AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळीनं होतं नव्हतं ते सगळं गेलं; द्राक्ष बाग भूईसपाट…

शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन रब्बी हंगामातील पिकांवर अवलंबून असते पण काढणीस तयार असलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे वर्षभर गुजराण कसे करायचे याची काळजी शेतकऱ्यांना लागली आहे.

अवकाळीनं होतं नव्हतं ते सगळं गेलं; द्राक्ष बाग भूईसपाट...
| Edited By: | Updated on: Mar 18, 2023 | 8:05 PM
Share

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात धूमाकूळ घातला आहे. रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच द्राक्ष पिकांच्या ऐन हंगामात अवकाळी पावसाने दणका दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिरवळ गावामध्ये गारपिटीमुळे द्राक्षबाग अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तुफान झालेल्या गारपिटीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ गावातील शेतकऱ्यांच्या द्राक्षे बाग जमीनदोस्त झाल्या आहेत. द्राक्षांच्या हंगामामध्येच बाग जमिनदोस्त झाल्यामुळे मोठा फटका बसला आहे.

शिरवळ गावातील मल्लिनाथ भासगे यांची दोन एकर द्राक्ष बाग या अवकाळी पावसामुळे भूईसपाट झाल्याने द्राक्ष पिकाचेही प्रचंड नुकसान झाले आहे.पावसात कोसळलेल्या बागेचे जवळपास 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

त्यातच शासकीय कर्मचारी संपावर असल्याने आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार की नाही असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत.

या अवकाळी आणि गारपिटीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळे झालेली नुकसान भरपाई मिळणार की नाही या चिंतेत आता शेतकरी आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव परिसरातील दर्शनाळ, पितापूर, डोंबरजवळगे, हन्नूर, धोत्री, अरळी, नन्हेगाव या ठिकाणी अवकाळी पावसामुळे काढणीस तयार असलेल्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सदलापूर, किणी, बोरेगाव आदी ठिकाणी गारपिटीने आंबा, द्राक्ष पिकांचेही प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

सध्या शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन रब्बी हंगामातील पिकांवर अवलंबून असते पण काढणीस तयार असलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे वर्षभर गुजराण कसे करायचे याची काळजी शेतकऱ्यांना लागली आहे.

Follow Us
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.