AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

19 बंगल्यांचा वाद! कोर्लई गावात मी स्वतः 18 तारखेला जाणार- किरीट सोमय्या

19 बंगले कुठे आहेत, ते दाखवा, असं आव्हान संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलं होतं. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावात जाऊन पाहणी करणार असल्याचं म्हटलंय.

19 बंगल्यांचा वाद! कोर्लई गावात मी स्वतः 18 तारखेला जाणार- किरीट सोमय्या
दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या
| Edited By: | Updated on: Feb 16, 2022 | 3:20 PM
Share

मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे 18 फेब्रुवारी रोजी कोर्लई इथं जाणार आहेत. 19 बंगल्यांच्या वादग्रस्त विषयाबाबत अखेर कोर्लई गावात मी जाणार आहे, त्यांनी स्वतः किरीट सोमय्यांनी म्हटलंय. यावेळी ते 19 बंगल्याच्या (19 Bunglow) आरोपांवर आता आणखी काय नवा दावा करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 19 बंगले कुठे आहेत, ते दाखवा, असं आव्हान संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press conference) दिलं होतं. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावात जाऊन पाहणी करणार असल्याचं म्हटलंय. ते बंगले कुठे चोरी झाले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. त्यावर राऊतांनीही प्रतिक्रिया देत बंगले आहेत का दाखवावेत, असा टोला लगावला होता.

राऊतांना सोमय्यांचं प्रत्युत्तर

भाजप नेते किरीट सोमय्या नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत म्हटलं होतं की, घर नाही तर घरपट्टी का भरतात. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायचंय. मुख्यमंत्री झाल्यानंतर घरपट्टी भरली. त्याचं 5.42 लाख असं ग्रामपंचायतीनं व्हॅल्युएशन दाखवलंय. 2008 मध्ये व्हिजीट करून घरं बांधून झाली. तुम्ही एग्रीमेन्ट 2014 मध्ये केलं. मुख्यमंत्र्यांनी 12 नोव्हे 2020 ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घरं चोरीला गेली का, असा सवाल त्यांनी केलाय. शिवाय मी 12 महिन्यांपूर्वीच घरं चोरीला गेल्याची तक्रार केली. मग आता घरं नाहीत, अशी नाटकं का करता. ठाकरेंच्या पत्नीनं, रवींद्र वायकरांनी, घोस्ट घरं दाखवून कोट्यवधी लाटले असा आरोपही सोमय्यांनी केला होता.

‘आरटीआय’मधून समोर

किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, 31 मार्च 2021 पर्यंत अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे, मनीषा वायकर कर भरत आहेत. याचा अर्थ जागा केव्हा घेतली रश्मी आणि मनिषा यांनी 2013 मध्ये एमओयू केलं. जेव्हा वायकर स्थायी समितीचे अध्यक्ष होते. हा ग्रामपंचायतीचा अधिकारय. जो ‘आरटीआय’मधून समोर आला. रश्मी आणि मनीषा यांच्यातर्फे 30 जाने 2019 रोजी घरपट्टी त्यांच्या नावे करण्याचा अर्ज आला आहे. आणि ग्रामपंचायत त्यांचा अर्ज मान्य करून घरं करत आहेत.

सरपंचांचा सनसनाटी खुलासा

कोर्लई गावच्या संरपंचांना विचारले असता., किरीट सोमय्यांचे आरोप खोटे असल्याचं सरपंचांनी म्हटलं आहे. तसंच ती घरं अन्वय नाईक यांनी बांधली होती, अशी Exclusive माहिती tv9 मराठीला त्यांनी दिली आहे. 19 बंगले नाही तर 18 घरं बांधली होती. त्यानंतर सीआरझेडमधली कच्ची घरं तोडली गेली. तसंच 2014ला ही जमीन मनिषा वायकरांना विकली, अशी माहिती सरपंचांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, अमृता फडणवीसांची किचनमध्ये ‘कल्ला’कारी

सोमय्या-राऊत वादात कोर्लईच्या सरपंचानं खरं खोटं सांगितलं, त्या 19 बंगल्याचं गौडबंगाल पहिल्यांदाच उघड

संजय राऊतांकडून ट्विटची मालिका, बाप बेटे जेलमध्ये जाणारनंतर ACB, CBI चौकशीची मागणी; मोहित कंबोजचेही प्रत्युत्तर

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.