AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : ओमानने हातातला सामना कुठे गमावला? हा ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट

आशिया कप स्पर्धेत दुबळ्या समजल्या जाणाऱ्या ओमान संघाने भारताला विजयासाठी चांगलंच झुंजवलं. एक वेळ अशी आली की सामना हातून जातो की काय? ओमानकडून एक चूक झाली आणि सामना भारताच्या पारड्यात झुकला.

Asia Cup 2025 : ओमानने हातातला सामना कुठे गमावला? हा ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
Asia Cup 2025 : ओमानने हातातला सामना कुठे गमावला? हा ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Sep 20, 2025 | 2:02 AM
Share

आशिया कप 2025 मधील ग्रुप अ मधील शेवटच्या लीग सामन्यात टीम इंडियाने ओमानचा 21 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 गडी गमावून 188 धावा केल्या. प्रत्युत्तरात ओमानचा संघ 20 षटकांत 4 गडी गमावून फक्त 167 धावाच करू शकला.सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला, तर ओमानने टीम इंडियाला कडवी झुंज देत सर्वांची मने जिंकली. खरं तर या सामन्यात एक वेळ अशी होती की हा सामना ओमानच्या पारड्यात होता. 18 व्या षटकात कमाल झाली. हार्दिक पांड्याने घेतलेल्या अप्रतिम झेलमुळे सामन्याचं चित्र पालटलं. ओमानची 17 षटकात 1 गडी बाद 141 धावा अशी स्थिती होती. ओमानला 18 चेंडूत 48 धावांची आवश्यकता आहे. ओमानच्या फलंदाजांना प्रति षटक 16 धावा काढायच्या होत्या. भारत दुसऱ्या विकेटच्या शोधात होता. संघाचं 18वं षटक टाकण्यासाठी हार्षित राणा आला. या षटकातच सामना फिरला.

हार्षित राणाच्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर आमीर कलीमने चौकार मारले. त्यामुळे सामना आणखी अतितटीचा होत असल्याचं जाणवलं. तिसरा चेंडू निर्धाव गेला. पण या षटकाच्या चौथ्या चेंडूवर आमीर कलीम बाद झाला आणि सामना भारताकडे झुकला. कलीमने पांड्या क्षेत्ररक्षण करत असलेल्या बाजूने चेंडू फ्लिक केला. हा चेंडू जवळजवळ षटकारच होता. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमी आता सामना गेला असंच समजत होते. पण हार्दिक पांड्या सुपरमॅनसारखा आणि झेल पकडून सामना आपल्याकडे खेचून आणला. हार्दिक पंड्याने स्फोटक फलंदाज आमिर कलीमला बाद करण्यासाठी एक शानदार कॅच घेतला. आमिर 46 चेंडूत 64 धावा काढून बाद झाला. या फलंदाजाने 7 चौकार आणि 2 षटकार मारले.

ओमानने सामना गमावल्यानंतर कर्णधार जतिंदर सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘संघाचा खूप अभिमान आहे. त्यांनी ज्या पद्धतीने योजना आखल्या आणि अंमलात आणल्या. कठीण परिस्थितीत त्यांनी आपले व्यक्तिमत्त्व कसे दाखवले याचा खूप अभिमान आहे. स्पर्धेचा उत्साह मनात कुठेतरी होता. मी आधी सांगितल्याप्रमाणे, आमच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. आमच्याकडे ओमानमध्ये विश्वचषक पात्रता स्पर्धा आहे. मुले तयार आहेत. मी त्याला सांगत होतो, ती तुमची आवडती बाद फेरी बनली आहे. तो एक उपयुक्त खेळाडू आणि संघाचा माणूस आहे. आमचा गट पीएनजी आणि सामोआसह आहे. मुले तयार आहेत आणि स्पर्धेची वाट पाहत आहेत.’

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता