राज्य सरकार हे नेहमी OBC विरुद्ध आहे, असा घणाघात चंद्रकांत बावनकुळे यांनी केला आहे. तसेच पुढे बावनकुळे म्हणाले की, राज्य सरकारचे वेळ तयारी करत नाही, वेळ मारुन नेण्यासाठी वेळेवर रिकॅाल अर्ज करतात. राज्य सरकार ओबीसी आरक्षणावर गंभीर नाही. वारंवार हे सरकार ओबीसी आरक्षणाच्या केसवर चालढकल करत आहे. मंत्री बोलघेलडे आहेत, वकीलाशी चर्चा करत नाही. मंत्र्यांनी मिडियाचा स्पेस घेण्यापेक्षा वकीलाशी चर्चा करावी. आम्ही सर्वोच्च न्यायालयात भांडतोय, सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल असे चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले आहे.