AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीमंत BCCI कडे 1987 साली WORLD CUP साठी पैसे नव्हते, मग असे जमवले पैसे

एका मुलाखतीत अनिल अंबानींना विचारण्यात आलं, वर्ल्ड कपची तयारी कुठवर आली? तेव्हा अनिल अंबानींनी प्रतिप्रश्न विचारला. कोणता वर्ल्ड कप? रिलायन्स कप का?

श्रीमंत BCCI कडे 1987 साली WORLD CUP साठी पैसे नव्हते, मग असे जमवले पैसे
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 09, 2022 | 10:42 AM
Share

मुंबईः 1983 मध्ये भारतानं क्रिकेट (Cricket) वर्ल्ड कप (World Cup) जिंकला. पण तेव्हाचे बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष एनकेपी साळवे  यांना हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. . चार तिकिटांपैकी ऐनवेळी लॉर्ड्सवरील व्यवस्थापनाने दोन तिकिटं नाकारली. तो वर्ल्डकप कसा बसा खेळला. पण इंग्लंडची ही मक्तेदारी मोडीत काढायची, असं भारतानं ठरवलं. ही प्रक्रिया काही साधीसुधी नव्हती.

जगभरातील खेळाडूंची बडदास्त ठेवणं आणि त्या तोडीचं आयोजन करणं आशिया खंडातील देशांचं तसं मुश्किलच होतं. पण एका व्यक्तीनं पुढाकार घेतला. भारतात BCCIने असा काही जुगाड केला की 1987 मध्ये भारत पाकिस्ताननं वर्ल्डकपचं आयोजकत्व घेतलं आणि सगळा थाटमाट उत्तमरितीने पार पाडला.

आयोजकत्व कसं मिळालं?

1987 मध्ये भारताने आशिया खंडातील शेजारी देशांशी चर्चा करून वर्ल्ड कप आपल्याकडे आयोजित करण्याचं ठरवलं. पाकिस्तान तयार झाला. भारत-पाकिस्तानने आयोजकत्व पत्करलं. मंजुरी मिळाली. मग मुद्दा होता पैशांचा. वर्ल्डकपची गॅरेंटी मनी आणि इतर खर्चासाठी लागणार होते 30 कोटी रुपये. कशी बशी 10 कोटी रुपयांची बीसीसीआयची तयारी होती. आता उरलेले 20 कोटी रुपये जमवायचे होते.

धीरूभाई अंबानी पुढे आले…

BCCI च्या मदतीला पुढे आले रिलायन्स इंडस्ट्रीचे धीरुभाई अंबानी. आर्थिक मदत करणार म्हटले, पण एक अट घातली. वर्ल्डकपचे टायटल स्पाँसर बनण्याचं. BCCI ने अट मान्य केली. अनिल अंबानी रिलायन्सकडून ऑर्गनायझर बनले.

रिलायन्सने या वर्ल्डकपमधून प्रमोशन मिळवण्याचं ठरवलं. यानिमित्ताने इंग्लंडच्या तावडीतून वर्ल्ड कप तर बाहेर पडलाच. पण रिलायन्सचं नशीब उघडण्यासाठी तो एक मैलाचा दगड ठरला.

एका मुलाखतीत अनिल अंबानींना विचारण्यात आलं, वर्ल्ड कपची तयारी कुठवर आली? तेव्हा अनिल अंबानींनी प्रतिप्रश्न विचारला. कोणता वर्ल्ड कप? रिलायन्स कप का? यावरून हा वर्ल्ड कप त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा होता, हे दिसून येतंय.

वर्ल्डकपच्या आधी भारत-पाकिस्तान एक्झिबिशन मॅच होती. त्यातही रिलायन्सने एक अट घातली. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बाजूला धीरूभाई अंबानी यांची खुर्ची असावी. ही अटही मान्य करण्यात आली. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजची उत्तरोत्तर प्रगती होत गेली.

आज जगातील सर्वात श्रीमंत कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे खरे प्रमोशन 1987 च्या वर्ल्ड कप आयोजनापासूनच सुरु झाले. मसाल्यांपासून सुरु झालेली ही कंपनी आज टेक्स्टाइल, पेट्रोकेमिकल, टेली कम्युनिकेशन, रिटेल आदी सर्वच क्षेत्रांमध्ये विस्तारलेली आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?