नाशिकला जाणारा कसारा घाट मार्ग 1 महिना बंद राहणार

मुंबई-नाशिक कसारा घाट मार्ग 1 महिना बंद राहणार आहे. मुंबई-नाशिकच्या जुन्या महामार्गावर रस्ता खचल्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.

नाशिकला जाणारा कसारा घाट मार्ग 1 महिना बंद राहणार
Follow us
| Updated on: Aug 06, 2019 | 11:47 AM

नाशिक : मुंबई-नाशिक कसारा (Mumbai-Nashik) घाट मार्ग 1 महिना बंद राहणार आहे. मुंबई-नाशिकच्या जुन्या महामार्गावर रस्ता खचल्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. बंदच्या काळामध्ये या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. हा मार्ग बंद केल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे नाशिकमधील कसारा घाटातील रस्त्यावर दोन भाग पडले आहेत. त्यामुळे त्या मार्गावरुन वाहतूक करणे धोक्याचे ठरु शकते. सध्या नाशिक परिसरात पावासाने कहर केला आहे.

गेले काहीदिवस नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. तर गेले दोन दिवस मुसळधार पावासाने नाशिकचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी अनेकांच्या घरातही शिरलं आहे. नाशिकमधील पूरग्रस्त परिस्थिती सध्या आटोक्यात आली असून पाऊस मात्र सुरु आहे.

राज्यातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या शहरांमध्ये नाशिकमधील त्रम्बकेश्वरच्या नावाचाही समावेश होतो. अजूनही नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पार्श्वभूमिवर शाळा, कॉलेज आणि खासगी कंपन्यांना बंद ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कसारा घाटातील रस्ता खचल्याने नव्या मार्गावरुन सर्व वाहतूक चालवण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.