AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या जाती संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव; मनोज जरांगे पाटील यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

मी यांना मॅनेज होत नाही, हाच त्यांचा प्रॉब्लेम आहे. पैसा आणि पदाशी माझं जमत नाही. इंग्रजीशी जमत नाही. त्यामुळे त्यांना आरक्षण देण्याशिवाय पर्याय नाही. मी खाऊन जगण्यासाठी जन्माला आलो नाही. मी मराठा समाजाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय राहणार नाही. काहीही झालं तरी हरकत नाही. त्यांना मला शत्रू मांडलं तरी काही हरकत नाही. तुम्ही सोबत असल्यावर मी सरकारला विचारतही नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मोठ्या जाती संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव; मनोज जरांगे पाटील यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
manoj jarange patil Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 23, 2023 | 4:57 PM
Share

बीड | 23 डिसेंबर 2023 : देशातील मोठी जात संपवण्याचा तुमचा घाट दिसतो. एकदा जर मोठा समुदाय खवळला तर तुमचा सुपडा साफ होईल. तुमचं राजकीय अस्तित्व साफ होईल. माझ्या मराठ्यांना डिवचू नका, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तुम्ही एकदा प्रयोग केलाय. तुम्हाला अंतरवलीचा प्रयोग भोगावा लागतोय. आता सावध व्हा. कोट्यवधी मराठा एकत्र आला आहे. सामंजस्याने ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याचं (छगन भुजबळ) ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर येणारं आंदोलन तुम्हाला जड जाईल. हा फक्त बीड जिल्हा आहे. अजून महाराष्ट्र बाकी आहे. जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घर बाहेर पडणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये इशारा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हे सरकार झोपेचं सोंग घेत आहे. मराठा समाजाचा अपमान करत आहे. मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. मराठा समाजाच्या जीवावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर छगन भुजबळ सारख्यांना त्याचा लाभ दिला जात आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

त्याला संडास लागेल

हे वादळ पाहून येवल्याच्या येडपटाला संडास लागल्याशिवाय राहणार नाही. मुंगीलाही जागा मिळणार नाही, एवढी ताकद मराठा समाजाने दाखवली. मराठा आरक्षण कसं आणतात ते नुसतच पाहा. आपल्याला डाग लागला. शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर डाग लावला. कोणी म्हणतंय घरं जाळलीत. कोणी म्हणतंय हॉटेल जाळलंय. आमच्यावर उगाच डाग लावलाय. आम्ही घाबरणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

त्यांना चप्पल दाखवा

नेता वगैरे मानू नका. आपल्यातील लोकांनी काम केलं तरच नेता माना. मराठा असला तरी नेता मानू नका. आता निवडणुकीत जवळ आला तर चप्पलच दाखवा. आपल्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे मुडदे बघता. तुम्हाला लाजा वाटत नाही का? तुमच्या डोळ्यादेखत आरक्षणासाठी मराठ्याचं लेकरू आत्महत्या करत आहे. तुम्ही नुसतं पाहत आहात. एका दणक्यात आरक्षण द्या. नाटकं कशाला? असा सवाल त्यांनी केला.

सरकार झोपू नका

आपल्या पोरांनी काही केलं नाही तरी गुन्हे दाखल केले आहेत. निष्पाप पोरांना अडकवण्याचं काम सरकारने केलं. मराठ्यांना काही करायचं असतं तर आजच केलं असतं. सरकार झोपू नका. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. मराठ्यांना राज्यात शांतता हवी. करोडोच्या संख्येने एकत्र आलाय. शांततेत शहरात गेला. शांततेत मैदानात आला. विनाकारण त्याला डाग लावू नका. मराठ्याला विनाकारण डिवचू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.