AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरोदरपणात रिकाम्या पोटी फळे खाणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ञांचे मत

गरोदरपणात फळांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. त्यात अनेक खनिजे असतात जी गरोदर महिला आणि तिच्या बाळासाठी आवश्यक असतात. पण गरोदरपणात काही महिला सकाळी रिकाम्या पोटी फळे खातात. रिकाम्या पोटी फळे खाणे की योग्य आहे का? हे जाणून घेऊ तज्ञांकडून.

गरोदरपणात रिकाम्या पोटी फळे खाणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ञांचे मत
| Edited By: | Updated on: Feb 03, 2025 | 3:18 PM
Share

गरोदरपणामध्ये योग्य आहार घेणे फार महत्त्वाचे आहे. आहाराचा थेट परिणाम आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर होत असतो. गरोदरपणात महिलांनी फळे खावी त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आणि जीवनसत्वे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. पण काही महिला गरोदरपणात रिकाम्या पोटी फळे खातात. महिलांनी आपल्या आहारात फळांचा नक्कीच समावेश करावा असे औषध तज्ञ डॉक्टर पंकज वर्मा सांगतात. पण फळे खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. गरोदरपणा मध्ये फळे रिकाम्या पोटी खाऊ शकता की नाही हे तज्ञांकडून जाणून घेऊ.

गरोदर असताना रिकाम्या पोटी फळे खाता येतात का?

गरोदर असताना रिकाम्या पोटी फळे खाणे सुरक्षित असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठून रिकाम्या पोटी फळे खातात तेव्हा तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. फळे खाल्ल्याने पचन सुलभ होते. याशिवाय फळे तुम्हाला आवश्यक फायबर देखील फळांमधून मिळते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

फळे तुमच्या शरीरात डिटॉक्सिफिकेशनचे काम करतात आणि रक्तातील साखर संतुलित ठेवतात. पण आंबट फळे सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नये. आंबट फळे पोटात ऍसिड वाढवू शकतात. त्यामुळे शरीराला हानी पोहोचू शकते.

गरोदर असताना कोणती फळे खाणे सुरक्षित?

केळी, सफरचंद आणि पपई ही फळे गरोदरपणात खाणे सुरक्षित मानले जाते. ही सर्व फळे पचायला सोपी असतात आणि स्त्रीच्या शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवतात. मात्र तज्ञांकडून डायट चार्ट बनवून घेतल्यानंतर तुमच्या आहारात फळांचा समावेश करा.

वेळ आणि खाण्याची पद्धत

गरोदर असताना कोणती फळे खाणे फायदेशीर आहे हे जाणून घेण्यासोबतच फळे योग्य वेळी आणि योग्य मार्गाने खाणे गरजेचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी फळे खाण्यापूर्वी आपण सकाळी पाणी पिऊ शकता. जेणेकरून शरीर हायड्रेट राहील. नंतर फळे खाल्ल्यानंतर काही वेळाने नाष्टा करा. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि पोषणही चांगले राहते.

सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.