्लीत कोरोनाचा कहर, अरविंद केजरीवालांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

कोरोनाची लस देताना सामान्य-व्हीआयपी असा भेदभाव करु नका, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा : अरविंद केजरीवाल

देशातली पहिली कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू, 26 हजार स्वयंसेवकांचा समावेश

(Covid19 cases in india crossed 90.5 lakh and 132726 total deaths)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.