Dahi Handi | दहीहंडी उत्सवावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

| Updated on: Aug 23, 2021 | 6:09 PM

कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षापासून सर्वच सणांवर विरजन पडत आहे. यंदाही गोविंदाचा सण असणारी दहिहंडी साजरी करता येणार नसल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Follow us on

मागील वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सर्वच सण साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत. यंदाही हे निर्बंध कायम आहेत. काही गोष्टी सुरु झाल्या असल्यातरी निर्बंध अजूनही कायम आहेत. दरम्यान मुंबईकरांचा लाडका सण असणाऱ्या दहीहंडी सण साजरी करण्यावरही यंदा बंदी घातली आहे.

आपले सण आपण जपलेच पाहीजेत… पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल, असं म्हणत दहीहंडीसाठी परवानगी नसेल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तर नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूया?