Small Cap Company | छोटा पॅकेट बडा धमाका, 2 शेअरमागे 1 शेअरचा बोनस! या स्मॉल कॅप कंपनीने गुंतवणूकदारांना दिला जोरदार परतावा

Small Cap Company | स्मॉल कॅप कंपनी वीरम सिक्युरिटीज लिमिटेडने बाजारात धमाका केला आहे. ही कंपनी 2 शेअर्समागे गुंतवणूकदारांना 1 शेअर बोनस रुपात देणार आहे.

Small Cap Company | छोटा पॅकेट बडा धमाका, 2 शेअरमागे 1 शेअरचा बोनस! या स्मॉल कॅप कंपनीने गुंतवणूकदारांना दिला जोरदार परतावा
छोटा पॅकेट बडा धमाकाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 5:15 PM

Small Cap Company | स्मॉल कॅप कंपनी (Small Cap Company) वीरम सिक्युरिटीज लिमिटेडने बाजारात धमाका केला आहे. ही कंपनी 2 शेअर्समागे गुंतवणूकदारांना 1 शेअर बोनस रुपात देणार आहे. शेअर बाजारात जवळपास 6 महिन्यांचा कालावधी गुंतवणूकदारांसाठी अत्यंत वाईट गेला. कोराना काळातही बाजाराने एवढे रंग दाखवले नव्हते. एवढा तोटा गुंतवणूकदारांना या कालावधीत सोसावा लागला. परंतू, आता वाईट काळ सरत असून गुंतवणूकदारांना एकापाठोपाठ एक चांगल्या बातम्या मिळत आहेत. शेअर बाजार (Share Market) पुन्हा रुळावर येत असताना, कंपन्या गुंतवणूकदारांना लाभांश किंवा बोनस शेअर्सचे वाटप करत आहेत. स्मॉल कॅप कंपनी वीरम सिक्युरिटीज लिमिटेडने (Veeram securities ltd) आपल्या गुंतवणूकदारांना बोनस वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.  कंपनीच्या संचालक मंडळाने पात्र भागधारकांना दोन शेअरमागे एक बोनस शेअर (Bonus Share) देण्याचा निर्णय घेतला आहे.  या वर्षी कंपनीने परताव्याच्या बाबतीतही गुंतवणूकदारांना जोरदार नफा दिला आहे.  विशेष बाब म्हणजे या कंपनीची स्थापना 2011 मध्ये झाली आहे.  अवघ्या 10-12 वर्षे असलेल्या या कंपनीने बाजारात सगळ्यानांच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

काय घेतला निर्णय

नियामकाला कंपनीने माहिती दिली आहे. त्यानुसार ‘कंपनीच्या संचालक मंडळाने दोन शेअर्सवर एक शेअर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. बोनस कधीपर्यंत देण्यात येईल याची तारीख कंपनी सर्वसाधारण सभेत जाहीर करेल.” ही कंपनी दागिन्यांशी संबंधित व्यवसाय करते. विशेष बाब म्हणजे या कंपनीची स्थापना 2011 मध्ये झाली आहे.

या स्टॉकची कामगिरी कशी आहे?

भारतीय शेअर बाजारात या वर्षी काही मल्टीबॅगर शेअर्सने धमाके केले. त्यांच्या कामगिरीने मोठ्या कॅप असलेल्या कंपन्याही अवाक झाल्या आहेत. वीरम सिक्युरिटीज हा स्टॉक ही छोटा पॅकेट बडा धमाका ठरला आहे. वीरम सिक्युरिटीज लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. बीएसई(BSE) वरील कंपनीच्या Shareनी गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 2.41 टक्के परतावा दिला आहे. 6 महिन्यांची कामगिरी तर तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. कंपनीच्या शेअरच्या किमती 44.11 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये एकूण 84.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने 6 जानेवारी 2017 रोजी बाजारात पाऊल ठेवले. तेव्हापासून आजपर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 818.58 टक्क्यांनी वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

(सूचना: ही माहिती केवळ गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याच्या अधीन आहे आणि कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.