कधी, कोणाला आणि का दान करावे? जाणून घ्या दान करण्याचे महत्त्व आणि फायदे
सनातन परंपरेत अनेक प्रकारचे दान सांगितले गेले आहेत. ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीला योग्यता प्राप्त होते. दानामुळे केवळ ग्रहांचे दोषच दूर होत नाहीत तर जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती देखील मिळते. शास्त्रात सामान्य जीवनातल्या सर्व प्रकारच्या अडचणींवर विजय मिळवण्यासाठी दानाचा उपाय सांगण्यात आला आहे.
मुंबई : सनातन परंपरेत अनेक प्रकारचे दान सांगितले गेले आहेत. ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीला योग्यता प्राप्त होते. दानामुळे केवळ ग्रहांचे दोषच दूर होत नाहीत तर जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती देखील मिळते. शास्त्रात सामान्य जीवनातल्या सर्व प्रकारच्या अडचणींवर विजय मिळवण्यासाठी दानाचा उपाय सांगण्यात आला आहे. ज्यामुळे चमत्कारिक फळांचे प्राप्ती होते. जीवनाशी संबंधित असे दान ज्यांना महादान म्हणतात आणि ज्यांचे पालन केल्याने आपले कल्याण होते, जाणून घ्या (Know The Rules For Daan Or Donation Will Blessed You And Help To Get Rid Of Your All Sins) –
गायीचं दान
शास्त्रात गाय दानाला महादान म्हटलं गेलं आहे. मान्यता आहे की गाय दान करणाऱ्या व्यक्तीची सर्व पापं दूर होतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो.
ज्ञान दान
सर्व प्रकारच्या दानांपैकी ज्ञान दानाला देखील एक महादान मानले जाते. आपण एखाद्या असमर्थ व्यक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था केल्यास किंवा त्याला विनामूल्य शिकवल्यास नक्कीच तुम्हाला पुण्याची प्राप्ती होते आणि देवी सरस्वतीसह सर्व देवी-देवतांचे तुम्हाला नेहमीच आशीर्वाद मिळेल.
जमीन दान
जर तुम्ही एखाद्या शुभ हेतूसाठी किंवा कोणत्याही गरजूंना जमीन दान केली तर तुम्हाला अनंत पुण्य मिळते. शास्त्रात याला महादान असेही म्हणतात.
दीप दान
दररोज देवी-देवतांच्या पूजेमध्ये होणार्या दीप दानला मोठं महत्त्व आहे. हे दान ज्ञान दान प्रमाणेच पुण्यकारक आहे. दररोज भगवान शंकराला दीपदान करुन आपण भगवान महादेवाचा आशीर्वाद घेऊ शकता.
सावली दान
वेगवेगळ्या प्रकारच्या दानांप्रमाणे सावली दानालाही स्वतःचे महत्त्व आहे. हे दान मुख्यतः शनिदेवाशी संबंधित आहे. यासाठी तुम्हाला मातीच्या भांड्यात मोहरीचे तेल ठेवून त्यामध्ये आपली सावली पाहावी लागेल आणि ते तेल एखाद्या व्यक्तीला दान करावे लागेल. हा उपाय केल्याने शनुशी संबंधित दोष दूर होतात.
या गोष्टी दान करु नये
आयुष्यात अनेक गोष्टी दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते आणि सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते, तर काही गोष्टी दान केल्याने आपले नुकसानही होऊ शकते. उदाहरणार्थ, उरलेले किंवा शिळे अन्न, फाटलेले कपडे, झाडू, चाकू किंवा कात्री इत्यादी धारदार किंवा तीक्ष्ण वस्तू कधीही दान करु नये.
देवाच्या आरतीचे आहेत काही नियम, योग्य पद्धतीने आरती केल्यास मिळते पूर्ण फळhttps://t.co/Tqjv6tUjbl#AartiRules #WorshipGod #Spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 21, 2021
Know The Rules For Daan Or Donation Will Blessed You And Help To Get Rid Of Your All Sins
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Navgrah Mantra | नवग्रह कवच मंत्राच्या जाप करा, आयुष्यातील सर्व त्रास होतील दूर