AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलीय; ग्रेट! राजभवनाची खिंड पडली… संजय राऊत यांचं सूचक ट्विट

राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलीय; ग्रेट! तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढूच, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलीय; ग्रेट! राजभवनाची खिंड पडली... संजय राऊत यांचं सूचक ट्विट
राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलीय; ग्रेट!Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 28, 2022 | 3:06 PM
Share

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चोहोबाजूंनी घेरले गेले आहेत. राज्यपालांच्या निषेधार्थ विरोधी पक्षाने महाराष्ट्र बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे. त्या शिवाय माजी खासदार संभाजी छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांच्या विरोधात दंड थोपाटले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी स्वत:हून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचं वृत्त आहे. हे वृत्त येताच ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे. राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलीय; ग्रेट! तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढूच, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा दर्शवल्याच्या बातम्या येताच संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात शिवाजी महाराजांना जुने आदर्श म्हटलं होतं. तसेच शिवाजी महाराजांची तुलना त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी तुलना केली होती. त्यामुळे वादंग उठलं होतं. विरोधकांनी या मुद्द्यावरून राज्यपालांना धारेवर धरलं होतं.

तसेच मराठा संघटनांनीही जागोजागी आंदोलने करून राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी खासदार संभाजी छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी या मुद्द्यावरून राज्यपालांच्या राजनाम्याची मागणी करतानाच महाराष्ट्र बंदचे संकेतही दिले होते. त्यामुळे राज्यपाल कोश्यारींची चांगलीच गोची झाली होती.

त्यानंतर राज्यपाल कोश्यारी अचानक दिल्लीत गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतरही महाराष्ट्रातील आंदोलने न थांबल्याने अखेर राज्यपालांनी पदमुक्त होण्याची निकटवर्तीयांकडे इच्छा वर्तवल्याचं सांगितलं जातं.

Follow Us
एकनाथ शिंदे यांना आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद हवंय?
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद हवंय? नेमकं कोणत्या खासदारासाठी?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम