एकीकडे नामांतराची मागणी होत असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराने केली मोठी मागणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

औरंगाबाद शहराच्या नामांतरानंतर पुन्हा अहमदनगर शहराच्या नावाचा मुद्दा चर्चेत आले आहे. स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.

एकीकडे नामांतराची मागणी होत असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराने केली मोठी मागणी, नवा वाद पेटण्याची शक्यता
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 3:29 PM

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : औरंगाबाद शहरानंतर आता अहमदनगर शहराचे नामंतर करण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या वतिने सुरू झाल्या आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकार असतांना राज्य शासनाला पत्र लिहीत अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्या अशी मागणी केली होती. अहिल्यादेवीनगर असे अहमदनगर असे नामकरण करा अशी मागणी केली होती. चौंडी या गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाल्याने त्यांनी ही मागणी केली होती. त्यामध्ये आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्य शासनाने अहमदनगर पालिकेला याबाबत ठराव करून पाठविण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे पालिकेला याबाबत ठराव करता येतो की नाही यावरूनच प्रशासनात गोंधळ सुरू आहे. याबाबत प्रशासनाने याबाबत महासभेत नामंतराचा प्रस्ताव मांडण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहे. यावरुन अहमदनगर जिल्ह्यात मतभेद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी नामांतरापेक्षा जिल्ह्याचे विभाजन करा, कर अशी मागणी केली आहे, त्यामुळे आता नामांतराच्या मुद्याबरोबर जिल्हा विभाजनाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.

विभाजनानंतर काय नाव द्यायचं राजकीय आणि सामाजिक संघटनेकडून विचारविनिमय करून निर्णय घ्यावा, उत्तर नगर जिल्ह्यापेक्षा दक्षिण नगर जिल्हा दुष्काळी आहे, त्यामुळे विभाजन झालं तर दक्षिण जिल्ह्याचा विकास होईल असं संग्राम जगताप म्हणाले आहे.

हे सुद्धा वाचा

अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाला भाजप खासदार सुजय विखे यांनी मात्र विरोध केला आहे, तर जिल्ह्याच नामांतर करून जर दुष्काळ मुक्त होत असेल, पाणी येत असेल लोकांचा त्रास कमी होत असेल तर निश्चित नामांतरण केलं पाहिजे.

तर जिल्ह्याचा नामांतराचा प्रश्नासंदर्भात स्थानिक नागरिक, आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन चर्चा करून शासनाने निर्णय घ्यावा असेही सुजय विखे यांनी म्हंटलं आहे.

जो काही निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल त्या निर्णयाशी मी संलग्न राहील, जिल्हा विभाजनाने नगरची ताकद कमी होईल जिल्ह्याचे विभाजन पुढच्या पिढीसाठी धोकादायक निर्णय असेल

काही लोकांना आमची अडचण असेल, त्याच लोकांची वारंवार ही मागणी येत राहते असा टोलाही सुजय विखे यांनी लगावला आहे.

त्यामुळे येत्या काळात राजकीय मुद्द्यावरून नेहमीच तापलेला अहमदनगर जिल्हा पुन्हा नामंतरच्या मुद्द्यावरू येत्या काळात तापणार हे निश्चित आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.