AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Ravikant Varpe : ‘बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तरी आश्चर्य वाटणार नाही’

राज ठाकरे (Raj Thackeray) हे संघाच्या (RSS) पूर्णपणे बाहुपाशात गेलेले नेते आहेत, हे भाषणावरून समजते, उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी केली आहे.

Pune Ravikant Varpe : 'बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तरी आश्चर्य वाटणार नाही'
राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे Image Credit source: ravikantvarpe
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Apr 13, 2022 | 1:04 PM
Share

पुणे : महाराष्ट्राचे बहुरूपी नेते राज ठाकरे (Raj Thackeray) हे संघाच्या (RSS) पूर्णपणे बाहुपाशात गेलेले नेते आहेत, हे भाषणावरून समजते, उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी केली आहे. 370 कलम, काश्मिरी पंडितांवरील अन्याय, समान नागरी कायदा, मशिदीवरील भोंगे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुद्दे आहेत, जे राज ठाकरे भाषणातून मांडताहेत, असे वरपे म्हणाले. शरद पवार साहेब हे जातीयवादी नेते, देव-धर्म मानत नाहीत, एका धर्माचे लांगुलचालन करीत आहेत, हा प्रचार संघ गेली गेली अनेक दशके शरद पवार यांच्या विरोधात करत आहे. आज फक्त राज ठाकरे सभेच्या माध्यमातून मांडत आहेत, हे स्पष्ट झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून येते भाषणाची स्क्रीप्ट

रविकांत वरपे पुढे म्हणाले, की राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून येते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असेही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीवर आणि पवार कुटुंबीयांवर काल त्यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आक्रमक, सडेतोड प्रतिक्रिया येत आहेत. विविध नेत्यांनी राज ठाकरेंचे मुद्दे खोडून काढले आहेत. देशात, राज्यात इतर ज्वलंत मुद्दे असताना अशाप्रकारचे भावनिक मुद्दे घेणे एकप्रकारचे मनोरंजन असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

महाराष्ट्रात जातीवादाचे विष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच पेरले गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच शरद पवार आपल्या भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. ते योग्यही आहे. पण ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असे म्हणत नाहीत. कारण, त्यांना मुस्लीम मते दुरावण्याची भीती वाटते, असा घणाघातही राज ठाकरे यांनी केला. त्याव्यतिरिक्त सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या नेत्यांवरही त्यांनी टीका केली होती. त्याला राष्ट्रवादीने उत्तर दिले आहे.

आणखी वाचा :

Thane Raj Thackeray : तलवार दाखवणं भोवणार? राज ठाकरेंवर ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता

Raj Thackeray Thane Uttar Sabha: तर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार, राज ठाकरे भोंगे लावण्यावर ठाम, आता कारणेही सांगितली

Raj Thackeray Thane Uttar Sabha: अजित पवार, तुमच्या माहितीसाठी म्हणून तीन व्हिडीओ आणलेत, राज ठाकरेंचं पुन्हा लाव रे तो व्हिडीओ

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली