AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagraj Manjule: “प्रेम करणं हाच विद्रोह”; पहा नागराज मंजुळेंचं गाजत असलेलं ‘विद्रोही’ भाषण

उदगीरमध्ये पार पडलेल्या 16व्या विद्रोही संमेलनाच्या (Vidrohi Marathi Sahitya Sammelan) समारोपाला त्यांनी हजेरी लावली होती. सर्वसामान्य लोक आणि साहित्य यांच्यातील दरी कमी व्हावी असंही त्यांनी यावेळी म्हटलं. (Latur)

Nagraj Manjule: प्रेम करणं हाच विद्रोह; पहा नागराज मंजुळेंचं गाजत असलेलं 'विद्रोही' भाषण
Nagraj ManjuleImage Credit source: Tv9
| Updated on: Apr 25, 2022 | 10:26 AM
Share

“आजच्या काळात विद्रोह म्हणजे विद्रोह नाही, तर प्रेम करणं हाच विद्रोह आहे. भांडणं सोपं झालंय आणि भांडण सुरू झाल्यावर शांत बसणं म्हणजे विद्रोह. त्याला खरी ताकद लागते, नाहीतर अरे ला कारे म्हणायला काहीच ताकद लागत नाही,” असं म्हणत दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी सर्वसामान्यांच्या जगण्यात उपयोगी पडणारं साहित्य आणि कला पुढे आणण्याचं आवाहन केलं आहे. उदगीरमध्ये पार पडलेल्या 16व्या विद्रोही संमेलनाच्या (Vidrohi Marathi Sahitya Sammelan) समारोपाला त्यांनी हजेरी लावली होती. सर्वसामान्य लोक आणि साहित्य यांच्यातील दरी कमी व्हावी असंही त्यांनी यावेळी म्हटलं. (Latur)

काय म्हणाले नागराज मंजुळे?

“समाजात कवी आहेत, कलाकार आहेत, साहित्यिक आहेत तरी लोक झोपलेले असतील, तर ही मोठी गडबड आहे. काहीतरी बिनसलेलं आहे. साहित्यिक हा समाजाला जागं करण्याचं काम करतो आणि ते घडलं पाहिजे. समाजातील धोके कोणते हे साहित्यिक सांगतात, त्याविरोधात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतात. विद्रोही संमेलन हे विचारांचं संमेलन आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत साहित्य पोहोचावं, हे अंतर कमी व्हावं”, असं नागराज मंजुळे म्हणाले.

नागराज मंजुळे यांनी यावेळी काही कविता सादर करत विविध सामाजिक प्रश्नांवर, स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य केलं. “विद्रोही संमेलनात दगड, खडी फोडणाऱ्या समाजाचे लोक आले, हेच या संमेलनाचं यश आहे. आजकाल माथी भडकावणं खूप सोपं आहे. त्यांना दिशा देणारे लोक घडविण्याची जबाबदारी आपली आहे,” असं ते पुढे म्हणाले.

पहा संपूर्ण भाषण-

हेही वाचा:

Pratik Gandhi: ‘कॉलर पकडून मुंबई पोलिसांनी गोदामात ढकललं’; ‘स्कॅम 1992’ फेम प्रतीक गांधीसोबत घडला प्रकार

Mannat: शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला ट्विटरवर का होतोय ट्रेंड? ‘हे’ आहे खास कारण

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.